दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोनाचा मोर्चा मुंबईत संपन्न

देशाची प्रतिमा समतावादी असली पाहिजे
-डॉ भीमराव य आंबेडकर

मुंबई – महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दया यासाठी बुद्धगया येथे उपोषण चालू आहे. त्यामूळे देशातील बौद्ध समाज हा जागृत झाला आहे तो आपली धर्म स्थळे मागण्याच्या पावित्र्यामध्ये आला आहे. देशातील अनेक विहारांचे मंदिरीकरण झाले आहे त्याच्या समोर ही लढाई सुरुवात झाली आहे. हा मेसेज जगात गेलेला आहे. अमेरिकेत निषेध नोंदविला आहे,झूम मीटिंग च्या माध्यमातून युरोपातील देशांमधील आंबेडकरवाद्यांच्याशी चर्चा केली असता जिथे जिथे भारताच्या अंबेसी आहेत तेथे निवेदने देऊन निषेध नोंदविण्याचे सुचविण्यात आले व या देशात मायनॉरिटीज विरुद्ध कशाप्रकारे षडयंत्र चालू आहे हे दाखविण्याची गरज आहे. भंतेजीनी सांगितल्यानुसार आमचे वितुष्ट कोणत्या धर्माशी नाही परंतू देशात समता, न्याय, करुणा, भाईचारा स्थापन करावा, देशाची प्रतिमा समतावादी असली पाहिजे. असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी. भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महाबोधी महाविहार 1949कायदा रद्द करा व महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी मुंबई उपनगर (बांद्रा)जिल्हाधिकारी कार्यालयावरील प्रचंड मोर्च्यात केले. तसेच आंबेडकर यांनी 18, 19मार्च रोजी प्रत्यक्ष महाबोधी विहार येथील आंदोलनासाठी बुद्धगया येथे जाणार असल्याचेही घोषित केले.
मोर्चा बांद्रा येथील टीचर्स कॉलनीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास डॉ भीमराव य आंबेडकर व भिख्खू संघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ,सामूहिक महावंदना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोर्चातील जनसमुदायास अँड एस के भंडारे यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, जोपर्यंत 1949चा महाबोधी मंदिर कायदा (जो कायदा संविधान निर्मितीच्या अगोदरचा आहे) रद्द केला जात नाही व महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने आंदोलन चालूच राहणार असून बौद्धांचे सर्व प्रश्न आता भारतीय बौद्ध महासभा हाती घेणार आहोत.तसेच यावेळी भंते शांती रत्न, रेखाताई ठाकूर, भिकाजी कांबळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठ मंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना बिहार राज्य मुख्यमंत्री, राज्यपाल व राष्ट्रपती, पंतप्रधान यांना द्यावयाचे मोर्चाचे निवेदन देण्यात आले.
या मोर्च्यात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार , भारतीताई शिराळ,मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखडे व चंदाताई कासले, सरचिटणीस दयानंद बडेकर, उपाध्यक्ष प्रदिप कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर, सागर गांगुर्डे, महादेव गायकवाड, सिद्धार्थ अहिरे आणि वंचित बहुजन आघाडीचे
महेश भारतीय ,परमेश्वर रणशुर, उत्कवर्षा रूपवते इत्यादी प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!