इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला जबाबदार कोण?

इंद्रायणी नदीत साबणासारखा फेस वाहणं हे नित्याचंच झालंय. पिंपरी चिंचवडमधील विनापरवाना चालणाऱ्या शेकडो कंपन्या या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. ज्या कंपन्या रसायनयुक्त पाणी या नदी पात्रात सोडतात, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन स्थानिकांना या पाण्यामुळं आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत