महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बुद्ध धम्माची मूलतत्वे( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीतून)

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांचे ह्यातीत कृतीतून शेवटच्या थेंबापर्यंत जीवित कार्य करुन आपणा सर्वांसाठी स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग सुकर करून ठेवला. जरी आपल्यातुन ते निघून गेले असतील तरी पण त्यांच्या लिखित पुस्तके, खंड आपणा सर्वांना मार्गदर्शक, दिशादर्शक अशी आहे. ते त्यांच्या सहकारी बांधवांसोबत बोलतानी म्हणतात  -
 आपले अनुयायी अज्ञानी आहेत. " आपल्या ग्रंथातून आणि उपदेशातून बौद्ध धर्माची तत्वे त्यांच्या मनावर बिंबिवन. " दलित वर्गीयांनी भाकरी पेक्षा प्रतिष्ठा अधिक पसंत केली आहे. तरीसुद्धा आपल्या आर्थिक परिस्थितीची सुधारणा करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतील.

संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं.554. पैरा – खालून दुसरा.
उपरोक्त संदर्भानुसार आपल्या ग्रंथातून आणि उपदेशातून बौद्ध धर्माची तत्वे त्यांच्या मनावर बिंबवीन हे त्यांचे वाक्य ऐकल्यावर आपण सर्वांनी दुसऱ्या हिंदू धर्माच्या लोकांचे का म्हणून ऐकावे. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचीत नाही त्यामुळे आपण खरंच अज्ञानी आहोत. हिंदू धर्मातील आचार्य आपल्या बौद्ध धर्मातील लोकांना नक्कीच भ्रमित करुन बुद्धाच्या नावावर त्यांच्या विचाराची भेसळ आणि घुसखोरी करून आपल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. पण आपण आपल्या विवेकबुद्धीने, चौकसपणाने त्याचे निरीक्षण केले पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या मनी बांधलेल्या अविरत ध्येयापोटी कार्याच्या शेवटी पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा संपन्न झाल्यानंतर आपले डोळे तेजाने फुलवीत त्यांनी खरा बौद्ध धर्म वाढीस येण्याबाबत दूरदृष्टीपणा ठेवून आपल्या बौद्ध धर्मीय लोकांना संदेश दिला होता. ते म्हणतात –

पुढील दहा पंधरा वर्षात बौद्ध धर्माच्या दिक्षेची ही लाट सर्व देशभर पसरेल आणि भारत हा बौद्ध देश होईल. अर्थात ब्राह्मण सर्वात शेवटी बौद्ध धर्म स्वीकारतील. बौद्ध धर्म स्वीकारणारे ते शेवटचे लोक ठरू द्या…
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.554. पैरा – खालून दुसरा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या उपरोक्त वाक्यानुसार जर आपल्या बौद्ध धर्मीय लोकांनी, भन्तेनी, आणी बौद्ध धर्मातील पुढाऱ्यांनी संघटित राहून कार्य केले असते तर त्यांची इच्छा आकांक्षा नक्कीच पुरी झाली असती. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा पुरेपूर, तंतोतंत काटेकोरपणे फायदा हा ब्राह्मण, हिंदू धर्मातील आचार्यांनी केला आहे. आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पायमल्ली होऊन यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण सर्वात शेवटी बौद्ध धर्म स्वीकारतील, बौद्ध धर्म स्वीकारणारे ते शेवटचे लोक ठरू द्या असे न होता उलटपक्षी होताना दिसत आहे. आपल्यासाठी शरमेची बाब आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्म टिकून राहिला पाहिजे याविषयी लिहितांनी म्हणतात –
बौद्ध धर्माची प्रतिष्ठा सांभाळण्याची मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर पडली आहे आणि जर तुम्ही कडकपणे आणि उदात्तपणे तत्त्वे पाळली नाहीत तर ” महारांनी ” बौद्ध धर्माची वाटोळे केले असे जग म्हणेल. जगातील कुठल्याही माणसावर जेवढी प्रचंड जबाबदारी पडलेली नाही तेवढी आज माझ्यावर पडलेली आहे
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.558. पैरा – शेवटचा. प्रकरण 26. बौद्ध धर्माचे पुनर्जीवन.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रवर्तक घटनेचे शिल्पकार तर होतेच तसेच युगप्रवर्तक घटना घडवून आणण्याविषयी बौद्ध धर्माचे चक्र फिरावयास लावून भारतात बौद्ध धर्माची पुनर्जीवन केल्या विषयी त्यांना धन्यता वाटत होती. सर वूइल्म हंटर यांनी 1881 मध्ये केलेले भविष्य पहा ते म्हणतात -
बौद्ध धर्माचे पुनर्जीवन होणे ही एक शक्य गोष्ट आहे ते आंबेडकरांनी खरे करून दाखविले

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.561. पैरा – शेवटचा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी त्यांचे कार्य अविरतपणे आपणा सर्वांसाठी संघर्ष करून आपणा सर्वांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग बौद्ध धम्मदीक्षा आणि भारतीय संविधान मोकळा करून दिला. बौद्ध धर्मातील विचारांची घुसखोरी व भेसळ बाबत ते म्हणतात -
अज्ञ लोकांनी आपल्या मनाच्या अनिश्चित धोरणामुळे बुद्धाच्या पूजेबरोबर बौद्ध धर्मात आपल्या पूर्व जीवनात ब्राह्मण असलेल्या व्यक्तीने घुसडलेल्या दुसऱ्या देवतांची पूजा ही मांडली 

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.536.- 537. पैरा – शेवटचा – पहिला.

 आपल्या बौद्ध धर्मातील भावी पिढ्यातील तरुणांनी भगवान बुद्धाच्या खऱ्या मूळ शिकवणीचा अर्थगाभा माझी लिखित पुस्तके वाचून प्रचार आणि प्रसार करावा यासंदर्भात 1953 च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी साईभक्त मेळाव्याचे परळ येथे उद्घाटन करताना देवधर्म या विषयी बोलताना ते तरुणांना उद्देशून म्हणतात -
आज आपल्या सर्व लोकांच्या धर्मात देवही नाही नि नीतीही नाही. मनुष्याच्या मनाची ही अवनतदशा आहे याविषयी मला संशय नाही. धर्मास पुन्हा शुद्ध नि उदात्त स्थिती प्राप्त करून देणे हे भावी पिढ्यांचे काम आहे

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.502. पैरा – दुसरा.
जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उपरोक्त संदर्भानुसार धर्मास पुन्हा शुद्ध नि उदात्त स्थिती प्राप्त करून देणे हे भावी पिढ्यांचे काम आहे असे म्हणत असतील तर आपण खरंच त्यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत आहोत काय ? की बौद्ध धर्मात घूसखोरी केलेले हिंदू धर्माचे आचार्य आणी बौद्ध धर्मातील घूसखोरी भंते ह्यांच्या विचारसरणी नुसार अनुकरण करीत आहो हे स्वतः आपल्या सदविवेक बुद्धीने तपासून पाहिले पाहिजे….

दि.2 मार्च 24.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!