महाराष्ट्रमुख्यपानवातावरण

महाराष्ट्राची उपराजधानी मुसळधार पावसामुळे झाली ओलिचिंब.

 मंगळवारी उपराजधानी देखील मुसळधार पावसामुळे ओलिचिंब झाली. शहरालगतच्या खापरखेडासह इतरही परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे शहरातील कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता.

शहरात मंगळवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत हा पाऊस कायम होता. मात्र, पावसाचा वेग अधिक असल्याने शाळकरी विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे अडचणीत आणखीच वाढ झाली. काही ठिकाणी चिखल तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे यातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. शहरालगतच्या खापरखेडा परिसरात बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. पाऊस मुसळधार असल्याने शहरातील वातावरणावर त्याचा परिणाम होऊन कमाल तापमानात मोठी घट झाली.

त्यामुळे हवेतील गारठाही वाढला व हुडहुडी भरवणारी थंडी नागपूरकरांनी अनुभवली. एरवी रात्री, पहाटे थंडी जाणवत असताना मंगळवारी दिवसा देखील प्रत्येकाच्या अंगावर गरम कपडे दिसून आले. बोचऱ्या थंडीमुळे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील कमी दिसून आली. शहरात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे बोचरी थंडी यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!