
भारतावर अनेकांनी आक्रमण करुन या देशावर राज्य करुन येथील संपत्तीचे अपहरण केले.येथील लोकांचे शोषण करून आपलीं राज्य सत्ता पक्की केली.परतु आर्यांनी येथील लोकावर आपली संस्कृति लादली.येथील मूळ रहिवासीना मानसिक गुलाम बनवून आपले अधिराज्य स्थापित केले.माणसाला माणूस म्हणून असलेली ओळख विसरावयास लावून आपले गूलाम बनविले. त्यांच्यावर वैदिक संस्कृती लादली. त्यांचा स्वताच्या धर्म सोडून आर्यांनी आपला वैदिक धर्म थोपविला.चार वर्ण निर्माण करून यांना शुद्र ठरवून तिन वर्णाची विना मोबदला सेवा करण्याचे आदेश दिले. त्यांना संपती पासून बेदखल केले. शास्त्रानुसार ते संपती जमा करू शकतं नव्हते. त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार नव्हता.
इंग्रजांनी या देशावर राज्य केले.परतु येथील लोकांना शिक्षण घेण्यासाठी मोकळीक दिली.समता देण्याचा प्रयत्न केला. नौकरी दिली. सैन्यात शामील करून घेतले.माणूस असल्याची जाणिव करुन दिली. इंग्रजांनी येथील खनिज संपत्तीचे दोहन करुन भांडवलदारी व्यवस्थेला प्रोत्साहन दिले. इंग्रजांनी आर्यांच्या अधिकाराला आव्हान दिले म्हणून इंग्रजां विरूध्द आवाज उठवून स्वातंत्र्य होण्यासाठी जनतेला संघटित करून जागृति निर्माण केली.जनसमूह रस्त्यावर येऊन आंदोलन करू लागले.अनेक तरुण शहीद झाले.असतोष वाढत गेला. दुसरे महायुद्ध सुरू झाले परिस्थिती अस्थिर झाली. इंग्रजांना राज्य कारभार करणे कठीण झाले. त्यांनी येथील लोकांना राज्यकारभार सोपविण्याचे ठरविले. त्यासाठी राऊंड टेबल कानफरस घेउन येथिल जनतेची मते जाणून घेतली.व 15/8/1947ला सत्ता सुपूर्द केली.तो दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो.
स्वातंत्र्य मिळून79 वर्षे झाली.आजही असमानता गरीबी अशिक्षित स्त्री वर बलात्कार होत असून विषमतावादी व्यवस्था मजबूत होत आहे.जाती जातीत भेदभाव करुन आपसांत लढविले जाते.तरूण बेकार आहेत शेतकरी कर्ज बाजारी झाला असून त्याला आत्महत्या करावी लागत आहे.
सामाजिक असमतेमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे.
शिक्षणातात नविन प्रयोगाच्या नावांनी इतर जातींना शिक्षण बाह्य होउन एका उच्च जातीचे शिक्षणात वर्चस्व निर्माण होत आहे.
जोपर्यंत सामाजिक समता येत नाही.माणसाला माणूसपण येत नाही. सर्वांना सारखे अधिकार मिळत नाहीं. गरीबी श्रीमत हा भेद नष्ट होत नाही.तो पर्यंत हे स्वतंत्र मूठभर लोकांचे आहे.शोषित पिडीत लोकांत असंतोष भडकत आहे. विद्यार्थी तरुण आपला असंतोष जाहिर करीत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे.हे स्वतंत्र आपले नाही ही जन भावना वाढत आहे.
विनायकराव जयवंतराव जामगडे
9372456389
7823093556
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


