परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द

परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीची चळवळ सुरू केली.जनजागृतीच्या माध्यमातून आपला विचार जनतेत रूजविला.जनतेत वैदिक संस्कृति विरोधात लाट निर्माण झाली.लोक संघटित रित्या जाणिवपूर्वक संघर्ष करण्यास सुरुवात केली.धाक निर्माण झाला. सर्व शोषित जाती एकत्रीत येऊन संघर्ष करावा ही अपेक्षा होती.तशा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. त्याला काहीप्रमाणात यश आले मातंग व चांभार जाती एकत्रीत येऊन चळवळ सुरू केली.
शेतकरी शेतमजूर मिल मजूराची मोट बांधून वयवसथे समोर आव्हान बाबासाहेब आंबेडकरांनी उभे केले..
सामाजिक लढे लढत असतानाच राजकिय पक्ष उभा करण्याचा संकल्प करुन 15/8/1936ला स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना करून एक वर्षात मुंबई प्रांतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 15आमदार व मध्य प्रदेश विदर्भात एल एन हरदास यांच्या नेतृत्वात 7आमदार निवडणूक जिंकून आले. स्वतंत्र मजूर पक्षाचा दबदबा निर्माण झाला.1942ला क्रिप्स यांच्या नेतृत्वात भारतात आयोग आले त्यांनी सर्वांना आपले म्हणने मांडण्याची संधी दिली परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी तुम्ही स्वतंत्र मजूर पक्षाचे असल्यामुळे तुम्ही अस्पृश्य समाजाचे प्रश्न मांडू शकत नाही. म्हणून 1942ला शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली.व ह्या संघटनेच्या वतीने अस्पृश्यांच्या समस्या मांडल्या. स्वातंत्र्य भारताची राज्य घटना तयार करण्या साठी निवडणूक झाली त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला. पश्चिम बंगाल मधून मंडल यांनी निवडून आणण्याची जबाबदारी घेतली व निवडून आणले.बाबासाहेबाचा संविधान सभेत प्रवेश झाला.व त्यांच्यावर संविधान तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली व त्यांनी उत्कृष्ट संविधान देशाला समर्पित केले.
30/9/1956ला 26अलीपूर दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय शेडयूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची सभा बोलावून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शेडयूल कास्ट फेडरेशन पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पक्षाचे निर्माण करावे असा एकमताने ठराव पारीत करण्यात आला. त्याची विस्तृत बातमी प्रबुद्ध भारत पत्रात छापून आली.
6/12/1956ला बाबासाहेब आंबेडकर याचे महापरिनिर्वाण झाले.समाजावर शोक कळा पसरली. या दुःखातून सावरण्याआधीच 30/व/31डिसेबर1956व1जानेवरी1957ला शेडयूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची सभा अहमदनगर पुणे येथेआयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. पहिल्या दिवशी शोक संदेश देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली. व सभा स्थगित करण्यात आली. दुसर्यादिवसी सभा सुरूवात झाली व आढावा घेण्यात आला.1जानेवारी1957ला प्रेसिडीयम तयार करण्यात आली.व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.व सचिव निवडण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले.व त्यांनी अँड हरिदास आवळे बांबू यांची निवड केली.
1957चीनिवडणूक संयुक्त महाराष्ट्र समिती सोबत युती करण्यात आली.व निवडणुकीत भरघोस यश प्राप्त झाले.
नागपूर मधून पंजाबराव शंभरकर व कामरेड ए बी. बर्धन निवडून आले.
3/10/1957ला शेडयूल कास्ट फेडरेशनचचेअधिवेशन पवित्र दीक्षाभूमीवर घेण्यात आले.व रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली.
रिपब्लिकन पक्षाचे वतीने1963/64ला भुमीहीनाचा सत्याग्रह करण्यात आला. सत्याग्रहींना जेल अपूरे पडले त्यांचा परिणाम देशभर झाला.
1967ला निवडणुका झाल्या रिपब्लिकन पक्षाला भरघोस यश मिळाले . उत्तर प्रदेश पंजाब व बिहार मध्ये रिपब्लिकन पक्षाचे निवडून आलेले आमदार सरकारमध्ये मंत्री झाले .रिपब्लिकन पक्ष विरोधीपक्ष म्हणून गणना होऊ लागली.
दादासाहेब गायकवाड यांनी दिल्ली येथे सभा बोलावून काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचे युतीचा ठराव मांडला दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकर नंतर एकमेव नेते होते त्या ठरावाला विरोध झाला परंतु दादासाहेब गायकवाड यांच्या प्रभावामुळे ठराव पास झाला.
आंबेडकरी मोहल्यात पांढरी टोपी घालून काँग्रेस पक्षाच्या लोकांची हिम्मत होत नव्हती काँग्रेसचे हरिजन सुद्धा सरळ रस्त्यांनी जाण्याची हिंमत करीत नव्हते तर मागच्या रस्त्याने प्रवेश करिता होते.इतकी दहशत आंबेडकरी जनतेची होती. ती काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाचे युतीने कमी केली.व सत्तेचे प्रलोभन दाखवून अनेक रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आपल्या नांदी लावले.जी सत्तेचे विरोधी लढण्याची धार होती ती बोथड झाली. रा सु गवत ई आयुष्यभर सत्तेचे
भागिदार राहून पदे भोगली.व रामदास आठवले तोच धागा पकडुन सत्तेचे उपभोग घेत आहेत.
1970ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचे युतीला विरोध केला म्हणून त्यांना सरचिठणिस पदावरून काढले वना.ह कुंभारे यांना रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस केले राजाभाऊ खोब्रागडे व अँड हरिदास आवळे यांनी सोबत येऊन काँग्रेस पक्षाच्या विरोधी भुमीका घेतली.वदोघेही जिवनाच्या अंतीम वेळेपर्यंत काँग्रेस पक्षाच्या विरोधी होते.
आज आंबेडकरी जनतेचा येथील बुदधीजिवी लोक काँग्रेसमय करण्याचा विडा उचललेला आहे तशी मानसीकता तयार करण्याचे प्रसार माध्यमे करीत आहे.व अश्याच लोकांचे लेख प्रामुख्याने छापले जाते.
निळी टोपी निळे दूपपटे सर्वच पक्ष वापरित आहे कारणं त्यामुळे आंबेडकरी जनतेचे मते मिळत असते.
ह्या विरोधात सुजान व निष्ठावान आंबेडकरी जनतेने ह्या विरूद्ध उठाव करावे.
विनायकराव जयवंतराव जामगडे
9372456389
7823093556
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत