मुख्य पान

“सत्तेतले लोक जानेवारीत संपूर्ण महाराष्ट्रात…”,रोहित पवारांना मोठी भीती

सत्तेतल्या लोकांनीच बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या बोलावल्या होत्या, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, अंतरवालीतल्या लाठीहल्ल्यानंतर बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. परंतु, यासाठी सत्तेतल्या काही लोकांनी बाहेरून गुंडांच्या व्यावसायिक टोळ्या (पैसे घेऊन गुन्हे करणारे) बोलावून त्यांच्याकरवी बीडमध्ये दगडफेक केली, जाळपोळ केली. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि फॉस्फरस बॉम्बहल्ले झाले. या गुडांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु, तिथे जमलेले इतर लोक, ज्यांनी या गुडांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दडगफेक, जाळपोळ करण्यासाठी मास्क घालून आलेल्या लोकांवर कारवाई झाली नाही. ते कोण होते याचा तपासदेखील केलेला नाही. असाच प्रकार अंतरवालीत सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा रविवारी (२६ नोव्हेंबर) जालन्यात दाखल झाली. या यात्रेदरम्यान, रोहित पवार यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी केल्या लाठीहल्ल्यानंतर मोठी अनागोंदी माजली होती. आंदोलक आणि स्थानिक जनतेने लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जाळपोळ आणि दगडफेक केली होती. परंतु, याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ही मागणी सरकारने मान्य केली होती. परंतु, दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी गावात तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!