मुख्य पान

हिंदू धर्माचे मारेकरी कोण ? (सौजन्य : हरिभाऊ बोराटे)

१) दैनिक “सकाळ” चे प्रतापराव पवार यांनी एका लेखात लिहीले होते की , समुद्रोलंघन करणे हे धर्माविरुध्द आहे , असा वैदिक सनातनी ब्राम्हणांनी फतवा काढला त्यावेळेस समुद्रावर मच्छिमारी हे उपजीवीचे साधन असणाऱ्या कुटुंबानी आपल्यातील काही जणांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून मच्छिमारी व्यवसाय कायम राखला .

२) शेतकरी हे शुद्र आहेत . सनातनी वैदीक धर्माप्रमाणे त्यांना संपत्ती राखायचा अधिकार नाही . त्यामुळे त्यांची जमीन , संपत्ती त्यांच्याकडून काढून ब्राम्हणात वाटावी असे मलबारच्या संस्थानिकास सांगून ब्राम्हणांनी शेतकऱ्यांची सर्व जमीन संपत्ती हडप केली .( हे स्वामी विवेकानंद यांनी १८९५मध्ये स्वामी ब्रम्हानंद यांना पत्राद्वारा कळविले होते .) मग काही वर्षांनी तेथिल शेतकऱ्यांनी मुस्लिम धर्म स्विकारला . नंतर सूड घेण्यासाठी या सनातनींची कत्तल केली . तीच भारतात गाजलेली ‘मोपला दंगल’ .

३) काश्मिरी पंडीतांनी तीनशे-साडेतीनशे वर्षापुर्वी काशीला येवून सनातनी वैदीक ब्राम्हणांना विनंती केली की आम्हाला परत हिंदू धर्मात घ्या . पण ब्राम्हणांनी त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायला नकार दिला . ते निराश होऊन काश्मिरला परतले. (संदर्भ : ‘मधुकर’ पुस्तक, लेखक आचार्य विनोबा भावे ) आजच्या काश्मिर प्रश्नाचे मूळ येथेच आहे .

४) काश्मिरच्या राजाने आपल्या मुस्लिम प्रजेला हिंदू करण्याची मोहीम आखली . तिला काश्मिरी ब्राम्हणांनी विरोध केला . त्यांना जर परत हिंदू केले तर आम्ही झेलममध्ये जलसमाधी घेऊ, अशी धमकी देवून ती मोहीम थांबवली .

५) महमद अली जीना यांचे आजोबा पुँजाजी जीना व त्यांच्या जमातीचे लोकही काशीला जाऊन सनातनी वैदिक ब्राम्हणांना परत हिंदू धर्मात घ्या म्हणून विनंती केली असता त्यांना परत हिंदू धर्मात घेण्यास नकार दिला . त्या पुँजाजी जीनाच्या नातवानेच भारताची फाळणी केली.(संदर्भ – फाळणी : युगांतापुर्वीचा काळोख , लेखक–वि.ग.कानिटकर)

६) १९७२ च्या दरम्यान महाबळेश्वरला स्ट्राॅबेरीच्या व्यवसायात धावड समाजाचे लोकही स्ट्राॅबेरीचा व्यवसाय करीत होते . ते बाटलेले मुस्लिम असले तरी त्यांनी हिंदूधर्म सोडला नव्हता. कारण त्यांच्याकडे रामनवमी, कृष्णजन्म सण साजरे केले जायचे. हळुहळु हाजी मस्तान, करीमलाला यासारखे स्मगलर व त्यांचे मुस्लिम सहकारी वारंवार अफजलखानच्या कबरीवर येवून ह्या धावड लोकांना बरोबर घेत जेवणावळी करु लागले . नंतर ते धावड हळुहळु हिंदू संस्कार विसरुन पुर्ण मुसलमानाप्रमाणे वागू लागले . आता दोष कुणाला देणार ?

७) हिंदू ब्राह्मणांनी जर बाटग्या हिंदूंना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी विरोध करण्याचा करंटेपणा केला नसता तर आज मुसलमानांची संख्या एवढी वाढलीच नसती . थोडक्यात हिंदू धर्माची वाट लावण्यात ब्राह्मणात अग्रेसर होते, हे वरील सगळ्या मुद्द्यांवरून सिद्ध होते .
बहुजन हिंदूंचे दैवत असलेले छ. शिवाजी राजेच काय ते एकटे दूरदृष्टीचे असल्यामुळे त्यांनीच कर्मठ वैदीक ब्राम्हणांना बाजूला सारून नेताजी पालकर व निंबाळकर यांना परत हिंदु धर्मात घेतले होते .

👉 बहुजन हिंदू बांधवांनो काय तुम्हाला हा इतिहास माहिती होता का ? वैदिक ब्राम्हणांनी हा इतिहास तुमच्या पासून इतक्या वर्षे का लपवून ठेवला होता ? भारतात बहुजन हिंदूंपैकीच दलित आणि अस्पृश्य समाजाला त्यांच्यावर वैदिक ब्राम्हणांनी केलेल्या अन्यायामुळे – अत्याचारामुळेच मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला होता हा वास्तव इतिहास का लपविण्यात येत आहे ? नाशिकच्या काळाराम मंदिराबाहेर हजारो दलित अस्पृश्य लोक केवळ आम्हाला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेवू द्या म्हणून कित्येक दिवस मंदिराबाहेर तळ ठोकून बसले होते परंतु या कर्मठ वैदिक ब्राम्हणांनी मंदिराचे दरवाजे उघडले नाही व त्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नाहीच . शेवटी नाईलाजाने सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुन्हा आपला मुळधर्म म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारला . हा इतिहास तर खूपच ताजा आहे .
मुळात वैदिक ब्राम्हण हे हिंदू नाहीत तर त्यांनी केवळ भारतात निवडणुकीच्या माध्यमातून राजा निवडला जाईल हे ब्रिटिशांनी जनतेला मतदानाचा अधिकार देऊन जाहीर केले तेव्हा यांनी धूर्तपणे निर्णय घेऊन स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास सुरुवात केली .आणि आज त्याच वैदिक ब्राम्हणांनी बहुजन हिंदूंवर सत्ता गाजवण्यासाठी RSS , विश्व हिंदू परिषद , बजरंग दल , अभिनव भारत , ABVP… सारख्या अनेक संघटना काढून त्यात बहुजन हिंदूंना ओढले आणि या संघटनांचे प्रमुखपद किंवा महत्वाची पदे स्वतःकडे ठेवली . याच संघटनांच्या माध्यमातून अपप्रचार करून गेली अनेक वर्षे RSS मधील ब्राम्हण बहुजन हिंदूंना भ्रमित करून मुस्लिमांना शत्रू म्हणून प्रोजेक्ट करीत आहे , त्यांची सतत भीती दाखवून आम्हीच तुमचे हितकर्ते आहोत असे भासवून एकगठ्ठा मते मिळवीत आहेत .

म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तर हे केवळ ३ % असलेले वैदिक ब्राम्हण आजही सत्तेत आहेत आणि ८५ – ९० % असलेल्या बहुजन हिंदूंवर सत्ता गाजवत आहेत . वैदिक ब्राम्हणांचे हे डावपेच बहुजन हिंदूंना समजूच नये म्हणून ते सतत काहीना काही उचापती करून बहुजन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली घडवून आणीत असतात .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!