आरक्षण लढाया ,,, अस्वस्थ समाजमन,, सामाजिक दुंभगलेपण ,,आणि उपेक्षितांना नाकारलेली सत्ता भागीदारी,,,,!

ऍड . अविनाश टी . काले , अकलूज
डॉ आंबेडकर चौक, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर
मो नंबर:- 9960178213
गत कांहीं वर्षा पासुन महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण सातत्याने आरक्षण मुद्या आधारे ढवळून निघत आहे .
महाराष्ट्रातील प्रभावशाली सत्ताधारी जाती प्रवर्गा तील “मराठा ” जाती ने ओबीसी समूहातील आरक्षणावर हक्क “कुणबी” या व्याख्ये खाली दर्शवल्याने ओबीसी प्रवर्गात प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे .
दुसऱ्या बाजूने “धनगर ” या बहुसंख्याक जातीने “आदिवासी ” जमातीच्या एस टी प्रवर्गात आरक्षण असावे , व आम्ही मूळचे आदिवासी असून ” र”ऐवजी “ड” झाल्या मुळे “आदिवासी “प्रवर्गात आमचा समावेश न झाल्याने आमच्या वर अन्याय झालेला आहे , अशी भूमिका मांडून त्या लढाया ही लढत आहेत .
एस सी प्रवर्गातील , नवबौध्द समाजा व्यतरिक्त असलेले इतर जाती समूह विशेषतः ” मातंग” समाज मागासवर्गीय आरक्षणात “अबकड ” करून आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या म्हणून मागणी करत आहे .
मणिपूर याच प्रश्नावरून जळत आहे ,
“मनोज जरांगे पाटील , ते ना छगन राव भुजबळ आणि प्रा लक्ष्मण हाके यांच्यातील उपोषण लढे सर्वश्रुत आहेत.
बीड मध्ये झालेला हिंसाचार , आणि कांहीं महिन्या पूर्वी पंढरपूर तालुक्यात ओबीसी समाजावर झालेले हल्ले , झालेली जीवितहानी हे सर्व कांहीं आपल्या पुढे आहे .
या सगळ्या पार्श्र्वभूमीच्या आधी ,
एन टी प्रवर्गातील ” वडार ” समाजातून आलेले सांगली जिल्ह्यातील “वाटेगाव” चे रहिवाशी
तुकाराम बाबुराव माने ( स्वेच्छा निवृत्त सामाजिक बांधकाम विभाग अभियंता महाराष्ट्र राज्य) यांनी त्यांना नोकरीच्या ठिकाणी होणारा त्रास आणि त्यांच्या हातात पडलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे “काँग्रेस ने दलिता साठी काय केले?”हे पुस्तक
आणि सलग 39वेळा ते पुस्तक अस्वस्थ मनाने वाचून पिसाटलेले मन अंतर्मुख होऊन
” पुन्हा एकदा पेटवू स्वतंत्र मतदार संघाच्या मशाली” हे त्यांनी 2019 मध्ये लिहिलेले पुस्तक ,,,
आपल्या निवृत्ती च्या पेन्शन मधून खर्च करत हा माणूस महाराष्ट्रातील अनेक अस्वस्थ माणसांना शोधत राहिला . चर्चा करत राहिला , रात्र आणि दिवस फक्त एकच ध्यास
आमच्या कुमकुवत ओबीसी मधील मायक्रो ओबीसी , एन टी , मुस्लिम ओबीसी , या समूहाच्या सत्ता भागीदारी चे काय?
आरक्षण भागीदारी चे काय?
एका बाजूला ब्राम्हणी व्यवस्था पाया असलेली भाजपा , आमचा डी एन ए ओबीसी आहे असे म्हणते , तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस आहे तिथे सहकार सम्राट , आणि सरंजाम यांचे वर्चस्व आहे ,
आंबेडकरी पक्ष जात व्यवस्थेने बंदिस्त झालेले आहेत ,
” जावे कुण्या ठिकाणी ? उध्वस्त पापी यांनी,,, संतात ही घरांच्या राखेस भाव नाही”,,,
या सगळ्या मंथनातून परिवर्तन वादी चळवळीचा समतेचा झेंडा ज्या शाहू नगरीत रोवला गेला , आणि संस्थानिक असून ही ज्यांनी आरक्षणाची सुरुवात आपल्या नगरी तून केली त्या कोल्हापूर मध्ये
दिंगबर लोहार यांनी “ओबीसी जन मोर्चा ” संघटनेच्या माध्यमातून
“वैश्य वाणी ” समाज बोर्डिंग येथे
दिनाक 23/6/2024रोजी महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्या चे चर्चा सत्र 11ते 5या वेळेत ठेवले ,
या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून दादा साहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांना नीच्छित करण्यात आले होते .
परंतु कांहीं कारणास्तव त्यांचे येणे रहित झाले ,
आणि याचे अध्यक्षपद माझ्या कडे आले , पण अकलूज वरून सुटणारी एस टी कोल्हापूर ला 11.20ला पोहचली , आणि ऐन वेळचे अध्यक्षपद हे भटक्या विमुक्त चळवळीचे नेते भाई , साथी व्यंकप्पा भोसले यांना देण्यात आले ,
आणि मी यातील निमंत्रित वक्ता बनलो .
या चर्चा सत्रात सू प्रसिद्ध अर्थ तज्ञ “विश्वास उटगी ” साहेब होते , त्यांची सामाजिक बांधिलकी , सामाजिक तळमळ आणि क्रांतिकारी मते ज्यांना ज्ञात आहेत त्यांना हे चर्चा सत्र किती अभ्यासपूर्ण झाले असेल याची कल्पना येईल .
माझ्या 35 40 वर्षाच्या सामजिक चळवळी च्या काल खंडात ” डॉ बाबा आढाव” यांनी आयोजित केलेल्या “विषमता निर्मूलन परिषद ” नंतर फक्त हेच चर्चा सत्र उत्कृष्ट सर्वच पातळ्यांवर झाले .
विज्ञान वादाच्या आधारे समाज उभा रहावा म्हणून आय आर एस चे वॉरंट अधिकारी म्हणून काम केलेले ,(सेवा निवृत्त) अरविंद जी सोनटक्के साहेब ,( मला शिक्षण घेताना मिळालेली स्कॉलरशिप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाली , आणि त्याचे कर्ज मी फेडत आहे म्हणून खारगर येथील स्वतः चां प्लॉट बहुजन विद्यार्थ्या सांठी मोफत देणारे , व ईश्वरा धिष्ठीत शोषण व्यवस्था नाकारणारी पिढी तयार करण्यासाठी एक रुपया मानधनाची अपेक्षा न ठेवता तन मन धन चळवळी साठी अर्पित करणारे ,
डॉ मिलिंद चिंचोली कर (एम डी) हे असेच गृहस्थ ,,, पती पत्नी, आणि बंधू ही डॉक्टर, बंधू अमेरिकेत प्रॅक्टिस करतात आणि हे मुंबई ,,, पण महात्मा फुले यांचे ” गुलाम गिरी ” पुस्तक वाचले आणि त्याचे इंग्रजी भाषांतर करताना अनेक नवीन संदर्भ तळटीप चे रूपाने दिलेले ,,
याच सामाजिक बांधिलकी मधून ते अस्वस्थ होऊन सामाजिक परिवर्तन साठी सर्वार्थाने समर्पित गृहस्थ ,,,
असो
या ठिकाणी सर्वांचा परामर्श घेणे अवघड आहे ,
पण आदरणीय विश्वास जी उटगी सर यांनी जे मुख्य मुद्दे मांडले ते हेच होते की
सुमारे 32 वर्षा पासुन जी सरकारे आली , ज्यात काँग्रेस भाजपा , सारखी सर्व सरकारे आहेत त्यांनी उदारिकरणा चे धोरण स्वीकारले ,
काँग्रेस चे काळात हा वेग कमी होता पण तो वेग भाजपच्या काळात अधिक वाढला ,
आणि त्या मुळे एक धोरण स्वीकारण्यात आले ते म्हणजे शासनाचे कर्तव्य हे शासन चालवणे आहे , उद्योग चालवणे नाही .
म्हणून सार्वजनिक उपक्रम असलेले
रेल्वे , विमान , जहाज , खाणी , स्टील , कोळसा , वीज , ट्रान्सपोर्ट , बँका , एल आय सी , शिक्षण , आरोग्य , अश्या सर्व उपक्रमातून सरकार अंग काढून घेत आहे .
आणि या सेक्टर चे रूपांतरण खाजगी करण्यात येत आहे .
शासनाकडे लष्कर आणि पोलीस या शिवाय कांहीं ही असू नये , या प्रक्रियेने वेग घेतल्याने शासकीय नोकरी तील
आरक्षण आकुंचित झालेले आहे.
80%लोक निकृष्ट जीवन जगत आहेत , या पैकी
25कोटी लोक दारिद्र्य रेषे खाली आहेत .
महात्मा फुले यांनी वर्णन केलेली गुलामगिरी 32 वर्षात अधिक गडद झाली आहे , शिक्षण व्यवस्थेतून बहुजन बाहेर फेकला जात आहे पण
आपण या विरोधात चकार शब्दही बोलत नाही आहोत .
जात व्यवस्थेने निर्माण केलेल्या व्यवसायात बंदिस्त करून पुन्हा जाती बळकट व्हाव्यात म्हणून त्या त्या जात निहाय उद्योगा साठी बँकांची कर्जे , अनुदान , कांहीं हजाराची अमिषे दर्शवली जात आहेत व तुम्ही अलुते दार आहात , बलुते दार आहात तुम्ही हे करा ते करा , सांगितले जात आहे ते तुम्ही आम्ही नाकारणार आहोत की नाही?
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन किती ? 10ते 15हजार , त्यात ते उपजीविका करणार की शिक्षण आरोग्य सांभाळणार?
तुम्हाला आरक्षण दिले पण रोजगार निर्मिती च केली नाही तर त्या आरक्षणाचा उपयोग काय?
सामाजिक न्याय फक्त कळून उपयोगाचा नाही तर त्या साठी केंद्र आणि राज्याकडे आर्थिक कार्यक्रम हवा .
गत 6 वर्षात इन्फ्रा स्ट्रकचर निर्मिती साठी 25लाख कोटी खर्च झाले , बँकाचे डिजीटीलायझेशन झाले ,
माणसे पैसे भरतात , पैसे काढतात , बाहेर बंदूक घेतलेला सुरक्षा रक्षक आणि आत मध्ये मशिन्स ,,,
रोजगार निर्मिती कशी होणार?
बँकाचे एकत्रीकरण केले जाईल तस तसे कामगार कमी होतील ,
आरक्षणाची भाकरी मोठी न होता तिचे तुकडे तुकडे करणार असाल तर तुमच्या वाट्याला एक तुकडा ही येणार नाही
जातीला जाती जोडून संख्या वाढेल पण त्यांना कार्यक्रम नसेल ,
तो समूदाय मनू स्मृती प्रणित व्यवस्थेच्या विरोधात उभा राहणार नसेल तर ती चळवळ अर्थ विहीन ठरेल
मनुस्मृतीच्या बाजूने असलेले लोक तुमच्या नेत्याला विकत घेऊ शकतात , इतकी आर्थिक शक्ती त्यांच्या कडे आहे.
जात निहाय महा मंडळ निर्मिती ही लोकप्रिय आहे पण व्यवस्था परिवर्तन साठी ती अतिशय वाईट आहे.
मराठा , ब्राम्हण यांचा व्यक्ती द्वेष न करता व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढली गेली होती
देशाचे वार्षिक बजेट 45लाख कोटी आहे , पण यातील आमचा वाटा कुठे आहे?
आरोग्यासाठी 3% तरतूद बजेट मध्ये नाही ,
4% तरतूद शिक्षणासाठी केली तर पहिली ते पदवी पर्यंत चे शिक्षण बहुजनांना मोफत देता येईल
राईट टू हेल्थ , याला प्राधान्य द्या , 25लाखा पर्यंत चां उपचाराचा खर्च राज्य शासनाने करावा आणि कोणत्या ही नागरिकाला उपचार नाकारण्याचा अधिकार कोणत्या ही हॉस्पिटल ला नसेल याची तरतूद करा
अर्बन सीलिंग ॲक्ट नुसार स्थापित झालेल्या एम आय डी सी मधील मोकळ्या झालेल्या जागा शासनाच्या आहेत , त्या बहुजनांना देण्याच्या मागण्या करा ,
प्रत्येक नागरिकाला ते राहत असलेल्या गावात , तालुक्यात परवडणारी घरे हा त्यांचा हक्क आहे
जमीन ,हवा , पाणी , यावर नागरिक म्हणून समान हक्क आहे त्यावर अधिकार ही आहे , या साठी प्रबोधन , मागण्या , कृती कार्यक्रम यातून जन लढे उभारले गेले पाहिजेत
आंपली मुले आय पी एस , आय ए एस ,
सरकारी नौकर दार वर्गात एस सी / एस टी कर्मचारी संघटना आहेत परंतु ते समाज व्यवस्थेत बाहेर जाऊन परिवर्तनाची भूमिका घेत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली
आमच्या मुलांना स्थायी नौकरी हवी , खाजगी उद्योजकांच्या रोजगार स्कीम नको , एप्रेंटीस पॉलिसी नको , ही भूमिका घ्यावी लागेल.
आज डाव्या कडे आणि आंबेडकरी चळवळी कडे ही आर्थिक अजेंडा नाही , त्याच्या चळवळी नाहीत , याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे .
आज आपल्या सार्वभौम भारत देशावर जागतिक बँकेचे कर्ज 205लाख कोटी आहे , तर देशा अंतर्गत कर्ज 110लाख कोटी आहे
45लाख कोटींच्या आर्थिक बजेट मधून 10लाख कोटी रुपये निव्वळ व्याजा पोटी जात आहेत .
देशातील नोकर शाही ही जागतिक बँकेच्या कर्ज वितरण अटी शर्ती शी बांधील आहे , ते प्रशासन त्यांच्या अधीन आहे
समाजात बदल लोक घडवून आणतात , नोकर शाही नाही , ते अध्यादेश व नियम काढतात
राहुल गांधी यांनी 30लाख नौकरी निर्मिती करणार अशी घोषणा केली , पण ते एकटे कांहीं करू शकणार नाहीत , त्या साठी कायदे बदलावे लागतील ,
मूलभूत अधिकाराचे जतन करण्यासाठी मूलभूत कार्यक्रम ठरवावा लागेल , उदार मत वादी धोरण उलथवून टाकण्याची लढाई ही खरी लढाई आहे .
गत 10 वर्षात खूप कांहीं बिघडलेले आहे , ते दुरुस्त करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.
या भाषेत त्यांनी प्रबोधन केले ,
तुकाराम माने , मी ऍड अविनाश टी काले , डॉ मिलिंद चिंचोली कर , तुकाराम साळुंखे पाटील घडशी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष , फलटण चे काशीद , शिक्षक संघटनेचे राज्य प्रमुख निवृत्त प्राचार्य शिवाजी राव माळकर, गडहिंग्लज नगर सेवक बाळासाहेब वडार
अरविंद जी सोन टक्के , दिंगबर लोहार यांनी आपले विचार मांडले ,सूत्र संचालन ज्ञानेश्वर सुतार यांनी केले .
या चर्चा सत्रात फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे सहकारी आर बी कोसंबी ,चंद्रकांत सुर्यवंशी , बाळासाहेब भोसले , दैनिक मुक्त नायक चे संपादक देवदास बाणकर, बाळासाहेब उबाळे , अशोक हातकणंगलेकर, डॉ अनिल माने , प्रकाश पवार
यांनी चर्चा सत्र व सूचना मांडल्या , व राज्य कार्यकारिणी स्थापित करून समग्र महाराष्ट्रात लोक जागृतीची चळवळ गतिमान करण्याचा ठराव एकमताने संमत झाला .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत