“काँग्रेसच्या वतनदारवर”, ठाकरे गटाने केली टिका

पाचपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपानं काँग्रेसला पराभूत केलं आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडून विजयाची समीकरणं स्पष्ट असल्याचे दावे केले जात होते. मात्र, तिथेही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमवीर सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यात आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. तर त्याउलट तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यात भाजपाचा प्रभाव नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पार्श्वभूमीवर या चार राज्यांच्या निवडणूक निकालांवरून आता राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणुकांसंदर्भातली राजकीय समीकरणं मांडत असताना ठाकरे गटानं मात्र या पराभवावरून काँग्रेसमधील स्थानिक नेतेमंडळींना लक्ष्य केलं आहे. तसेच, या निवडणुकीत काँग्रेसनं इंडिया आघाडीचं तत्त्व पाळलं नसल्याचीही टीका करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत