देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

ग्रामपंचायत निवडणूक अपूर्णांकातील असंवैधानिक जागा मोजणी, निवडणूक आयोगाने टोलविला ग्राम विकास कडे चेंडू.

अकोला : ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील अपूर्णांकातील जागा मोजण्याच्या अन्यायकारक पद्धती नियम ७ आणि शून्य लोकसंख्या असलेल्या भागात लादल्या जाणाऱ्या असंवैधानिक आरक्षणा विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी १६ जून २०२६ च्या निवेदनाद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती.मात्र, या नियमांमध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला नसून ते राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे असल्याने, निवडणूक आयोगाने हे निवेदन पुढील योग्य कारवाईसाठी थेट ग्राम विकास विभागाकडे वर्ग केले आहे.ग्रामविकास विभाग आता काय निर्णय घेणार ह्या वर पुढील आंदोलनांची दिशा ठरविणार असल्याचे युवा आघाडीचे वतीने सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभागांमधील आरक्षण निश्चित करताना अपूर्णांकातील जागांची गणना करण्याच्या पद्धतीमुळे अनेक ठिकाणी तफावत निर्माण होते.तसेच ज्या प्रभागात संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या शून्य आहे, तिथेही चुकीच्या पद्धतीने आरक्षण लादले जात असल्याचा आक्षेप वंचित बहुजन युवा आघाडीने घेतला होता.त्यावर निवडणूक आयोगाची भूमिका लेखी स्वरूपात पाठविण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या कक्ष अधिकारी रत्नप्रभा बेले यांनी राजेंद्र पातोडे यांना पाठविलेल्या अधिकृत पत्रात क्र.रानिआ/ग्रापंनि-२०२६/सं.क्र.१७४/का.८ नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि मुंबई ग्रामपंचायत नियम १९६६ मधील तरतुदींनुसारच प्रभागनिहाय आरक्षण निश्चित केले जाते.या कायद्यात किंवा नियमात दुरुस्ती/सुधारणा करण्याचे अधिकार केवळ राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाला आहेत. त्यामुळे आयोगाने यावर स्वतः निर्णय न घेता चेंडू थेट ग्राम विकास विभागाच्या कोर्टात टोलवला असून, पातोडे यांना पुढील पत्रव्यवहार ग्राम विकास विभागाशीच करण्याचा सल्ला दिला आहे.या प्रकरणाची एक प्रत सह सचिव, ग्राम विकास विभाग बांधकाम भवन, मुंबई यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. आता या अन्यायकारक नियमात सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभाग काय पावले उचलणार, याकडे ग्रामीण भागातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.ग्राम विकास विभागाने हा असंवैधानिक निर्णय न बदलला तर त्याविरुद्ध कारवाई आणि आंदोलनाची घोषणा करण्याचे राजेंद्र पातोडे यांनी जाहीर केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!