संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – २०

गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प २० वे..
जिही कुल साधु बैसनौ होइ !
बरन अबरन रंक ईश्वर, बिमल बासू जानिये जग सोइ!
होइ पुनित भगवंत भजनते,आपु तारि तारै कुल दोइ !!
धनि सु गाऊ धनि धनि धनि सो ठाऊॅ,धनि पुनित कुटूॅब सभ लोइ!
जिनि पिया सार रस तजे आन रस , होइ रसगमन डारे विषु खोइ!!
पंडित सुर छत्रपति राजा,भगत बराबरि और न कोइ!
जैसे पुरेन पात जल रहै समीप,भनि रविदास जनमे जगि ओइ!!
वरील पदावलीत गुरू रविदास भारतातील उच्च निच भेदावर आधारीत चातुर्वणावर घणाघाती टिका करताना समतेचा विद्रोही संदेश कसा आहे.हे वाचा…!
मनूवेद पुराणांत ज्ञानार्जन, भक्ति, करण्याचा अधिकार शुद्रांना नाही.तो दैवी मक्ता फक्त उच्च कुळांतील ब्राम्हणांनाच आहे. शुद्रांनी वेद जरी ऐकले तरी त्यांच्या कानात उकळते शिषे ओतण्याची शिक्षाची तरतुद केलाली आहे. धर्मसत्तेया व संस्कृती रक्षकांच्या दहशतीमुळे शुद्र, महिलां मंदीर प्रवेश करण्याचे धाडस करू शकत नव्हते…! कारण राजा व राजसत्ता याना सुद्धा चातुर्वण्य मान्य होते.अश्या परिस्थितीत गुरू रविदास निर्भिड व निडरपणे सांगतात कि मनुष्य राजा, रंक, चांडाळ,म्लेछ, ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य ,शुद्र कुळात जन्मला तरी तो हरिभक्तिने साधू म्हणजे वैष्णव होऊ ,शकतो.त्याला कुठलाही अटकाव नाही.तो भगवंताची पुजा,भजन करून ज्ञानयोगी,कर्मयोगी,भक्तयोगी होऊ शकतो.भगवंताने मानवात भेद केलेले नाहीत. हरी भजनाने तो स्वताचा तर उद्धार करतोच करतो पण, कुळाचा,गावाचा, रहात्या ठिकाणाचा ही तो उद्धार करतो. त्यामुळे आप्तेष्ट ,गाव सारेच धन्य व पावन होतात. कोणाचे ही प्रलोभनांचा त्याग करून, भक्ति रसपान करून ,या अदभूत रसामध्ये रममाण होणारांचे सारे विषय विकार नष्ट होतात.ज्ञानी,वीर नर,राजा यांची भक्तांशी तुलना करता येत नाही. ज्या प्रमाणे कमल चिखलात राहून ही पवित्र निर्मळ रहाते,तसेच कुठल्याही कुळातला वैष्णव संसारात राहून ही अलिप्त असणारा तो भक्त जगात श्रेष्ठ आहे…! अश्या विचारांचा भारतभर सातत्याने प्रचार करणे.वेदविधानांचे खंडन मंडण करण्याचे हे धाडस साधे सुधे धाडस नव्हते.,मठ,पिठांचे महंत ,प्रकांड पंडीत, रथीं महारथींच्या दरबारात जाऊन, सत्य सांगायला साक्षात्कार व्हावा लागतो .तसेच त्या साक्षात्कारावर अढळ निष्ठा ही असावी लागते. .! ती निष्ठा रविदास महाराजांची होती म्हणूनच बहूजनांच्या मनात समतेची व स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे गुरू रविदास वंदनिय आहेत..
जय रविदास..
लेखक ,ॲड.आनंद गवळी.
राष्ट्रीय उपाध्यक्ष. राष्ट्रीय चर्मकार महासंघ.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत