राजे छत्रपती शिवाजी महाराज…क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले…

जाणून घ्या शिवजयंतीचा इतिहास..
आणि कोणी केली सुरुवात ?
सत्यशोधक, क्रांतीसुर्य महात्मा फुले १८६९ साली रायगडावर गेले, शिवजयंती सुरू करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास सुरू केला, परंतु समाधी सापडेना तीन दिवस महात्मा फुलेंनी वेली तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला, समाधी स्वच्छ धुवून काढली आणि समाधीवर फुले वाहिली, शिवरायांच्या समाधीची पूजा केल्याचे ग्राम जोशीस समजले तेव्हा जोशीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, तो समाधीजवळ आला आणि समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली व अर्वाच भाषेत महात्मा फुलेंना म्हणाला, अरे कुणबटा त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस तो काय राजा होता काय ?
महाराष्ट्राला शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व कळावे, शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जनमाणसांपर्यंत पोहोचावा यासाठी महात्मा फुले यांनी १८७० मध्ये प्रथम शिवजयंतीची सुरुवात केली.
इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला.
शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. पुढे २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत. त्यानंतर त्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला व शिवजयंतीला सुरुवात केली (१८७०) पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा फुलेंनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली……
राजे छत्रपती शिवाजी महाराजांचां विजय असो विजय असो विजय असो …
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या विजय असो विजय असो विजय असो….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत