तुकोबाच्या हत्येचा पंचनामा

धुलीवंदन ! एक पूर्णसत्य !
लेखक : शैल जेमिनी कडू
तुझा नावाने शिमगा घालू का? का रे, माझ्या नावाने शिमगा करतोस? ह्या म्हणी तुम्ही सरांस ग्रामीण भागात ऐकल्या असतील. याचे खरे कारण शिमगा करणे म्हणजे.. खोटी बोंब उठविणे आणि नेमके हेच झाले आहे आमच्या जगत गुरु तुकोबांच्या बाबतीत.
मनुवादी, सनातनी आणि कर्मठ असलेल्या भटांनी प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या, आपल्या अभंगातून लोकांचे प्रबोधन करून लोकांना खरा ‘देव’ दाखविणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना कायमचे वैकुंठात पाठविण्याच्या खोट्या पराक्रमाला शिमगा घालू का? असे म्हणतात. हि म्हण सोळाव्या शतकात प्रचलित झाली आहे.
धार्मिक सण होळी.. धुळवड.. आणि याच वेळेस धुलीवंदन या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कंपूने तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत महाराजांचा देह सोडून दिला. अन नंतर अशी आवई उठवली कि, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले.
इंद्रायणीच्या डोहात रडले मासे
सांगा ओ सांगा वैकुंठीचे विमान कसे होते?
सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक गरूड होता यावर कोणत्याही जिवंत माणसाचा विश्वास बसणार नाही, कारण तेव्हा तंत्रज्ञान जन्माला आले नव्हते. प्रगत नव्हते.
तुकाराम महाराज यांची हत्या करताना ‘पांडू मांग’ नावाच्या तरुणाने बघीतली होती. गावात येवून त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होते. पण भटांनी आवई उठवली महाराज वैकूंठाला गेले, बरे गेलेच असे समजले तरी ते भटांच्या पोथीनुसार. एकादशी सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीला अभद्र दिवशी का गेले होते?
ते विमान वैकूंठावरून आले होत म्हणे. मग आतापर्यंत च्या इतिहासात एकदाच का आले? मग आता काय त्याची फेरी बंद पडली का? कि वैमानिक फरार आहे?
बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकूंठाला गेले मान्य आहे, मग सर्व जगात फक्त तुकाराम महाराज यांचा बोलबाला व्हायला पाहीजे होता. एकाही बामणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव का येत नाही?
सर्व बामन रामदासाला गुरु मानतात. किती ब्राह्मण देहुला दर्शन घ्यायला जातात?
आळंदी इतका विकास देहूचा का झाला नाही? कारण ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण व तुकाराम कुणबी मराठा. बहुजन होते हे मराठ्यांनो का लक्षात घेत नाही? उभ्या जगात ही एकमेव घटना घडली मग बामणांच्या तोंडी रामदासाचेच का नाव येते? आषाढी एकादशीला ज्ञानेश्वरांच्या पालखी समोर, तुकोबाची आरती का होवू दिली जात नाही?
नाही वैकुठासी गेला,
तुका मारुनी टाकला !
डाव्या हाताचा कलंक,
उजव्या हातानी झाकला !
अंधश्रद्धा, कर्मकांड आणि वैदिक व्यवस्थे विरुद्ध तुकोबांनी बंड केले होते. ते विद्रोही होऊन लोकांना जागृत करीत होते. तुकोबांचे अभंग लोकांच्या तोंडपाठ झाले. दिवसेंदिवस तुकाराम महाराज यांची लोकप्रियता वाढत होती. लोकांना कर्मकांड, थोतांड यातील सत्य समजू, उमजू लागले. याउलट सनातनी आणि भोंदू लोकांची दुकाने बंद पडू लागली, लोक त्यांना झिडकारू लागले. याचा राग येवून तुकारामांची हत्या मंबाजी भट व इतरांनी केली व आवई उठवली कि, तुकाराम वैकुंठाला गेला !
इंद्रायनीचा मासा विचारतो नभा
वैकुंठाला तुका नेला कैसा ।
माझा भोळा देव कारे तु चोरला
मोह कैसा आवरला नाही तुला ।
मारोनी त्यासी भट झाला थोर
जीवासी खेळ कैसा केला ।
दादा म्हणे माझा तुका देहभाव
गाथा रुपी अमर जगी झाला ।
©️ खरा इतिहास
लेखक : शैल जेमिनी कडू
संदर्भ : तुकोबाच्या हत्येचा पंचनामा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत