वीरांगना अंजली दमानिया.

तलवार लोहार कडे कधी बनली ते महत्त्वाचे नाही.ती रणांगणावर कधी तळपली ते महत्त्वाचे आहे.म्हणूनच ऋषीचे कुळ आणि नदीचे मुळ विचारले जात नाही.गजानन महाराज आणि साई बाबा यांचा जन्मदिवस नव्हे प्रकट दिवस मनवला जातो.तसे अंजली दमानिया यांचा जन्म कधी , कुठे झाला,ते महत्त्वाचे नाही तर त्या रणांगणावर कधी लढल्या ते महत्त्वाचे आहे.आम्ही त्यांना २०११ मधे पाहिले,आण्णा हजारे सोबत लढतांना.तो त्यांचा प्रकट दिवस.
महाराष्ट्रातील इतिहासात अनेक महिला वीरांगना झाल्या.पण वर्तमानातील वीरांगना आहेत अंजली दमानिया.आज रोजी त्यांची संघटना नाही.कोणताही पक्ष नाही.पण वैयक्तिक बुद्धी, अभ्यास आणि साहस करून फडणवीस, शिंदे, पवार यांना नाकी नऊ आणले.शेवटी या राजकीय शकुनी मामांना झुकवले.दुर्योधन , दुःशासन जेरबंद केले.
तरूणांनो, इतिहास काय चघळता वर्तमान तुमच्या समोर आवाहन देत आहे.इतिहासातील घटना तोडफोड करून,मीठ मसाला लावून चवदार बनवलेल्या आहेत म्हणून त्यात वेडे होतात.त्या ऐवजी आपल्या डोळ्यासमोर जे घडत आहे,जे लढत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
अंजली दमानिया यांची भेट लोकपाल बाबत आंदोलनात झाली.त्या आधीपासून त्यांचे कार्य चालू होते. तळपत्या तलवारी सारखे चमकल्या त्या २०११ पासून.कांग्रेस मधील भ्रष्टाचार विरोधात आण्णा हजारे यांनी लोकपाल ची मागणी केली.त्याचा परिणाम म्हणून दिल्लीत आम आदमी पार्टी ची स्थापना झाली.त्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अंजली दमानिया स्टार प्रचारक होत्या.तेथेच आमची समक्ष भेट झाली.शहादरा मतदारसंघात अरविंद केजरीवाल भाषणं देत असतांना प्रेक्षकांची गर्दी कमी होती म्हणून स्टार प्रचारक अंजली दमानिया जमीनीवर बसल्या.कोणताही सत्कार,हार गुच्छ स्विकारला नाही.म्हणे मी अजून काहीच केले नाही तर माझा सत्कार का?मी अजून विजय मिळवला नाही तर माझे कौतुक का?त्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचे २८ आमदार निवडून आणले आणि केजरीवाल मुख्यमंत्री बनले.हे खूप मोठे यश होते.
या यशानंतर अंजली ताई यांनी पुढे तलवार म्यान केली नाही.एकेक राजकीय चोरांना धराशायी केले.शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण,नाना पटोले ,उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस असे मोठे मोठे नेते असतांना अंजली ताई राणी लक्ष्मीबाई सारखे लढत राहिल्या.खडसे, भुजबळ आणि आता मुंडे अशांना पाणी दाखवले.
रामाच्या वंशात पुन्हा राम झाला नाही.कृष्णाच्या वंशात पुन्हा कृष्ण झाला नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशात पुन्हा शिवाजी होणे नाही.गांधीजींच्या वंशात पुन्हा गांधी होणे नाही.या साठी वंशावळीची गरज नाही.येथे लागते उर्मी.प्रेरणा.संवेदना.तेंव्हा बनते एक वीरांगना.त्या आहेत अंजली दमानिया.
जळगाव, नाशिक आणि आता बीड जिल्ह्यात जाऊन राक्षसांच्या नरडीत हात घालून पाप ओकायला भाग पाडणाऱ्या अंजली ताई आज जनन्मान्य बनलेल्या आहेत.लोकमान्य बनलेल्या आहेत.
ना खाऊंगा,ना खाने दुंगा अशी वल्गना कराणाऱ्या मोदींच्या फौजेतील हे सिपाई.ज्यांना रक्षणाची जबाबदारी सोपवली तेच भक्षण करीत आहेत.ज्यांना मंत्री बनवले तेच चोरी,खून , बलात्कार करीत आहेत.जर मोदी आणि फडणवीस प्रामाणिक असते तर मुंडे,कोकाटे,गोरे,गुलाबराव एक दिवसही मंत्री पदावर राहिले नसते.महाराष्ट्राचे दुर्भाग्य!चोरांनी युती आणि आघाडी करून महाराष्ट्र लुटण्याचा विडा उचललेला आहे.अशा रंगा बिल्लांच्या विरोधात लढणे सोपे नाही.म्हणूनच शरद पवार,नाना पटोले,उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांनी नांगी टाकलेली आहे.पडेल ते उचलणे, मिळेल ते खाणे यामुळे ते हतविर्य ,निष्प्रभ झालेले आहेत.जेथे मर्द लाचार होतात तेथे महिलांना कंकण फोडून खड्ग हाती घ्यावे लागते.ती जबाबदारी अंजली दमानिया यांनी घेतलेली आहे.
आम्ही जय जिजाऊ म्हणतो.जय ताराबाई म्हणतो.राणी लक्ष्मीबाईंना नमन करतो.तिच भुमिका अंजली दमानिया यांनी हाती घेतली आहे.अंजली दमानिया या वर्तमानातील वीरांगना आहेत.
इतिहासातील जिर्ण पाने कवटाळून धरण्याऐवजी वर्तमानातील वादळांचा सामना करणे हेच वीर आणि वीरांगना चे आद्य कर्तव्य असते.मी आस्तिक माणूस. मुर्ती आणि पुतळ्यातील मृतात्म्यांना ओवाळण्याऐवजी जिवंत धगधगते वीर आणि वीरांगनांना आळवणी करतो.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
६/३/२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत