दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

रामभद्राचार्य को डॉ आंबेडकर का ज्ञान नहीं, उन्हे अगर डॉ बाबासाहेब आंबेडकर की समझ होती तो इस प्रकार का अभद्र वक्तव्य नहीं करते….


राजेंद्र पातोडे.

डॉ बाबासाहेबांना तर संस्कृत अवगत होती, तरी काही लोक त्यांना संस्कृत समजत नव्हती असे सांगतात? याचे कारण त्यांनी आपल्या ‘व्हू वेअर द शुद्राज‘ या पुस्तकात संस्कृतबद्दल केलेले एक विधान आहे.
संस्कृत उत्तमपणे समजावी इतके ज्ञान बाबासाहेबांकडे होते. ते अनेक भाषांचे ज्ञाते होते. एखाद्या भाषेचा ज्ञाता किंवा भाषातज्ज्ञ असणे म्हणजे त्या भाषेवर असामान्य प्रभुत्व असणे होय. बाबासाहेब संस्कृत भाषेत पारंगत होते, त्यांना उत्तम प्रकारे संस्कृत अवगत होती, मात्र तीवर अत्युच्च दर्जाचे प्रभुत्व नव्हते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा होती पण त्यांना त्यांच्या जातीमुळे संस्कृत शिकण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यांना शाळेत त्याऐवजी पर्शियन शिकावे लागले. तरिही त्यांनी पुढे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सोहनलाल शास्त्री अशा संस्कृतवर प्रभुत्व असणाऱ्या मान्यवरांच्या खाजगी शिकवण्या लावून संस्कृतवर हुकमत मिळवली.

‘Who were the Shudras’ ग्रंथाच्या पान क्रमांक 9 वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की –

“I cannot claim mastery over the Sanskrit language, I admit this deficiency.”

मराठीत: “संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्याचा दावा मी करु शकत नाही. हा कमीपणा मी मान्य करतो.”

बाबासाहेबांच्या वरील विधानाचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘Who Were the Shudras?‘ या पुस्तकात त्यांना संस्कृत समजत नाही हे मान्य केले नाही, तर संस्कृतवर आपले प्रभुत्व नसल्याचे सांगितले आहे.

दत्तोपंत ठेंगडींच्या ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब’ या ग्रंथातील परिशिष्टामध्ये त्यांनी बाबासाहेबांचे संस्कृतचे ज्ञान व तत्कालीन संदर्भ दिलेले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशात याचा एक महत्त्वाचा उल्लेख आढळतो – आंबेडकर, भीमराव रामजी

डॉ. आंबेडकरांना वाचनाचा अतिशय नाद होता. विद्यार्थीदशेत त्यांना संस्कृतचे अध्ययन करता आले नाही. पुढे ते मुद्दाम चिकाटीने संस्कृत शिकले. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकणार नाही, असे त्यांना वाटे.
चर्चा करताना पाहिले आहे.

पंडित सोहनलाल शास्त्री यांच्या सोबत ते दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी संस्कृत भाषेविषयी चर्चा करत, संस्कृत भाषेत संवादही साधत.

अनेक लोक संस्कृत भाषेचा द्वेष करतात. मात्र त्यांना हे माहिती नसते की संस्कृत मध्ये केवळ ब्राह्मणी साहित्य नाही आहे, तर त्यापेक्षा कैक पटींनी अधिक महायानी बौद्ध साहित्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृतचे महत्त्व समजले होते, त्यामध्ये विविध प्रकारचे ज्ञान सामावलेले होते. म्हणून बाबासाहेबांना शालेय जीवनापासून संस्कृत शिकण्याची ओढ होती.

जर बाबासाहेबांना संस्कृतचे ज्ञान नसते तर कदाचित ते त्यांची पुढील तीन पुस्तके लिहू शकले नसते – Philosophy of Hinduism, Riddles in Hinduism, आणि Revolution and Counter-revolution in Ancient India. या पुस्तकांमध्ये संस्कृतचे संदर्भच संदर्भ दिलेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साधला संस्कृतमध्ये संवाद…
पश्चिम बंगालचे खासदार पं. लक्ष्मीकांत मैत्र यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी खात्री वाटत नव्हती. म्हणून पं. मैत्र यांनी आपल्या काही शंका संस्कृतमधूनच डॉ. आंबेडकर यांना विचारल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृतमधूनच पं. मैत्र यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा संवाद ऐकून घटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. ही बातमी तेव्हाच्या काही प्रमुख वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाली होती.
त्यांनी पूर्ण मनुस्मृती वाचली होती हे निश्चित आहे. मनुस्मृती दहन ही मोठी घटना होती, आणि याच्या खूप आधी म्हणजे विद्यार्थी दशेतच बाबासाहेबांनी मनुस्मृती वाचली होती.

‘मनुस्मृती का जाळली?’ यासंबंधी आपली भूमिका प्रकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारतात स्फुट लिहिले आहे. ते आपले विचार मांडताना लिहितात-

“आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे, त्यावरून आमची खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून असमानतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही; व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही. एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.

आमच्या मित्राचा दुसरा एक आक्षेप आहे की, मनुस्मृती ही जुन्या काळी अमलात असलेल्या नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर फार बरे झाले असते. आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हास तसे म्हणता येत नाही.”

मनुस्मृतीचे दहन हे बाबासाहेबांच्या ब्राह्मण अनुयायांनी केलेले आहे, हे ब्राह्मण अनुयायी संस्कृतवर प्रभुत्व असणारे होते.
https://dhammabharat.com/did-babasaheb-ambedkar-know-sanskrit-language/

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!