भारतीय संविधान नाकरणारा व्हिडिओ पहाआणि संविधान रक्षणार्थ पुढे या…

मा.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु,मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मा. गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री भारतातील सांविधानिक पदावर बसलेले सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासक, देशातील सर्व राजकीय पक्ष, सर्व संविधाननिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी ‘अखंड हिंदू राष्ट्राचे संविधान’ तयार असल्याचे निवेदन करणारा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे,तोअत्यंत गंभीरपणाने घ्यावा.
यात दिलेल्या माहितीनुसार ज्या सुपीक डोक्यातून हे संविधान तयार झालेले आहे असे सांगितले जाते, त्या संविधानात एका अर्थाने लोकशाही नाकारलेली आहे. राजेशाहीचा पुरस्कार आहे. राष्ट्रप्रमुखाच्या ताब्यात देशातील संपूर्ण न्याय व्यवस्था असेल असा उल्लेख आहे. परकीय राष्ट्राशी युद्ध झाले तर राष्ट्रप्रमुखाने युद्धाच्या आघाडीवर राहावे अशी यात भूमिका आहे.मुसलमान, ख्रिस्ती इत्यादींसाठी मतदानाचा अधिकार असणार नाही. मनुस्मृति आणि अन्य पौराणिक ग्रंथांचा आदर्श समोर ठेवून हे संविधान बनलेले असल्याचा उल्लेख आहे. हे संविधान केंद्र शासनाला सादर केले जाणार आहे. ते लागू करण्याचा आग्रह धरला जाणार आहे. २०३५ पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी शासनावर प्रचंड मोठा दबाव आणला जाणार आहे. अशा अवस्थेत हा कोपऱ्यातला एक साधा व्हिडिओ म्हणून याकडे दुर्लक्ष करणार आहात काय?
मा.राष्ट्रपती,मा. प्रधानमंत्री,मा. विरोधी पक्ष नेते,मा. गृहमंत्री, मा. राष्ट्रपती आणि सत्ताधारी व विरोधी पक्षातील सर्व जबाबदार मंडळींनी या व्हिडिओच्याद्वारे ‘अखंड हिंदुराष्ट्र संविधान’ या संदर्भात मांडलेली भूमिका अत्यंत गंभीरपणे घ्यावी. ही भूमिका वर्तमान संविधानाला पूर्णपणे नाकारणारी आहे. प्रगल्भ, त्यागी स्वातंत्र्यसैनिकांची संविधान सभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संविधानाने बसवलेली भारत या आधुनिक राष्ट्राची घडी विस्कटून टाकणारे आहे. जी भूमिका वर्तमान संविधानाला नाकारणारी असते ती राष्ट्रद्रोहीच असते. जशी खलिस्तानवादी भूमिका राष्ट्रद्रोही आहे, तशी हिंदू राष्ट्रवादी भूमिका देखील राष्ट्रद्रोहीच आहे. सत्ताधारी पक्षातील सर्व मंडळींनी हे तात्काळ सांगावे की या व्हिडिओच्या द्वारे मांडलेल्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे की विरोध आहे? विरोध असेल तर तात्काळ ही भूमिका मांडणाऱ्यांना अटक करा. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला चालवा.
शासनामधील ही मंडळी असे पाऊल उचलत नसेल तर देशातील सर्व संविधानिष्ठ राष्ट्रवादी मंडळींनी या राष्ट्रध्वही कृतीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज बुलंद केला पाहिजे.
डॉ.अनंत दा. राऊत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत