डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आधुनिक बुद्ध

- हर्षवर्धन ढोके
ज्ञान प्राप्तीपापूर्वी सिद्धार्थ फक्त बोधिसत्व होते. ज्ञान प्राप्तीनंतर ते बुद्ध झालेत.
बोधिसत्व म्हणजे काय ?
बोधीसत्व म्हणजे बुद्ध होण्यासाठी प्रयासरत असणारा व्यक्ती.
बोधिसत्वातून बुद्ध कसा होतो ? म्हणजेच बाबासाहेब बुद्ध कसे बनलेत ते पाहूया.
बुद्ध होण्यासाठी व्यक्तीला बोधिसत्वाला दहा पायऱ्यातून जावे लागते. बुद्धत्व प्राप्तीसाठी नुसत्या दहा अवस्थाच नाही, तर दहा पारामिता सुद्धा पूर्ण कराव्या लागतात.
या दहा पारामिता अशा आहेत:- १) शील २) दान ३) उपेक्षा ४) नैष्क्रम्य ५) वीर्य ६) शांती ७) सत्य ८ ) अधिष्ठान ९) करुणा १०) मैत्री
या सर्व पारामिता बाबासाहेबांनी पूर्ण केल्या होत्या. कुणीही असे म्हणू शकत नाही बाबासाहेब या पारामिता सारखे नव्हते.
चला पाहूया बुद्धत्व प्राप्तीच्या पुढील दहा अवस्था कोणत्या आहेत.
????1) मुदीता :- (आनंद) प्राप्त करतो.
या अवस्थेत चित्ताची पूर्ण शुद्धी होत असते. ज्याप्रमाणे सोनार सोने शुद्ध करुन चकाकी देतो अगदी तसे. अशा अवस्थेत मनुष्य प्रमादचा (तीव्र इच्छा,आकांक्षा) त्याग करीत असतो. प्रमाद त्याग होताच तो चंद्रासारखा मृदु किरणांनी जग प्रकाशीत करतो. त्याच्या मनात सर्व प्राणीमात्रांच्या सुखाचा विचार येतो आणि तो त्यासाठी मार्गक्रमण होतो.
प्रश्न :- काय बाबासाहेब असे होते ? ????
उत्तर :- होय बाबासाहेब अगदी असेच होते.
????2) विमलता :- (पावित्र्य)
दुसऱ्या अवस्थेत मनाचे पावित्र्य प्राप्त करतो. वासना व विकारापासून मुक्ती प्राप्त केलेली असते. त्याच्या चित्तात करुणा वसते. तो सर्वांची करुणा व्यतीत करतो. तो अवगुणांची मिथ्या (खोटी) स्तुती करीत नाही किंवा सद्गुणांना निरुत्साही करीत नाही.
प्रश्न :- काय बाबासाहेब असे होते ? ????
उत्तर :- होय बाबासाहेब असेच होते.
????3)प्रभाकारी :- (तेजस्विता)
तिसऱ्या अवस्थेत बोधिसत्व तेजस्विता प्राप्त करतो. बोधिसत्वाची प्रज्ञा दर्पणासारखी पारदर्शी असते. त्याला अनात्म (आत्मा नाही) आणि अनित्य (सर्व नश्वर असणे) याचे ससंपूर्ण ज्ञान प्राप्त झाले असते. श्रेष्ठतम प्रज्ञा प्राप्त करणे हीच त्याची एकमेव आकांक्षा असते. त्यासाठी कोणताही त्याग करण्यास तो तयार असतो.
प्रश्न :- काय बाबासाहेब असे होते? ????
उत्तर :- होय बाबासाहेब असेच होते.
ज्ञान प्राप्तीसाठी काहीही त्याग करण्याची बाबासाहेबांची तयारी होती. जगातील सर्व विषयांचे ज्ञान बाबासाहेबांना होते. अनात्म आणि अनित्य त्यांना कळले होते. जगात ईश्वर नाही जग हे उत्क्रांत होते हे बाबासाहेबांना याचे यातर्थ ज्ञान बाबासाहेबांना होते.
????4)अच्रिश्मती :- (प्रखर बुद्धीमत्ता)
या अवस्थेत तो प्रखर बुद्धीमत्तेला प्राप्त होतो. तो अष्टांगीक मार्ग अनुक्रमण करतो. चित्त एकाग्र करतो.
विचारांच्या आणि प्रयत्नांच्या चार आयामावर तो चित्त एकाग्र करतो. इच्छाशक्तीच्या चार, तर शीलाच्या पाच आयमावर तो चित्त एकाग्र करतो.
प्रश्न :- काय बाबासाहेब प्रखर बुद्धीमत्ताप्राप्त होते ?????
उत्तर :- होय ते असेच होते.
????5) सदुर्जय :-
म्हणजे सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील सहसंबंधाची त्याला पूर्णत्वाने अनुभूती होणे.
प्रश्न:- काय बाबासाहेबांना जागतिक सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्या सहसंबधाची जाण झाली होती?????
उत्तर :- होय झाली होती.
????6) अभिमुखी :-
या प्रक्रियेत वस्तुंच्या उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेण्याची सिद्धता येणे. कारणामिमांसा बारा निदान आणि त्याचे ज्ञान याची जाणीव होणे.
प्रतित्यसमुत्पाद यालाच दुसऱ्या शब्दात ‘कार्यकारणभाव’ म्हणतात. हा बौद्ध तत्वज्ञानात मध्यवर्ती सिद्धांत आहे. जग आणि मनुष्य कसा निर्माण झाला आणि कसे विनाश होईल; असा हा सिद्धांत सांगतो. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. घडलेल्या गोष्टीचा परिणामही असतो. कारण नष्ट केले तर परिणामही नष्ट होतात.असा हा सिद्धांत सांगतो.
उदा:- प्रेम नाही तर वेदना होणार नाही. प्रेम नष्ट झाल्यास होणाऱ्या वेदनाही थांबतील. प्रेम कारण, तर वेदना परिणाम.
प्रश्न :- काय बाबासाहेबांना हे जग कसे निर्माण झाले, कसे नष्ट होणार याचे ज्ञान प्राप्त झाले होते ? प्रतित्यसमुत्पाद त्यांना कळला होता?????
उत्तर :- होय,१००% कळला होता.
????7) दुडग्गम:- काळाच्या व व्याप्तीच्या पलिकडे जाणे.
ही अवस्था बोधिसत्वाला अनंताशी एकरुप करते. तरीही प्राणिमात्रांच्या करुणेचा आणि त्याच्या सुखाचा तो सतत विचार करतो. सर्व नश्वर असल्यामुळे त्याची तृष्णा नष्ट होते. तो आपल्या बंधुभावाच्या कल्याणाचीच कामना करतो. तो दातृत्वदान असतो. शांत असतो. तो विर्यशील (प्रयत्नशील) असतो. तो क्षमाशील असतो. तो बुद्धीवंत असतो आणि प्रज्ञावंतही असतो.
प्रश्न :- काय बाबासाहेब असे होते ?????
उत्तर :- होय, ते असेच होते.
???? 8)अचल :-
या आठव्या अवस्थेत तो अचल अवस्थेला प्राप्त होतो. सर्व प्रकारच्या संघर्षापासून मुक्त होतो. त्याच्या हातुन फक्त कुशल कर्म होतात. तो जो काही करतो त्यात तो यशस्वी होतो.
प्रश्न:- काय बाबासाहेब असे होते ?????
उत्तर- होय.
???? 9)साधुमती :-
साधुमती अशी अवस्था असते ज्या अवस्थेत बोधिसत्वाने सर्व धर्म किंवा प्रणालीवर विजय मिळविला असतो किंवा त्यास भेदले तरी असते. त्याने समयचक्रावर विजय मिळविला असतो. त्याच्या विद्वत्तेचा सुगंध चारही दिशेला दरवळत असतो.
प्रश्न : काय बाबासाहेब असे होते ?????
उत्तर :- होय ,बाबासाहेबांचे नाव चारही दिशेला गुंजत आहे. ते असेच होते.
????10) धम्ममेधा :-
या शेवटच्या अबस्थेत तो धम्ममेधाला प्राप्त होतो. या अवस्थेत त्याला बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते.
प्रश्न:- कुनी असे म्हणू शकतो की बाबासाहेबांना त्यांच्या सततच्या अभ्यासातून दिव्य दृष्टी प्राप्त झाली नव्हती.?????
उत्तर :- कुनीच नाही म्हणू शकत. बाबासाहेबांचे विचार सुद्धा बुद्धासारखे त्रिकालाबाधीत शाश्वत सत्य ठरलेत. काळाच्या कोणत्याही कसोटीत ते खरे उतरतील.
काय कुणी म्हणू शकतो का! की बाबासाहेबांना विशिष्ट प्रकारचे ज्ञान नव्हते. उलट जगात फक्त बाबासाहेबांना सर्व विषयाचे सर्वच क्षेत्राचे ज्ञान होते. जागतिक विद्वानात बाबासाहेब अग्रेसर आहेत बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी बोधिसत्वाला दहा अवस्थेतून जावे लागते. श्रेष्ठतम जीवनाचा असा सिद्धांत कुठेही नाही. याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा अन्य कोणताच सिद्धांतच नाही. बौद्ध धर्माशिवाय अन्य कोणताही धर्म त्या धर्माच्या संस्थापकासाठी अशी कठोर परिक्षा घेणे आवश्यक मानत नाही.
बाबासाहेब नुसते बोधिसत्व राहीले नव्हते, ते बुद्ध बनले होते. आज जर सिद्धार्थाने जन्म घेतला असता तर तो बाबासाहेबांसारखा असता. सिद्धार्थ जन्मता बुद्ध नव्हता. ते त्याने वयाचे 29 ते 35 वर्षातील प्रयत्नाने प्राप्त केले. बाबासाहेबांनीही ही अवस्था मेहनत आणि सततच्या प्रयत्नातून प्राप्त केली आहे. बाबासाहेब हेच आधुनिक बुद्ध ठरतात.
आपणही माझ्या मताशी सहमत असावे, असे नाही.
✍???? हर्षवर्धन ढोके
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत