
परदेशी महिला दिन विशेष म्हणजे आजचा महिला दिन आणि स्त्री मुक्ती दिन साजरा करताना स्त्रियांना नेमके कशामधून मुक्ती मिळाली हे शोधावे लागेल. त्यासाठी आपल्या देशाच्या इतिहासात डोकावणे महत्त्वाचे आहे.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी २५०० वर्षांपूर्वी प्रजापिता गौतमी यांच्यासह ५०० स्त्रियांना धम्माची दीक्षा देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे स्वतंत्र भिक्खुणी संघ तयार केला, तो स्त्री स्वतंत्र्याचा पहिला दिवस म्हणावा लागेल.
परंतु बौद्ध धम्माच्या अस्तानंतर स्त्रियांना दुय्यम दर्जा देऊन, पुरुषांची दासी बनवून त्यांना गुलामीत ठेवले गेले. तेव्हा पासून आपल्या देशात हजारो वर्षे स्त्री ही गुलामच राहिली होती.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देऊन स्त्री सर्व जोखडातून, धर्माच्या बंधनातून मुक्त केली.
परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर स्त्रियांना मिळालेले अधिकार आणि हक्क कायदेशीर व्हावेत म्हणून हिंदू कोड बिलाची निर्मिती करुन स्त्री स्वातंत्र्याची पायाभरणी केली. तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्या स्वातंत्र्याचे प्रणेते आहेत म्हणून आपल्या देशातील स्त्रियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञ असायला हवे होते.
परंतु आपल्या देशातील स्त्रियांनी डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव तर ठेवल्याच नाहीत उलट त्यांच्या प्रति जातीय द्वेषमूलक भावना ठेवून त्यांच्या दैदिप्यमान विचारापासून दूरच राहिल्या. म्हणून आपल्या देशातील स्त्री कर्मकांडात, खुळचट प्रथांमध्ये अडकल्या. त्यामुळे ती आजही शोषित, वंचित आणि उपेक्षित राहिलेली आहे.
तेव्हा या खुळचट प्रथांमधून, कर्मकांडांमधून बाहेर पडून आपला मानसिक व बौद्धिक विकास करून घ्यायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही, हे जेव्हा स्त्रियांना समजून येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने तोच स्त्री स्वतंत्र्याचा, मुक्तीचा दिवस असेल.
🙏
मनिष सुरवसे 9657725956
जिल्हाध्यक्ष,
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,
जिल्हा शाखा सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत