
उत्पादन प्रोत्साहन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 27 कंपन्या हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात सुमारे 3 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली.
यापैकी 23 कंपन्या सर्व्हर्स, लॅपटॉप आणि टॅब्लेट्सचं उत्पादन करण्यास लगेचच, तर इतर वस्तूंच्या उत्पादनासही पुढच्या 90 दिवसांमध्ये सुरुवात करतील, असं वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
यामुळे रोजगाराच्या जवळपास 2 लाख संधी उपलब्ध होतील, असं ते म्हणाले. येत्या काळात भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात तीस कोटी डॉलरचा टप्पा गाठेल आणि या नव्या उपक्रमामुळे भारत माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर क्षेत्रातला एक महत्त्वाचा देश म्हणून उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत