दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य समारोह व तिरंगा रॅलीचे आयोजन

मुंबई, १५ ऑगस्ट २०२६ : डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, वडाळा-३१ येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्य दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. आनंदराज आंबेडकर उपस्थित होते.

कार्यक्रमास डॉ. प्रा. यशोधरा एस. वराळे, प्रभारी प्राचार्य; डॉ. डी. ए. गवई, प्रभारी प्राचार्य, लॉ कॉलेज; प्रा. डी. एन. बनसोडे, उपप्राचार्य (वरिष्ठ महाविद्यालय); श्री. बी. एस. पाटील, उपप्राचार्य (कनिष्ठ महाविद्यालय); श्री. ए. डी. वानखेडे, पर्यवेक्षक (कनिष्ठ महाविद्यालय); श्री. जे. के. जाधव, क्रीडा विभाग; श्री. रोमित कर्णिक, लेखापाल; ANO कॅप्टन गणेश कुवर तसेच श्री. बी. एस. गायकवाड, सहाय्यक ANO, आणि श्री टी जी कोकाटे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या गायनाने झाली. सकाळी ८.३० वाजता प्रमुख पाहुणे मा. श्री. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली NCC कॅडेट्सना NCC शपथ देण्यात आली. कार्यक्रमात NCC पथकाची पाहणी, शिस्तबद्ध NCC संचलन, कवायत तसेच रायफल प्रात्यक्षिकाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

या स्वातंत्र्य दिन समारोहात एकूण ५७ NCC कॅडेट्स, सुमारे ३८ विद्यार्थी तसेच अंदाजे ३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. प्रमुख पाहुणे, मान्यवर, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, NCC अधिकारी, कॅडेट्स, विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

यानंतर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महाविद्यालयापासून वडाळा रेल्वे स्थानकापर्यंत आणि तेथून पुन्हा महाविद्यालयापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी, NCC कॅडेट्स, शिक्षक व कर्मचारी मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

संपूर्ण कार्यक्रमात देशभक्ती, शिस्त, एकता आणि राष्ट्रीय अभिमान यांचे दर्शन घडले. स्वातंत्र्य दिन समारोह व तिरंगा रॅली उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.

जय हिंद! 🇮🇳

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!