बुद्धाची भुमी म्हणुन भारताची जगभरात ओळख.-केशव कांबळे.


माणुस केंद्रबिंदु माणुनमाणसाचं मनप्रधान आहे. त्या मनाला निर्मळबनवणारे तत्वज्ञान भ.बुद्धाने सांगितले .माणसातील राग ,लोभ,द्वेष हे विकार मानव जातीला नाशाकडे घेवुन जातात तर प्रेम ,करुणा,शांती ,बंधुत्वाचा विचारमाणसाला श्रेष्ठत्व बहालकरतात. समतेमुळे माणुस जोडला जातो तरविषमतेने माणुस माणसापासुन तोडला जातो,म्हणुनसमताधिष्ठीत समाजरचनाहि बुद्धाची जगाला देण आहे. याचमहान तत्वज्ञानाकडे जग आकर्षित झाले म्हणुन आज भारतालाजग बुद्धाचीभुमी म्हणुन ओळखते. आसे मनोगत व्यक्त केले. शेवटी धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
लातूरः दि.२३.
२५६८व्या बुद्धजयंती निमित्तानं वैशाली बुद्धविहार बौद्धनगर लातूर येथे धम्मध्वजारोहण व सामुदायिक बुद्धवंदनेचाकार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुर्यभान लातूरकर,दामु कोरडे,अशोकराव सातपुते,जगन्नाथ सुरवसे,यांचे हास्ते भ. बुद्धाच्या प्रतिमेस व डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प-धुप-दिपाने पुजा करण्यात आली तर सुर्यभान लातूरकर यांचे हास्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना केशव कांबळे म्हणाले की ,बुद्ध हा भारताचा भुमीपुत्र आहे.सिद्धार्थ गौतमाने राजवैभवाचा त्याग करुन समाजात आसणार्या कलहा वर लक्ष केंद्रित करुन
माणसा-माणसातला कलह कसा नष्ट होईल ? याविचाराने चित्ताची एकाग्रता साधुन वैशाख पौर्णिमेला नव्या ज्ञानाची प्राप्ती करुन ते सम्यक सम्बुद्ध झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत