सुप्रीम कोर्टातील डॉ.बाबासाहेबाचा पुतळा देशातील वकील न्यायमूर्तीना प्रेरणादायी आहे.

भारत देश कोणत्या धर्म ग्रंथावर नव्हे तर भारतीय संविधानवर चालत असताना राजस्थान कोर्ट अवारात मनुचा पुतळा कसां ? हे एक कोड असल तरी स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर प्रथमच CJI सर्वच्च न्यायमूर्ती सी वांय चंद्रचूड याच्या प्रयत्नातून सुप्रीम कोर्टाच्यां आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा वकिली डागल्यातील एकमेव पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याच्या हस्ते करण्यात आले.ही जगाच्या इतिहासातील विलक्षण घटना असली तरी भारतीय संविधान, न्यायमूर्ती आणि वकीला साठी प्रेरणादायी
मार्गदीप आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर- अॅट- लॉ ही पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले.जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयात नांव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला. ५ जुलै १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नांव नोंदवून घेतले.अस्पृश्य समाजाचा पहिलाच वकिली असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. त्यांना कोर्ट रूममध्ये बसायला जागा नाकारली. म्हणून बाबासाहेब यानी कोर्टाचा आवरातच आपली वकिली सुरू केली .मुंबई उच्च न्यायालयाच्या बार लायब्ररीत ते ज्या टेबलावर बसत त्या टेबलाकडे एकही वकील फिरकत नसे. शिक्षण घेताना तोच आणि वकील झालो तरी तोच अनुभव घेत असलेल्या डॉ बाबासाहेब याना अस्पृश्यतेच्या विरुध्दच्या लढ्याचे स्फुलिंग आले.त्यांनी अस्पृश्यते विरुद्ध कायद्याने लढण्याचा निर्धार केला. त्यावेळी त्यांना वकील बाळकृष्ण गणेश मोडक यानी सहकार्य केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भारतात शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चडू नये. असे सामान्य नागरिकाना का
वाटते? याच कारण डॉ.बाबा साहेब आंबेडकर सारखे निषाशंत वकील आणि सर्वच्च न्यायमूर्ती सी वांय चंद्रचूड सारखे प्रामाणिक न्यायमूर्ती
याचा अभाव असल्यामुळे आजही देशांतील सर्व न्यायालयातील सर्व मिळून जवळपास ३ कोटी केसस प्रलंबित आहेत.
बॅरिस्टर बाबासाहेब याची पहिली केस
नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूची पहिली केस मिळाली.ही
पहिलीच केस त्यांनी यशस्वी केली.ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ हा मनुस्मृतीचा कायदा फाट्यावर मारून छ्त्रपती
शिवाजी महाराजांनी भास्कर कुलकर्णीचे एक घाव दोन तुकडे केले.डॉ बाबासाहेब यानी तर
२५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. सर्व दुःखाचे मूळ ब्राह्मण असल्याचे माहित असलेले दिनकरराव शंकरराव जवळकर यानी
“देशांचे दुश्मन कोण ” हे पुस्तकं लिहिले. एक जात खवळून उठलेल्या ब्राह्मण वर्गाने जवळकर आणि त्याचे सहकारी केशव गणेश बागडे. केशवराव मारुतीराव जेधे. रामचंद्र नारायण लाड याच्यावर खटला भरला.त्यांना खालच्या कोर्टाने दोषी ठरविले.
बॅरिस्टर बाबासाहेब यानी वरच्या कोर्टात ब्राम्हणेत्तर सत्यशोधक चळवळीच्या नेत्याची केस घेतली.फिर्यादीच्या बाजूने महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ विचारवंत पुण्यातील वकील ए.बी भोपटकर होते.बॅरिस्टर बाबासाहेब यानी बॅरिस्टर
भोपटकर.याची इतकी भेदक उलट तपासणीत
केली की, भोपटकर यानी पुढील तारखेस हा खटलाच काढून घेतला.बॅरिस्टर आंबेडकरांच्या वकिली निशी २६ नोव्हेंबर १८२७ रोजी न्यायालयाव्दारे त्या चारजनास दोषमुक्त केल्या मुळे बॅरिस्टर आंबेडकर याची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.
एक रेल्वे तिकिटावर केस जिंकून दिली
शहापूर तालुक्यातील किन्हवलीचे व्यापारी चंदुलाल सरुपचंद शहा याच्यावर बेकायदा शस्त्रे व स्फोटके बाळगली म्हणून १९३० च्या इंडियन पिनल कोडचा गुन्हा दाखल झाला होता. हरणारी केस घेण्यास कोणीच तयार नव्हते वकील प्रभाकर रेगेनी शहाना निष्णांत वकील .डॉ. बाबासाहेब आंबेडकराना भेटण्याचा
सल्ला दिला.शहा बाबासाहेब याना रजग्रहावर येवून भेटले..डॉ. बाबासाहेब यानी ठाणे कोर्टात
सदर खटल्या न्यायाधीशां समोर फक्त दोनच मिनिटे युक्तीवाद केला. न्यायमुर्तींनी चंदुलाल शेठ यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली.सुटका झालेले चंदुलाल शहा फी विषयी विचाराताच बाबासाहेबांनी केवळ ठाणे- दादर रेल्वेचे तिकीट काढून देण्यास सांगितले. ही फी एकूण
मोठा व्यापारी पण गलितगात्र झाला.अवाची सव्वा फी घेवून आपल्या पेशाला इमान न राखणारे वकिल यानी या केस मधून बोध घेवून लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. .
समाज सुधारक केशव धोंडू कर्वे
विज्ञान युगात माणूस चंद्रावरून मंगळवर निघाला तरी शाळातून लैंगिक शिक्षण देण्यास सरकार तयार नाही. अज्ञानयुगात लाकड स्मशानात गेली तरी ९० वर्षाचा म्हातारा ९ वर्षाच्या बलिकेशी विवाह करीत होता
समाजमान्य विवाह त्या मुलीच्या मनाचा शरीराचा कोणी विचार करीत नसल्याने समाज सुधारक केशव धोंडू कर्वे यांनी समाज स्वास्थ् ‘ मासिक सुरू केले.मासिकाचा मुख्य विषय हा लैगिंक शिक्षण स्त्री पुरुष संबंध होता.विज्ञानाची आणि वैदकीय शास्त्राची बैठक त्यांच्या या कार्या मागे होती. परंतु सत्य पचनी न पडणारे अश्लीलता म्हणून त्याच्यावर कोर्टात खटले दाखल करीत होते. कित्यकदा त्यांना दंड भरावा लागला.पण त्यांनी समाज प्रबोधनाचा वारसा सोडला नाही.
ब्रिटिश सरकार मात्र रूढीवाद्यांना बरं वाटाव म्हणून कर्वेविरुद्द कारवाई करत असल्याचे लक्षात येताच डॉ. बाबासाहेब वकिली डगला घालून कोर्टात नेहमीच कर्वेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले.न्यायाधीशांनी एकदा
असं आर्ग्युमेट केलं कि विकृत प्रश्न छापायाचेच कशाला आणि त्यावर बाबासाहेबांनी उत्तर असं दिल कि जर विकृती असेल तर ज्ञानानेच जाईल. नाहीतर कशी जाईल? त्यामुळे प्रश्नांनी कर्व्यांनी उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे..जगातल्या
अश्लील विषयावरील लेखनाला संशोधनाच्या आधारे बाबासाहेब आपल्या विचाराने इतके उधुक्त करीत असत की न्यायमूर्ती देखील अचबित होत असत. समलिंगी विवाहाल जगात आता कुठे मान्यता मिळू लागली असली तरी समलिंगी या विषयावर युक्तिवाद करणारे डॉ.बाबासाहेब हे जगातील पहिले वकील आहेत.
त्याच्या कुशाग्र बुद्धी व इंग्रजीवरील असमान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुध्दा त्यांचा युक्तीवाद ऐकताना दंग होऊन जायचे..
वाढती लोकसंख्या
डॉ.बाबासाहेब निष्णात वकील तसेच उतम राजकारनी होते. त्यानी आपल्या सहकाऱ्याला
मबई विधिमंडळात १९३७ साली कुठुंब नियोजनचा ठराव मांडण्यास सांगितले.वाढती लोकसंख्याने बेकरी ,बेरोजगारी ,महागाई , भ्रष्टाचार वाढतो. अन्न वस्त्र निवारा आरोग्य पर्यावरण आणि पाणी ही मोठी समस्या निर्माण
होते .याची त्यावेळी जाणीव करून दिली पण
मूल ही देवा घरची फुल म्हणत त्या
विषयाची टिंगल टवाळी केल्या मुळे चीनलाही मागे टाकत लोकसंख्येत भारत जगात पहिला देश ठरला आहे. विदेशात मोदींचे कौतुक है
भारत ही जगातील सर्वात मोठी बाझार पेठ असल्याने होत आहे.
जागतिक क्रमवारीत गरिबी ,भूकबळी, आनंदी आणि लोकशाहीत भारत सर्वात खालच्या रांगेत असताना त्याला महागुरू आणि महासत्ता म्हणून आपणच आपली इज्जत काढण्या सारखे आहे.
न्याय आणि न्यायालय
डॉ.बाबासाहेब यानी वकील , प्राध्यापक , संविधान शिल्पकार ते कायदे मंत्री पर्यंतच्या प्रवासात समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याया साठी मोठे योगदान दिले आहे. बाबासाहेब
म्हणतात मध्यवर्ती सरकारातून मुक्तता झाल्यावर मी वकिलीला वाहून घेणार आहे. आज ही देशांत लायक असे वकील थोडेच आहेत. लायक वकील नसतील तर त्या खात्याची अधोगती होईल. या धंद्यांची प्रतिष्ठा राहण्यासाठी
तरुण वकिलांना संधी दिली पाहिजे.कायदामंत्री
असताना न्याय व्यवस्थेत ज्वलंत प्रश्न आणि
प्रलंबित खटल्यांसाठी २१ मार्च १९४९ रोजी
फिरत्या न्यायालयांची संकल्पना मांडली.
हे विधेयक प्रत्यक्षात कृतीत आले असते तर
आज तीन कोटी केसस प्रलंबित राहिल्या नसत्या
गरिबांना न परवडणारी कोर्ट फी आकारली नसती.पैसे नाहीत म्हणून न्याय मिळत नाही. अशी न्यायालय त्यांना नको होती. अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याच काम हा वकिल करीत असतो. तरी माझ्या सर्व वकील बांधवांना विनंती आहे कि आपण सुद्धा कायम न्यायाच्या बाजूने तत्पर असलं पाहिजे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य अत्र्यांनी ” मी कसा झालो ? ” या पुस्तकात आपल्या यशाचे विविध पैलू उघडे करताना वकील न होता आल्याची खंत बोलून दाखवली आहे.एक प्रकरणात अडकलेले आचार्य आत्रे केस कोणीच घेत नसल्याने डॉ.बाबासाहेब भेटण्यास राजग्रहावर येतात. अभ्यासात. मग्न असलेले आंबेडकर याना डिस्टर्ब नको म्हणून दोन तास बसून राहतात. बाबासाहेब पुस्तकातून मान वर करून पाहतात तर आचार्य अत्रे आहेत. केव्हा आलात असे म्हणताच आचार्य अत्रे म्हणतात दोन तास बसून आहे.आचार्य अत्रे आपली केस सांगतात तेव्हा डॉ.बाबासाहेब म्हणतात माझ्याकडे येण्याची गरजच नव्हती .ही फारच सादी केस आहे.
मी तुम्हाला सांगतो या लयब्रिरीत अमुक नबरचे कपाट आहे. त्यामधील.अमुक नबरची रॉक आहे. त्या रॉक मध्ये अमुक नबरचे पुस्तकं
आहे.त्या पुस्तकाच्या .अमुक नंबरची.ओळ.आहे. त्याच्या खाली मी अंडर लाईन मारली. तेव्हढाच संदर्भ तुमच्यासाठी
पुरेसा आहे. सांगितल्या प्रमाणे पुस्तकं पाहून
आचार्य अत्रे डॉ.बाबासाहेबाची बुध्दीमता पाहून अचंबित होतात. आचार्य अत्रे यांनी तेव्हा पासून डॉ. बाबासाहेब याच्यावर कधीच टीका न करता नेहमीच त्याच्या कार्याचे कौतुक केले..
डॉ. बाबासाहेबाचा महापरिनिर्वणाला त्यांना
श्रद्धांजली वाहताना आचार्य अत्र्यांनी दैनिक मराठा मध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी लेख
प्रसिद्ध केला. तो एक अनमोल ठेवा आहे.ते लिहितात की डॉ. आंबेडकर इतकाबुध्दीमान विद्वान महाराष्ट्र नव्हे भारतात नाही.
सात कोटी अस्पृश्यांवर आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार..? त्यांनी ध्यानात धरावे कि, भारताच्या इतिहासात आंबेडकर आणि त्यांचे कार्य अमर आहे. त्यांनी जो मार्ग आखला आणि प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उध्दार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चरित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने जर आपापल्या जीवनात निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकुळ हृदयाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांना अभिवादन करतो.
आनंद म्हस्के चेंबूर
8928564235
..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत