दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

चैत्र पौर्णिमा बौद्धांनी कशी साजरी करावी ?

दिपक धुंदाळे
बुलडाणा
8668680173

● चैत्र पौर्णिमा (चित्तमासो)

चैत्र प्रतिपदेस म्हणजे गुढ पाडव्याच्या दिवशी कोणाही बौद्ध बांधवांनी गुढ्या उभारू नयेत. या दिवशी बौद्ध उपासकांनी विहारात जाऊन त्रिसरण, पंचशील, अष्टशील ग्रहण करावे. दिवसा उपोसथ पाळावे. उपवासाला कोणतेही अंधश्रद्धात्मक वा कर्मकांड समजायचे नसून यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. या दिवशी म्हणजे कोणत्याही पौर्णिमेस पृथ्वीच्या एका दिशेस सूर्य तर तिच्या दुसऱ्या दिशेस चंद्र आलेला असतो या दोन्हींचे गुरुत्वाकर्षण परस्पर विरुद्ध दिशेस मानवी परिणाम करीत असल्यामुळे पचनक्रिया मंदावते. याचा परिणाम, विशेष करून लहान बालके, वृद्ध व आजारी व्यक्तींवर होतो. पौर्णिमेच्या दिवशी मानवी शरीरावर सूर्य व चंद्र दोन्हींच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कार्यरत असतो, तर दोन्ही अष्टमींच्या दिवशी सूर्य व चंद्र आपल्या पृथ्वीला काटकोन स्थितीत येतात. या वेळीही गुरुत्वाकर्षण तेवढेच प्रभावी बनते, अमावस्या दिवशी सूर्य व च दोन्ही पृथ्वीच्या एकाच दिशेस येतात. या दोन्हींचा संयुक्त गुरुत्वाकर्षणाचा परिणाम व्यक्तींवर होत असतो म्हणून अमावस्या दिवशी सुद्धा उपोसथ व्रत पाळावे.

गृहस्थ असणारे उपासक-उपासिका यांनी आठवड्यातून एक दिवस उपोसव करावे. उपोसथाच्या दिवशी बौद्ध बांधवानी अष्टशीलांचे पालन करावे. बौद्ध परंपरेप्रमाणे उपोसया दिवशी पौर्णिमा, अमावस्या आणि महिन्यातील दोन्ही अष्टमी असे चार दिवस: उपवास करावे. बौद्ध जीवन पद्धतीतील हे अत्यावश्यक अंग आहे. उपोसथाच्या दिवशी विहारात अगर ध्यानकेंद्रावर जाऊन ध्यान साधना करावी. धम्मश्रवण (धम्मसदन) करावे. भिक्खू समवेत धम्माचा चर्चात्मक अभ्यास (धम्मसाकच्छा) करावा. उपोसथाच्या दिवशी दानाला महत्त्व आहे. यथाशक्ती भिक्खूना दान करावे. उपवासाच्या दिवशी दानाला महत्त्व आहे. यथाशक्ती भिक्खूंना दान करावे. उपवासाच्या दिवशी गृहस्थ उपासंकानेही नमस्कारमंत्र, त्रिसरण, अष्टशील ग्रहण करावे. गृहस्थाने महिन्यातून केवळ चार दिवस ब्रह्मचर्य पालन करावे. एका महिन्यातून चार वेळा म्हणजे दोन्ही अष्टमी, पौर्णिमा वा अमावस्या या चार दिवसांसाठीच, अष्टशील म्हणजे पंचशीलेतील शील क्र. १,२,४ व ५ जशास तसे पूर्वीप्रमाणे पाळावयाचे असून ३,६,७ व ८ ह्या शीलांचे जास्तीचे पालन करावे. या सूत्रांनुसार

३= ब्रह्मचर्य पाळावे.
६ = अकाली भोजन करू नये. (दुपारी १२ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंतच्या वेळेला अवेळ, विकाल म्हणतात).
७= नाच गाणे, बजावणे, तमाशा मेळे पाहू नयेत.
८= हारतुरे, अत्तरे, सुगंधीद्रव्ये, उटणे किंवा अलंकार धारण करू नयेत.
उपासक व उपासिका यांनीही भिक्खूंसारखेच कट्टरपणे १ ते ८ सूत्रे पाळावीत. भिक्खू आणि भिक्खूणी यांना अनुक्रमे श्रावक आणि श्राविका या उपाधीने ओळखतात, तर गृहस्थांना उपश्रावक आणि उपश्राविका या नावाने संबोधण्याची प्रथा रूढ झाली, एरव्ही गृहस्थ व्यक्तींना एवढे कडक नियम नाहीत. ते आपले घर, पत्नी, मुले-बाळे, व्यवसाय, नोकरी हे सर्व सांभाळून धम्म पाळू शकतात. महिन्यातील केवळ चार दिवसच वर सांगितलेल्या अष्टशीलांचे पालन करावे. इतर वेळी उपभिक्खू (उपश्रावक-उपासक) आणि उपभिक्खूणी (उपश्राविका उपासिका) यांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करून धम्म पाळावा.


जय✺भीम….नमो✺बुद्धाय

✍️ दीपक धुंदाळे दिप्स 💙
विद्रोही विचारक
बुलढाणा
8668680173

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!