साहेबांनी शब्द फिरवला, पण मी पाळला – पहाटेच्या शपथविधी वर अजित पवारां ची स्पष्टोक्ती

बारामती : पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.. पहाटेच्या शपथविधीआधी अमित शाहा, फडणवीस, एक उद्योगपती, शरद पवार आणि मी यांच्यात 5 ते 6 बैठका पडल्या होत्या. मात्र मुंबईत आल्यानंतर अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला. मी मात्र शब्दावर ठाम राहात शपथ घेतली असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. शरद पवारांनी मात्र अजित पवारांचा दावा खोडून काढला आहे. तर, भाजपसोबत जाण्यासाठी आमची संमती कधीच नव्हती आणि नसेल असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.
सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या, तर आम्ही काय केलं? असा सवाल अजित पवारांनी केलाय. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर निशाणा साधलाय. शरद पवारांनी मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाल्याचं सांगत रोहित पवारांवरही टीका केली. आता तो सांगतो की साहेबांनी सर्व संस्था काढल्या. 31-32 वर्षे मी नुसताच शांत बसलो. मी काहीच केलं नाही का?. बारामती जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली. माझा काडीचाही संबंध नाही? असा सवालही त्यांनी विचारला.
विरोधक जे आरोप करायचे तेच आरोप अजित पवार आता शरद पवारांवर करत आहेत. दाऊदशी संबंध आणि भूखंडाचं श्रीखंड खाल्लाचा जुना आरोप अजित पवारांनी उकरून काढला आहे. राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर काका आणि पुतण्यामधला संघर्ष तीव्र झाला आहे. आता तर बारामतीमधल्या साखर कारखान्यांवरुन अजित पवारांनी शरद पवारांवर तोफ डागली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत