मानवप्राणी विश्वाला तारणार की मारणार हे ठरणार बुद्धिमत्तेच्या उंचीवर..!

जपान,अमेरिका,इराण,इराक यांना राष्ट्र हि संज्ञा मिळालेली आहे.कारण तिथे अनेक धर्म आणि धर्मात विभिन्न जाती नाहीत.म्हणून त्यांना राष्ट्र म्हटले जाते.देश हा अनेक धर्म,पंथ,धर्मात अनेक जाती मिळून तो देश तयार होतो.देश चांगला की राष्ट्र चांगले हे वाचक वर्गानेच ठरवायचे असते.देश व यातील फरक लक्षात घेता राष्ट्र हि संज्ञा सर्वोत्तम आहे.राष्ट्रात एक भावना,एक संघता विचार जन्म घेत असतात.या विरुद्ध देशात एक भावना,एक संघ विचार नसतात.म्हणून राष्ट्र हे सर्वोत्तम असते.देश सुद्धा सर्वोत्तम होऊ शकतो.परंतु तेथील जनता,कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी आणि सरकार जर विषमता नष्ट करून,समतेने देशातील सर्व नागरिकांना उपयुक्त सोयी सुविधा पुरवित असेल तर तो देश सुद्धा उच्च प्रतीचा होऊ शकतो.फक्त अण्वस्त्र निर्मितीत अग्रेसर म्हणजे ते राष्ट्र व देश प्रबळ,सर्व संपन्न होऊ शकत नाही.त्याकरिता राष्ट्रातील आणि देशातील जनतेचे शिक्षण,आरोग्य,मूलभूत गरजा,वित्तिय बल व वैद्यकीय सेवा इत्यादीने भरभराटी झाली तर तुम्ही संपन्न म्हणून शकता.
ह्या भूतलावर जेव्हढे छोटे मोठे देश,राष्ट्र आहेत,त्या त्या देशातील,राष्ट्रातील जनतेकडे काही ना काहीतरी चांगले घेण्यासारखे असते.याचाच दुसऱ्या शब्दात अर्थ सांगायचा असेल तर तो म्हणजे प्रत्येक देश,राष्ट्र हे एक दुसऱ्या राष्ट्रावर व देशावर अवलंबून असतात.कुणाकडून काय घ्यायचे आणि काय सोडायचे हे त्या त्या देशातील मानसिकतेवर,बुद्धिमत्तेवर निर्भर करत असते.या भूपृष्ठावरील सर्व सजीवांचा विनाश करायचा की त्यांना लाभलेले आयुष्य अंतिम क्षणापुरते अबाधित ठेवायचे हे मानवाच्याच हातात आहे.
या भूमीवरील देशांना व राष्ट्रांना सलोख्याने जगायचे असेल तर त्या त्या देशातील शांतपूर्वक जीवन जगून जीवनातून अंत झालेल्या मानवी कल्याणाचे सुधारक संत,सत्पुरुष,महापुरुष,महामानव, महामाता यांच्या विचारांचे पालन करून जर ते देश,राष्ट्र मार्गस्थ होत असेल तर सर्वच देशाची,राष्ट्रांची एकमेकांशी बांधिलकी राहू शकेल.
उपरोक्त उल्लेखित केल्याप्रमाणे ‘सलोखा व बांधिलकीच्या’ माध्यमातून आचार – विचार व आचरण,चारित्र्य-चरित्र
अंगिकारून नीतिमूल्य राष्ट्र व देश घडू शकतो.असे चांगले राष्ट्र,देश निर्माण होण्यासाठी शिक्षणात सुद्धा सत्पुरुषांचे मूल्यवान मानवी हिताचे विचार शिकविले गेले पाहिजेत.विद्यार्थी तारुण्यात येईपर्यंत सत्पुरुषांचे मानवाला लाभ दायक विचार सतत मनावर व प्रतिभेवर बिंबवायला हवेत.सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात सकारात्मक विचार हेच मानवाला प्रगतीपथावर घेऊन जाऊन शकतात.
प्रत्येक राष्ट्र व देशातील शालेय जीवनात विद्यार्थी घडविताना शिक्षक आणि प्राध्यापक यांनी राष्ट्र आणि देशाप्रती विचार करून विद्यार्थी निर्माण केले तर बऱ्याच मानवी समस्यांना उत्तरे व उपाय मिळू शकेल.परंतु मुद्दाम लिहावेसे वाटते की एका शिक्षकाने एक जरी विद्यार्थी कुमार्गि तयार केला तर तो देश व राष्ट्र यांची भर भराटी करू शकणार नाही.म्हणून म्हणावेसे वाटते की एका डॉक्टर कडून पाच रोगी अनवधानाने दगावले तर एवढा फरक पडत नाही.परंतु शिक्षकी पेशातील गुरुवर्यांकडून फक्त एक जरी विद्यार्थी बिघडविला गेला तर राष्ट्रात आणि देशात मोठी समस्या जन्म घेऊ शकते.
काही देश व राष्ट्र खूपच विद्यासंपन्नं असतात.विज्ञानात खूपच अग्रेसर असतात.याचे कारण त्या राष्ट्रांमध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तेजन,प्रोहत्सान दिले जाते.त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची बौद्धिक उच्चांक वाढण्यास मदत होत असते.काही देशात,राष्ट्रात प्रश्न विचारण्याची मुभा मुळीच नसते.अशा राष्ट्रांमध्ये शोधक बुद्धी निर्माण होत नाही.ज्या देशात अथवा राष्ट्रात प्रश्न विचारू नये असे जेव्हा म्हटले जाते.तेव्हाच त्या देशात व राष्ट्रात अंधश्रद्धा व धर्मांधता जन्म घेते.हि अंधश्रद्धा व धर्मांधता मानवाला अधोगतीकडे घेऊन जाते.मग नको ते मानसिक विकृतीचे भक्त आणि त्यांनी केलेल्या प्रचार प्रसाराने आसाराम बापू,नारायण साई,राम रहीम, बागेश्वर राधे माँ,स्वयंभू महादेवाचा अवतार सांगणारा ऋषिकेश वैद्य,अशोक एकनाथ खरात सारखे दुर्जन निपजातात आणि रंजले,गांजलेले व समस्याग्रस्त गरजवंत त्यांच्याकडे जाऊन फसतात.
जो देश अथवा राष्ट्र विज्ञानाच्या जोरावर प्रगती करतात त्यांच्याकडून त्या ज्ञानाची देवाण घेवाण करून प्रत्येक देशाने आणि राष्ट्राने प्रगती करायला काहीच हरकत नसावी.अट फक्त एकच की विज्ञानाचा उपयोग केवळ आणि केवळ मानवी लाभाकारितच व्हायला हवा.तेव्हाच देशात व राष्ट्रात शांतता नांदू शकेल.विज्ञान हे जितके उपयुक्त तितकेच ते संहारक आहे.वैज्ञानिक शोध हे निसर्गातील वैविधत्तेला बाधक अथवा मारक नसावेत.
लेखाचा शेवट करताना आवर्जून लिहावेसे वाटते की ज्या कणा कणांनी हे विश्व,सजीव निर्जीव घटक,दृश्य अदृश्य जीव जंतू तयार झालेला आहेत,त्यांचा मानवांकडून समूळ नाश होता कामा नये.नैसर्गिकरीत्या जे घडणार असेल ते घडेल.तिथे कुणाचेच काहीच चालणार नाही.प्रत्येकाचे जीवन एकदाच आहे.पुन्हा नाही.म्हणून युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नसतात.परंतु त्या युद्धामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातात.कोणत्याही प्रकारचे युद्ध हे विध्वंसकारी असते.त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर जपानचे देता येईल.कारण अमेरिकेने सन 1945 मध्ये व 6 ऑगस्ट हिरोशिमा आणि 9 ऑगस्टला नागासाकी वर अणुबॉम्बचा वर्षाव करून ते दोन शहरे उध्वस्त केली होती.जपानने ठरविले असते तर संपूर्ण जग नव्हे तर हे विश्व पूर्णतया नष्ट केले असते.परंतु जपान हे महापुरुषांच्या,महामानवांच्या विचारधारेला मानणारे राष्ट्र आहे.म्हणून त्यांनी शांतीचा,अहिंसेचा मार्ग अवलंबिला आहे.याचा अर्थ ते राष्ट्र डरपोक आहे असा होत नाही.त्यांनी या पृथ्वीतलावरील सर्व सजीव प्राणी,दृश्य,अदृश्य,जीव-जंतू यांची काळजी घेतली म्हणून त्यांनी सूड न उगवता शांतीचा मार्ग स्वीकारला.बुद्धाच्या पंच शिलेपैकी एक शील म्हणजे ।।पाणातीपाता वेरमणी- सिक्खापदं समादियामी।।
यचाच अर्थ की मी जीवहिंसे पासून अलिप्त रहाण्याची प्रतिज्ञा करतो/करते.हे जर तत्व पाळले तर विश्वात युद्धच होणार नाही.यासाठी या विश्वाला युद्ध नको तर बुद्ध हवा.. बुद्ध हवा…!
कवी,लेखक,पत्रकार व समाजसेवक :- आयु. भूपती अर्जुन मोरे. 9594386277.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

