
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्याध्यक्ष मा.धर्मभूषण बागुल यांनी या मेळाव्यास सविस्तर मार्गदर्शन केले.
मेळाव्याला उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आयु.महेंद्र जाधव होते.जिल्हा सहसचिव आयु.भाईदास गोलाईत यांनी सूत्रसंचालन केले.या मेळाव्यास ज्येष्ठ कार्यकर्ते आयु.देवीदासतात्या जाधव , आयु.व्ही.टी बागुल , तालुका प्रचारक अवधेश बागुल, शहराध्यक्ष विशाल पगारे,तालुका प्रचारक ज्ञानेश्वर बागुल , महेंद्र निकम , सौ.मायाताई अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.
छ.शिवाजी महाराजांचा संघर्ष कोणत्याही धर्मविरोधात नव्हता.महाराजांनी कधीही कोणतीही जात, कोणताही धर्म नजरेसमोर ठेवून राज्यकारभार केला नाही. महाराजांनी एखादा विशिष्ठ धर्म वाढवावा अशी भूमिका कधीच घेतले नाही. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन निव्वळ स्वराज्य नाही तर कल्याणकारी सुराज्य निर्माण केले होते.सध्या महाराजांच्या इतिहासाला धर्म आणि जातीचे स्वरूप देऊन विकृत स्वरूप दिले जात आहे.आणि भोळा भाबडा समाज त्यास बळी पडत आहेत.महाराजांचे खरे गुरु राष्ट्रमाता जिजाऊ आणि महान संत तुकाराम महाराज हेच होते. रामदास स्वामी, दादाजी कोंडदेव हे त्यांचे गुरु नव्हते. परंतु त्याबाबत खोटा इतिहास निर्माण करून तो कुनियोजित पद्धतीने तो लोकांच्या माथी घुसवण्यात आला. एका प्रसंगी छ.शिवाजी महाराजांना मंदिरात घुसण्यास का मज्जाव करण्यात आला ? त्यांचा राज्याभिषेक करण्यास तत्कालीन ब्राम्हणांनी का विरोध केला ? असा प्रश्न उपस्थित करून छ.शिवाजी महाराजांना जेवणातून विष देऊन कपट कारस्थान करून मारण्यात आले.युवराज संभाजी महाराजांना देखील विश्वासघात करून पकडून देण्यात आले.हा खरा इतिहास आता समोर आला आहे. या खऱ्या इतिहासाचे वाचन करून त्यावर चिंतन करणे आवश्यक आहे.
चातुर्वर्ण्य व्यवस्था या देशात 2 हजार वर्षापासून नियंत्रण करीत आहेत.या व्यवस्थेने देशात ब्राम्हण्यवाद बळकट केला असून छ.शिवाजी महाराज,युवराज संभाजी राजे , माता जिजाऊ , महात्मा फुले , सावित्रीमाता , राजर्षी शाहू महाराज यांचे सह सर्व संत महात्म्यांना ब्राह्मण्यवादांने सातत्याने छळले आहे. कायम त्यांच्याशी कपट-कारस्थान केले आहे.हा इतिहास देखील समजून घेणे आवश्यक आहे.
छ.शिवाजी महाराज , महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष वेगवेगळ्या कालखंडात लढले परंतु त्यांची विचारधारा एकच होती. हे सर्व मानवतावादी होते. समतावादी होते. परिवर्तनवादी होते. म्हणून या महापुरुषांना वेगवेगळ्या जातीत विभागण्याचे दुष्कृत्य करू नका असा प्रचार समता सैनिक दलाचे सैनिकांनी जाणीवपूर्वक करावा असे आवाहन धर्मभूषण बागुल यांनी केले.
या मेळाव्यात तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला तसेच तालुका महिला कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे –
तालुका उपाध्यक्ष – महेंद्र निकम,तालुका सचिव – सुभाष बनकर, तालुका सल्लागार – वेडू बागुल
, तालुका सल्लागार देविदासतात्या जाधव, तालुका सल्लागार – हसरत निकम , तालुका संपर्कप्रमुख – शरद अण्णा जाधव , तालुका संघटक – चिंतामण निकम , तालुका संघटक – राजरत्न मोरे, तालुका संघटक – चेतन जाधव , शहर प्रचारक – गोपाल भालेराव , शहर प्रचारक – संदीप बागुल ,तालुका प्रचारक – अनिल जाधव तालुका प्रचारक सुभाष निकम , तालुका प्रचारक – संभाजी महाले,तालुका प्रचारक – ईश्वर मोरे , तालुका प्रचारक – रवींद्र निकम, तालुका प्रचारक – विशाल मोरे, तालुका प्रचारक – किरण गायकवाड, तालुका प्रचारक – राहुल सोनवणे
, कन्नड तालुका – प्रचारक ईश्वर गायकवाड , कन्नड तालुका – प्रचारक रमेश वाणी
चाळीसगाव तालुका महिला कार्यकारिणी
महिला आघाडी
तालुकाध्यक्ष – सौ.मायाताई आहीरे तालुका उपाध्यक्ष – बेबाताई चव्हाण, तालुका सचिव – स्वातीताई थोरात
, तालुका संघटक – नेहाताई राठोड, तालुका प्रचारक – सौ.किरणताई मोरे
या मेळाव्याच्या आयोजनासाठी विशाल पगारे, अवधेश बागुल, ज्ञानेश्वर बागुल , कृष्णा जाधव , नाना घोडेस्वार , रवींद्र जाधव , मनीष बागुल , उमेश जाधव , चेतन जाधव , सौ. माया ताई अहिरे , रणवीर चव्हाण व घनश्याम बागुल यांनी परिश्रम घेतले.
आयु.विष्णू जाधव (बाबा मंडप) यांनी विशेष सहकार्य केले.
आपला
महेंद्र जाधव
तालुकाध्यक्ष
समता सैनिक दल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


