महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

येराड गावचे सुपुत्र भागवत जगन्नाथ कांबळे (आण्णा) यांचे निधन..

येराड गावचे सुपुत्र भागवत जगन्नाथ कांबळे (आण्णा) यांचे आज दुपारी ठाणे येथे हृदयविकाराने निधन झाले.मामा कांबळे यांचे ते जेष्ठ बंधु आहेत व आयुनी चारुशीला सचिन कांबळे हिचे वडील आहेत.कॅनरा बँकेतून मॅनेजर म्हणून निवृत्त झाले.कळवा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म चळवळ जागृत ठेवण्यासाठी व तरुण पिढीला आदर्श वाटेल असे ते अध्यक्ष म्हणून काम करीत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्यदिव्य जयंती व वर्षावास मालिका त्यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने साजरी होत असे. तथागतभगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर त्यांचे प्रचंड वाचन व प्रेम होते हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवत असे. असे हे आण्णा आज आपल्यात नाहीत हे मनाला न पटणारे व मन सुन्न करणारी घटना आहे.

कॅनरा बँकेत नोकरी करीत असताना त्यांनी आपल्या लोकांनी शिक्षण घेऊन प्रमोशन घेतले पाहिजे व त्याचा उपयोग समाजाच्या चळवळीकरिता केला पाहिजे. असे समाजप्रिय आण्णा यांनी कॅनरा बँकेतदेखील कामाचा आदर्श निर्माण केला. प्रत्येक माणसाला माणुसकीचा आधार देणारा आज आधारवड हरपला.

*आण्णा हे स्वभावाने विनयशील होते. आज माणुसकी जपणारा सुशील व सुंस्कृत धम्मधरोधर हरपला. आण्णांना चन्ने परिवार तसेच दैनिक जागृत भारत भावपूर्ण आदरांजली ..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!