गांधीवाद बनाम आंबेडकरवाद

*प्रकाश तक्षशील* ✍️
*9284146030*
सुरेश द्वादशीवार ( संपादक) यांचे विचार साहित्य संमेलन मध्ये दिलेले भाषण ” मॅक्स महाराष्ट्र” या u ट्यूब चॅनल वर 7 दिवसापूर्वी प्रसारित झालेले ऐकले.
सदर भाषण हे गांधी भक्तीनी ओतप्रोत भरलेले असून भाषणाचा सार हा गांधीला कुणीही न्याय देऊ शकले नाही, असाच होता.
यासाठी त्यांनी त्यांनी भारतीय समाजाची चार वर्गात विभागणी केली.
1.समाजवादी (मार्क्सवादी) 2. आंबेडकरवादी 3. हिंदुत्ववादी व 4. गांधीवादी. यावरच त्यांचे भाषण होते की कसे या तीन वर्गानी गांधींसोबत अन्याय केला.त्यांनी गांधीवादी लोकांवर पण आक्षेप घेतला की आज कुणीही गांधीवाद्यानी गांधीचे चरित्र लिहिले नाही. या संपूर्ण भाषणात त्यांनी सर्वात जास्त ताशेरे हे आंबेडकरवादी लोकांवर उठवले. आंबेडकरवादी हे उच्चार करताना त्यांच्या मनात या लोकांविषयी किती कटुता भरली आहे, हे त्यांचे भाषण ऐकले की स्पष्ठ पने जाणवते.
त्यांच्या भाषणातील काही ठळक संक्षिप्त मुद्दे ..
1. आंबेडकरांनी गांधींना इतक्या शिव्या दिल्या तसेच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग पण घेतला नाही, तरी गांधी, नेहरू तथा पटेल नी त्यांना घटनेचे शिल्पकार बनविले.
1(a) बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही.
संपादक महोदय, काँग्रेस आणि गांधी हे कुणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, हा प्रश्न तुम्हाला विचारने मी जरुरी समजतो.कारण देश हा गुलामच राहिला तरी चालेल परंतु अस्पृश्याना मात्र सुवर्ण हिंदूच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ द्यायचे नाही हीच तर गांधीची निती होती.
अस्पृश्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही हे खरं आहे. परंतू या मागच कारण पन जानुन घेणे जरुरी आहे की, अस्पृश्यांसाठी त्यांचे खरे स्वातंञ्य का़य आहे ? अस्पृश्यतेच्या बेडीतून, त्यांच्यावर लादलेल्या गुलामगीरीतुन कायमची सुटका.ज्या स्पृश्यांनी त्यांच्यावर ही गुलामगीरी लादली, कुत्रे मांजरा पेक्षाही त्यांची दयनिय अवस्था करुन टाकली,अश्या लोकांच्या नियंञित राज्यात राज्यकर्ते ब्राह्मण, बनिया तसेच इतर सुवर्ण असतील, त्यांच्या पेक्षा कनिष्ठ जातीचे हिंदू हे पोलीस विभागात, तहसील ऑफीस, नगर परिषद मध्ये कार्य करतील आणि हे सर्वच वंशपरंपरेने अस्पृश्यांचे शञुच आहेत, हे सर्वविदित असल्याने अश्या स्वराज्यामध्ये आपले अजुन काय हाल करतिल, ही भीती त्यांना सतावित होती. त्यांचे मन कधी परिवर्तित होतील याच आशेवर हमेशा गुलाम बनून च राहावे लागेल अशी अस्पृश्यांच्या मनात असलेली ही भीती निरर्थक होती,असे तुम्ही म्हणु शकता काय? जेव्हा त्यांचे शासन नसुनही हे हाल आहेत, तर मग त्यांच्या हाती सत्ता आल्यावर ते का़य करतील ही त्यांना वाटनारी भीती तुम्ही विनाकारन म्हणनार ?
त्यांना हेच वाटते की कॉंग्रेसनी त्यांच्या संविधानिक सुरक्षा प्रावधानाची हमी द्यावी. जर त्यांनी हमी दिली असती तर अस्पृश्यांनी स्वातंञ्याच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला असता.स्वातंञ्य मिळाल्यावर यावर विचार करता येईल, म्हणने म्हणजे निव्वळ त्यांची फसवनुक होय. ते कसे काय त्यांच्यावर विश्वास ठेवतील? यासाठी गांधीने अस्पृश्य समाजाचा विश्वास संपादन करायला हवा होता, परंतु ते तर वेळोवेळी त्यांच्या सोबत धोकाच करत आले. गांधीने त्यांच्या सोबत केलेली धोकेबाजी ते कसे काय विसरतील?
अस्पृश्यांना स्वातंञ्य लढ्यात सक्रिय सहभाग न नोंदविन्यासाठी तर सबळ कारण होते परंतु तुम्हच्या त्या हिंदुत्ववाद्या जवळ काय कारण होते स्वातंञ्य लढ्यात सहभागी न होन्याचे? काय मुस्लिम तथा ख्रिश्चनांनी सहभाग नोंदविला होता ? मग हे खापर फक्त बाबासाहेबावरच का फोडता? बाबासाहेबांनी तर स्पष्ठपने संविधान सभेमध्येच म्हटले होते की, जेव्हा देश हिताची व अस्पृश्य हिताची बाब समोर येईल तर मी अस्पृश्यांच्या हिताला प्राधान्य देईल व माझ्या हिता पेक्षा मी देश हिताला प्राधान्य देईल.
गांधी आणि त्यांचे सहयोगी हे फक्त सत्तेचे भुकेले होते. केव्हा इंग्रज जातील व केव्हा आम्ही राज्य कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेऊ असे त्यांचे झाले होते. परंतु हजारो वर्षापासून जे लोक गुलामीचे जीवन जगत होते, त्यांचे काय झाले असते ? याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल ?
1(b). गांधी नेहरू पटेल यांनी बाबासाहेबाना घटनेचे शिल्पकार बनविले ?
कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेण्यास तुम्ही अव्वल आहात. ज्या लोकांनी बाबासाहेब संविधान सभेमध्ये निवडून न येवो म्हणून जिवाचे रान केले व तरीही बाबासाहेबाना निवडून आनले तर त्याचे श्रेय पण त्याच लोकांना देता ? घटना समितीवर बाबासाहेब कसे निवडून येते ते पाहतो, अशी स्पष्ठ धमकी देणारे पटेलच होते.महाराष्ट्रा मधूनच काय इतर कुठूनही शे.का.फे. चा एकही विधायक ,शिवाय पश्चिम बंगाल सोडून नव्हते.त्यामुळे बाबासाहेब निवडून येण्याचा तर प्रश्नच नव्हता.परंतु पश्चिम बंगालमधून निवडून आणण्याची ग्वाही जोगिंदर नाथ मंडल यांनी दिली व ते तेथून आरामशीर निवडून पण येणार होते.कारण तेथे कूल 30 विधायक हे अनु.जातीचे होते.त्यामध्ये जोगिंदर नाथ मंडल हे एकटेच शे.का.फे.चे होते बाकी 27 हे काँग्रेसी होते तर उर्वरित 2 विधायक हे स्वतंत्र होते. बाबासाहेब मुळेच (पूना करार) ते मंत्री बनले होते,याची त्यांना जाणीव होती,त्यामुळे ते बाबासाहेबाना वोट देण्यास इच्छुक होते. परंतु पटेल यांना ही माहिती मिळताच त्यांनी व्हिप काढला की,” कुणीही काँग्रेसी विधायकानी बाबासाहेबाना वोट करू नये, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल.” काय हे सर्व बाबासाहेबा विरुद्ध चाललेले कट कारस्थान नेहरू तथा गांधीना माहीत नव्हते ? संपादक महोदय तुम्ही तर गांधी सोबत नेहरूंना पण असामान्य माणूस म्हणून संबोधतात. कुठे गेली होती त्यांची ती महानता ?
बाबासाहेब निवडून आलेला मतदार संघ खुलना हा पाकिस्तानात गेल्यामुळे बाबासाहेबाना मुंबई मधून बाळासाहेब खरे (मुंबईचे पंतप्रधान) यांनी संविधान सभेमध्ये निवडून आणले, हे सर्वांना माहीत आहे.परंतु ह्या तिकडी (गांधी,पटेल,नेहरू) च्या मनात असे काय एकदम परिवर्तन झाले की त्यांनी चक्क काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला राजीनामा द्यावयास सांगून त्यांच्या रिक्त जागेत बाबासाहेबाना निवडून आणले? त्यांना हे सर्व विवशतावश करावे लागले. त्यांच्या समोर पर्यायच नव्हता.
आंबेडकरवादी हे गांधीला शिव्या देतात, यामुळे यांच्या मनात आंबेडकरवादी लोकांविरुद्ध द्वेष भरलेला दिसतो व संपूर्ण भाषणात ते जागोजागी व्यक्त करतात.परंतु त्यांचे आराध्य महात्मा गांधी यांची हत्या करणारे व आज ही गांधी ची वैयक्तिक रुपात खूप खालच्या थराला जाऊन शिव्या शाप करणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांबद्दल बोलायला तुमची जीभ जड का होते ? भीती वाटते न?
2. संपादक महाशयाचा आरोप आहे की आज पर्यंत कुन्याही साहित्यिकांनी गांधीचे चरित्र का नाही लिहिले ?
संपादक महोदयांनी संपूर्ण आयुष्य हे पत्रकारिता मध्ये व्यतीत केले. तेल मीठ लावून बातम्या प्रकाशित करणे हेच त्यांचे काम राहिले आहे. म्हणून ते चरित्र लेखनाला पण त्याच अँगल मधून बघत असावे. कुणाची जीवनी लिहणे म्हणजे कादंबरी लिहणे नव्हे. कुणाची जीवनी लिहणे म्हणजे काळे पांढरे सर्व उघड करणे. गांधीचे चरित्र लिहण्याची कुण्याही साहित्यकांची हिम्मत एव्हाना गांधीवादी लोकांची व नेहरूंची पण हिम्मत झाली नाही,याला कारण हेच होते. गांधीची दोन्ही बाजू दाखविण्याची हिम्मत कोण करणार ? कोण आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेणार ? संपादक महोदयांना जर याचीच खंत वाटते तर मग हिम्मत करून त्यांनीच ही कमी दूर करून गांधीचे चरित्र लिहायला पाहिजे. आणि ते जर चरित्र लेखनाशी प्रामाणिक राहून लेखन केले तर त्या चरित्राची दखल घेणारे किती तरी पुस्तके बाजारात येतील.त्यात माझे पण असेल.
3. बाबासाहेबांच्या मागे त्यांचे स्व: जातियच होते, हे सत्य स्वीकारले पाहिजे. मांग, चामार तथा अण्णाभाऊ साठे नी कॉमरेड डांगे ला स्वीकारले परंतु बाबासाहेबाना स्वीकारले नाही.
👉 संपादक महोदय, तुम्ही आंबेडकरवादी लोकांना विचारवंत समजत नाही, येव्हढी बुद्धी तुमच्या मध्ये आहे, याचा अर्थ तुम्ही स्वतःला विचारवंत समजता तर मग असली फालतू प्रतिक्रिया देऊन की, ‘बाबासाहेब सोबत त्यांचे स्व: जातियच होते’, असले अकलेचे तारे तोडून स्वतःची च हसी करून घेऊन राहिले.
महोदय, बाबासाहेबांच्या चळवळीत मांग चमार, जाठव, मेहतर इत्यादीचा भरणा तर होताच शिवाय त्यांच्या सोबत ओबीसी,मराठा तथा ब्राह्मण सुद्धा होते. अस्पृश्य समाजामधील महार जाती ही प्रामाणिक तथा इमानदार होती.आणि म्हणूनच ते शेवट पर्यंत बाबासाहेब सोबत राहिले. नाहीतर बाबासाहेबांनी 1935 ला जेव्हा धर्मांतराची घोषणा केली होती तेव्हाच गांधीने तुमच्या सारख्या काँग्रेसी पिट्टूना दलीत वस्तीत पाठवून त्यांना भडकविण्याचे काम केले होते की, धर्मांतर केल्याने तुम्हाला मिळत असलेले आरक्षण समाप्त होऊन जाईल. मांग/चमार ह्या जातीमधील पुढाऱ्यांना प्रलोभन देऊन आपलेसे करून त्यांनाच बाबासाहेब विरुद्ध उभे केले. फक्त महार जातच कोणत्याही प्रलोभनाला अथवा कोणत्याही धमक्याला न भिता बाबासाहेब सोबत शेवट पर्यंत राहिले.
“घालुनी घाव सांगून गेले माझे भीमराव” असे आपल्या कवितेमधून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा प्रचार करणारे अण्णा भाऊ साठे आखिर कम्युनिस्ट का बनले ? कम्यूनिष्टानी अस्पृश्यांसाठी आखीर असे काय केले जे अण्णाभाऊ साठे त्यांना जाऊन मिळाले ? याचे चिंतन केले का जरा ? जो माणूस आपल्या गाण्यातून बाबासाहेबांचे गुणगान गात होता, तो माणूस बाबासाहेबाना सोडुन comred डांगेला जाऊन का मिळाला ? याचे पण सविस्तर वर्णन सदर भाषणात करायला हवे होते. तुम्ही ज्या जातीचे नाव घेतले ते सर्व आपले हित साध्य करण्या पर्यंतच बाबासाहेब सोबत राहिले व त्यांचे गुणगान करत राहिले व नंतर सोडून गेले. यामध्ये कुणाचा स्वार्थ आहे ? आणि म्हणूनच तर म्हणालात की आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आमचा नेता वाटलाच नाही. ज्ञानी होते नं!
किती कटुता भरली आहे बाबासाहेब विषयी तुमच्या मनात ?
परंतु आज तुम्हाला सर्व ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकायला मिळत आहे. एव्हाना संसदे मध्ये पण आंबेडकर..आंबेडकर..आंबेडकर चा निनाद ऐकायला मिळत आहे जयभीम चा नारा सर्व भारतात गुंजु लागला आहे. बाबासाहेबाना स्वीकारले नाही याचा अर्थ बाबासाहेब सोबत धम्म स्वीकारला नाही असेच तुम्हाला म्हणायचे असेल बहुतेक ! परंतु संपादक महोदय, ‘ बौद्ध धर्म स्वीकार ‘ हा काही मदाऱ्याचा खेळ नव्हता. ज्यांना बौद्ध धर्म पटला असेल तेच याचा स्वीकार करतील,असे बाबासाहेबांनी च म्हटले होते. बौद्ध धर्माला काही कुनब्याचा बाजार बनवायचा नव्हता बाबासाहेबाना. ज्यांना पटला त्यांनी 1956 च्या धर्मांतर सोहळ्यात भाग घेतला. त्यामध्ये अस्पृश्या समाजव्यतिरिक्त इतर जातीचे लोक पण होते. व त्यानंतर चे चित्र बघा कसे बौद्ध धर्माकडे येण्याचा लोंढा वाढत चालला. अनु.जाती मधील काही सोडले तर कुणीच स्वतःला हिंदू म्हणून घेत नाही. अरे संसद भवन मध्ये पण कट्टर हिंदुत्ववादी सुद्धा आंबेडकर ह्या नावाने घाबरून गेले आहे. आज स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे कई सवर्ण लोक तुम्हाला मिळून जाईल. कधी काळी बाबासाहेबांच्या नावाने नाक मुरडणारे तेच लोक आज मात्र त्यांचे आदराने नाव घेत आहे.
ही ताकत आहे आंबेडकरी विचारांची. स्वतंत्र मजूर पक्ष द्वारे लढविलेल्या पहिल्या निवडणुकीत जे 15 उम्मेदवार निवडून आले होते, त्यामध्ये अस्पृश्य व्यतिरिक्त किती होते हे जरा तपासून बघा. बाबासाहेबांची हीच ताकत तुम्हच्याने पाहवली जात नाही.आणि बाबासाहेबा वरचा रोष तुम्ही आंबेडकरी लोकांवर दाखवत आहा.
4. गांधीवाद
आपल्या अंतिम मुक्तीचा मार्ग म्हणून गांधीवादामध्ये असे काय आहे की ज्याला अस्पृश्यांनी मान्यता द्यावी? अस्पृश्यते विरुद्ध फसवे अभियान आरंभ करण्या पलीकडे गांधी वादाने काहीही केले नाही. हिंदुत्ववादात जाती व्यवस्था आहे तीच जातीव्यवस्था गांधिवादामध्ये पण आहेत. हिंदुत्ववाद वडिलोपार्जित व्यवसाय स्विकारण्यावर भर देतो, गांधीवाद पण तेच सांगते. हिंदुत्ववाद गायीची पूजा करायला सांगतो, गांधीवाद पण तेच करायला सांगतो. हिंदुत्ववाद शास्त्राचा अधिकार सांगतो, गांधीवाद पण तो अधिकार मान्य करतो.
एक प्रकारे गांधीवादालाअस्पृश्यांच्या विनाशाचा जाहीरनामा म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
5. आंबेडकरांचे मोठेपण आम्ही मान्य करतो ते फक्त संविधानाचे निर्माते म्हणून.
काय मस्त..तुम्हाला जे लोक ऐकत असतील त्यांना पण जाणवले असेल की तुमच्या मनात बाबासाहेब विषयी किती कटुता भरलेली आहे ती. जगातील बहुतांश विद्वानांनी बाबासाहेबांची महत्ता मान्य केली ते संविधानाचे निर्माते म्हणूनच नाही. कोलंबिया युनिव्हर्सिटी ने ‘ सिम्बॉल ऑफ नॉलेज ‘ म्हणून त्यांचा पुतळा असाच नाही उभारला.परंतु आंबेडकर द्वेशापाई तुम्ही इतके आंधळे झाले आहे की त्यांचे ते मोठेपण तुम्हाला कसे दिसणार ? दबे कुचले तथा ज्या लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते, कुत्र्या मांजरा पेक्षाही ज्यांना हिन समजण्यात आले होते, अश्या लोकांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची दखल साऱ्या जगाने घेतली.परंतु त्या कार्याची तुमच्या मनात जरा पण किंमत नाही.जरा समोर प्रेक्षक वर्गात बसलेल्या लोकांना विचारायला पाहिजे होते, त्यांनीच सांगितले असते तुम्हाला.
6. 1947 नंतर सर्वश्रेष्ठ भारतीय कोण?
संपादक महोदय तुम्हाला तर आठवतच असेल काही 12-13 वर्षांपूर्वी *IBN lokmat या टीव्ही न्यूज चेंनेल ने THE GREATEST INDIAN 1947 (After Mahatma Gandhi) * या शो च्या माध्यमातून संपूर्ण भारतामधून कला , क्रिडा , सामाजिक, धार्मिक तथा राजकीय क्षेत्रा मधून सर्वश्रेष्ठ भारतीय ची निवड करायची होती. 10 हप्ते चाललेल्या या शो चे एंकरिंग राजदीप सरदेसाई करत होते.त्या कई साऱ्या दिग्गजामधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची Greatest Indian म्हणून निवड करण्यात आली होती. संपादक महोदय ही सर्वश्रेष्ठ भारतीयाची निवड ही संपूर्ण भारतीय जनते द्वारे होणार होती. व यामध्ये उम्मेदवार म्हणून सरदार पटेल व जवाहरलाल नेहरू पण होते.मग फक्त तुमचा तो महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाच का वगळण्यात आले ? कारण राष्ट्रपिता या पदवीचा मान राखायचा म्हणून?
गांधी सोबतच नेहरूंचा पण तुम्ही असामान्य व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख केला. व तेच नेहरू बाबासाहेबां समोर खुजे ठरले. तर मग सांगा एका असामान्य व्यक्तिमत्वाला हरवणारे बाबासाहेब कोण झाले ?
6. महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता ” ही पदवी कुणी बहाल केली ? भारत सरकारने ?
ही पदवी नाही भारत सरकारने बहाल केली व नाही जनतेने त्यांना दिली. खरे पाहता राष्ट्रपिता ही पदवी आहेच नाही. सुभाष चंद्र बोस यांनी गांधीला लिहिलेल्या पत्रात ” father of our Nation ” असा उल्लेख केला होता. त्या दोघांचा पत्र व्यवहार पुस्तक रूपाने प्रकाशित झाला. बस एव्हढेच आहे. सुभाष चंद्र बोस यांनी गांधीजी साठी हे संबोंधन त्यांची प्रशंसा करावी म्हणून तेव्हा वापरले जेव्हा 1942 ला “भारत छोडो ” चे असफल आंदोलन केले होते. सुभाष चंद्र बोस यामुळेच खुश झाले होते.कारण या मुळे लोक ब्रिटिश सरकार विरोधात उठाव करतील व आपल्याला जपानच्या साहाय्याने हल्ला करता येईल. या पूर्वि तर सुभाष चंद्र बोस गांधीजी वर नाराज होते कारण गांधीने आझाद हिंद सेनेला मदत करण्याचे नाकारले होते. म्हणजे राष्ट्रपिता ह्या पदवीला जन सामान्यांचे कोणतेही समर्थन प्राप्त नव्हते. तरीही गांधीजी हे राष्ट्रपिता म्हणून मान्यता पावले. व ह्याच मान्यतेला तडा जावू नये म्हणून गांधींना सर्वश्रेष्ठ भारतीय ह्या स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले.
7. कम्यूनिष्ठाचा पराभव गांधीनी केला
या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी काय मस्त अफलातून शोध लावला की “कम्यूनिष्ठाचे म्हणणे होते इथे कामगार आणि शेतकऱ्याचे राज्य आणायचे.परंतु येथील शेतकरी तथा कामगार गांधीजींचा जय म्हणायचे.”
कम्युनिस्ट चळवळ भारतामध्ये ब्राह्मणाच्या हाती गेल्यामुळे ती फोफावू शकली नाही व ते आंबेडकरवादाचा सामना करण्यास ते कमी पडले. खरे पाहता मार्क्सवाद हा आंबेडकरवाद पुढे टिकाव धरू शकला नाही
.8. गांधी हे RTC 1(Round Table Confrence) मध्ये गेले ते अस्पृश्यांचे नेते म्हणून गेले. व हे निर्विवादपणे सत्य आहे.
सर्वात प्रथम तर हे जाणून घेऊ या की, गांधी हे RTC1 मध्ये गेलेच नाही. काँग्रेस नी त्यावर बहिष्कार टाकला होता. गांधी हे RTC 2 मध्ये काँग्रेस चे प्रतिनिधी म्हणून गेले होते व स्वतःला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून जाहीर केले होते. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सोलंकी हे गेले होते.
अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी कोण हे बाबासाहेबांनी परिषदेला पटवून दिले होते. जो माणूस स्वतःला अस्पृश्यांचा प्रतिनिधि म्हणून समजतो, तोच माणूस अस्पृश्यांच्या हिता विरोधात त्या परिषदेत बाबासाहेब बरोबर लढत होते. अस्पृश्यांच्या हितासाठी बाबासाहेबांनी जी मांग त्या आरटीसी मध्ये ठेवली होती, त्या मागणीचा विरोध मुस्लिम समुदायाने करावा म्हणून गांधी आगा खान जवळ गेले होते.त्या बदल्यात गांधी त्यांच्या 14 मागण्या मंजूर करतील, अशी ग्वाही दिली होती. बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या हितासाठी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मंजूर होताच गांधी त्या विरोधात जीव द्यायला तयार झाले.आमरण उपोषणाला बसले. व गांधीचा खरा चेहरा पूर्ण दूनियानी बघितला.
काय खरोखर असा माणूस दीन दलितांचा पुढारी होऊ शकतो काय ?
9. आंबेडकरवाद्यांना मी विचारवंत मानीत नाही.
नका मानू. ही तुमच्या मनातील आंबेडकरी विचारवंत विरुद्धची जळफळाट बोलत आहे. नाही तर कश्याला ह्या साहित्य विचार मंच वर पूर्ण भाषणच आंबेडकरी लोकांबावत केले? जर तुम्ही त्यांना विचारवंत मानतच नाही तर मग होऊ द्या खुल्या मंच वर आंबेडकरवाद तथा गांधीवाद वर खुली चर्चा. आहे का तयार ?
संपादक महोदय, हा लेख लिहण्या मागचा माझा उद्देश हा गांधीचा विरोध करणे असा बिलकुल नाही. तुम्ही जे गांधीची वाहवाही करण्याच्या नादात अकारण पने बाबासाहेबावर घसरले. आणि म्हणून मला हा लेख लिहावा लागला.
(नोट :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोणताही वाद मान्य नव्हता. SCF चा जाहीरनामा)
*(TPrakash)
२१ मार्च २०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत