“मराठा आरक्षणावरून जयंत पाटलांनी केली सरकारवर टिका…”

काय म्हणाले जयंत पाटील?
मराठा आणि ओबीसी समाजात सध्या आरक्षणावरून मतभेद आहेत. दोन्ही समाजातील नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर सत्तारुढ पक्षातील नेत्यांनीही विरोधी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील भांडणात सरकारची नेमकी भूमिका काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
मराठा आणि ओबीसी समाजातील मतभेदावरून जयंत पाटील म्हणाले की, ज्येष्ठ मंत्री राज्यभर सभा घेतात आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे एकत्र बसून ठरवून दोन व्यासपीठ महाराष्ट्रात तयार करत आहेत. दोन्ही बाजूची फसगत करायची आणि आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील नरेटिव्ह बदलायचा यांचा प्रयत्न यातून दिसतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत