” ह्यात बदल कधी होणार?”

” ह्यात बदल कधी होणार?”
मला तर ठेवलंय कायम,
अडाणी भोळा,
अक्षरशत्रू म्हणुन कायमचा खुळा,
अंधश्रद्धेच्या भीतीने,
केलंय मनाने लुळा,
कोंबडे, बकरे, देऊन बळी,
म्हणे संकटे, व्याधी, पिडा टाळी,
नवसाने येते,
अपत्यासह झोळी.!
मला तर ठेवलाय कायमचा, अडाणी भोळा,
बिंबवलंय खोल मनावर,
बामन आला तोंडातून
क्षत्रिय अवतरला बाहुतून,
वैश आला मांडीतून,
अन राहिलेल्यांचा उगम झाला,
वरील सर्वांच्या सेवेसाठी,
अन तो ही तळपायातून. !
मग माय माझ्या,
माझं तेच अडाणी मन,
अडाणी मनालाच विचारू लागतं,
त्या महान सृष्टीकर्त्याने,
एकाच वेळी , लाखो, करोडो जीव निर्माण का केले नाही?
नर, नारीच्या समागमाशिवाय
अपत्य प्राप्ती का करता आली नाही?
मग त्याला प्रत्येक जिवाला जोडीदाराची निकड का वाटली?
मग हे कुणी भरवलं, मोकळ्या मठ्ठं, करून ठेवलेल्या डोक्यात?
होती मक्तेदारी शिक्षणाची,
फक्त ब्राह्मणांकडे,
स्वार्थासाठी त्यांनी,
पसरविले चहूकडे,
” ब्राह्मणाची वाणी, तीच देववाणी”
त्या भीतीपोटी
खोट्या, अकल्पित, कल्पना भरून
ठेवल्या बथ्थड केलेल्या मेंदूकडे.!
आता आपण एकविसाव्या,
विज्ञान युगात वावरतोय,
जगात झपाट्याने क्रांती होतेय,
मानव सूर्याकडे झेप घेऊ पाहतोय,
भ्रमणध्वनीने जगाला,
मुठीत घेतलंय,
जग नाना तर्हेने, अनेकानेक क्षेत्रात
विकसीत होऊन प्रगतीच्या मार्गाने चाललंय.!
आपण मात्र अध्याप ही वावरतोय,
त्याच मानसिकतेत,
आता ही तेहतीस कोटी देव ठाण मांडून बसलेय, आपल्याच देशात, मुक्या प्राण्यांचे,
बळी दिले जाताहेत,
नवसासाठी केस मुंडण केलं जातंय,
पापक्षालनासाठी गंगेत,
डुबकी मारली जातेय,
वट सावित्रीला पूजन केलं जातंय,
ती मनात नवर्याला शिव्या, शाप देतेय की आणखी काही?
कुणास ठाऊक?
मातीचा गणपती दूध पितोय,
संकटं टळून, धन वृद्धी व्हावी,
म्हणुन हजारोंची दक्षिणा देऊन, मातीच्या ” नाग बळीची”
पूजा केली जाते,
दासी देवाची, पण तिचा उपभोग सर्वच घेताय,
कावळा अन्नाला शिवल्या शिवाय,
मृतकाचे मन समाधानी होत नाही,
ह्यापेक्षा हास्यास्पद काय असू शकते.?.!
ह्यापेक्षा हास्यास्पद काय असू शकते.?!!
ह्यापेक्षा हास्यास्पद काय असु शकते?.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…24/02/2026.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



