शिक्षण विभागाने विद्यार्थांची गुणवत्ता चाचणी करा नाहीतर IAS तुकाराम मुंढेना आठवण करा ?

धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेवर काही शाळेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय
शिक्षण विभागाने विद्यार्थांची गुणवत्ता चाचणी करा नाहीतर IAS तुकाराम मुंढेना आठवण करा ?
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे . शिक्षण व्यवस्थे बाबत अनेक पालक, विद्यार्थी आणि नागरिक चिंता व्यक्त करतात. शैक्षणिक दर्जा घसरणे, विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष न देणे, अध्यापनातील त्रुटी, शिस्तीचा अभाव, तसेच गैर प्रकारां बाबत तक्रारी आल्यास त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्य खुप चांगल्या शाळा आहेत या शाळे मध्ये पारदर्शक प्रशासनासाठी शिक्षक कमी पडतात धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा तशा नाहीत पण काही शाळा सुद्धा गुणवत्ता धारक आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व सन्माननीय पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
शिक्षण विभागांमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे
जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिस्त व नियमाचे पालन केल्याचे दिसुन येत नाहीत गैर प्रकारांवर शिक्षण विभागाच्या वरिष्ठानी कारवाई करण्याची भूमिका घेतली पाहिजे अलीकडे अन्न व औषध प्रशासन विभागातही महाराष्ट्राचे धडाकेबाज I A S अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कठोर कारवाई केली आहे
कोणत्याही विशिष्ट शिक्षक, शाळा किंवा शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी अधिकृत पणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची चौकशी करणे आजच्या काळाची गरज आहे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील बाबींवर भर देणे गरजेचे आहे
शिक्षकांची नियमित उपस्थिती आणि जबाबदारी निश्चित करणे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यकतेनुसार बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच विद्यार्थांच्या गुणवत्तेचे सातत्याने मूल्यमापन
शाळां मधील गैर प्रकारांवर वचक बसेल आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर पालकांचा विश्वास वाढेल आणि संवाद ही वाढेल ग्रामीण आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साधन सामग्री वाढवणे विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतींचा अवलंब करणे
धाराशिव शिक्षण विभागाने गुणवत्ता, पारदर्शकता आणि शिस्त यांना प्राधान्य दिल्यास शिक्षणाचा दर्जा निश्चितच उंचावू शकतो.
जिल्हा परिषदेच्या सर्रास शिक्षकांचे मुले जिल्हा परिषदेची शाळा सोडून इतर खाजगी शाळेत प्रवेश घेतात तेही पर जिल्ह्यात मग शाळा कशी सुधारणार
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांची प्रेरणा
त्यांचा आदर्श हे समोर आले पाहिजे आसे आसेल तरच शिक्षण विभाग नक्कीच पुढे जाणार
काही शाळांत जर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट होतो या मुख्य विषयावर अंकुश कोणाचा मग या बाबत शिक्षण विभागाने कसुन चौकाशी करा विद्यार्थीची स्वतः चाचणी घ्यावी कारण विद्यार्थांच्या गुणवत्ते वरून शिक्षकांची गुणवत्ता कळते .
जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या कॉपी मुक्त झाल्या पाहिजे मी ही बातमी अनुभवातून लिहितोय नाहीतर आम्हाला महाराष्ट्राचे धडाकेबाज कर्तव्यदक्ष I A S तुकाराम मुंढे यांना आठवण करावे लागणार यात काय शंका नाही
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



