
भारताच्या सागरी सुरक्षेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्व नौदल सैनिकांना सलाम!
4 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा नौदल दिन हा केवळ एका ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन नाही तर भारतीय नौदलाला योग्य दृष्टीकोनातून पाहण्याचा दिवस आहे.
1971 मध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात मिळवलेले यश आणि पूर्व पाकिस्तान नेव्हीचे उच्चाटन करण्यात बजावलेली महत्त्वपूर्ण कामगिरी याच्या स्मरनार्थ 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो.
भारताने पाकिस्तान विरुद्धची मोहिम आखली होती त्याला ऑपरेशन ट्रायडंट असे नाव देण्यात आले होते. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. त्यामुळे नेव्हीच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नेव्ही डे साजरा केला जातो.
भारतीय नौदलाची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच सक्षम आहे. कान्होजी आंग्रे यांचे नौदलामध्ये मोठे योगदान असल्याची उदाहरणे इतिहासात वाचायला मिळतात. त्यामुळेच आयएनएस या नावाने नौदलाची ओळख ठेवण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांनी समुद्रामार्गाचे महत्त्व जाणून समुद्र मार्गावर सुरक्षेवर करडी नजर ठेऊन शत्रूला रोखण्याचे काम केले. भारताच्या भौगोलिक रचनेनुसार, देशातील नऊ राज्ये ही समुद्र किनाऱ्याला लागून आहेत. जगातील जवळपास 80 टक्के व्यापार हा हिंदी महासागरातून होते. त्यामुळे नौदलावर संरक्षणाची मोठी जबाबदारी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत