प्राध्यापक असण्याची अट काढून, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला कुलगुरुपदी नेमणार

शिक्षण क्षेत्राच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा डाव
नवी दिल्ली – यापूर्वी कुलगुरु पदासाठी उमेदवार शिक्षणतज्ज्ञ असणे, प्राध्यापक पदाचा दहा वर्षे अनुभव असणे आवश्यक होते, आता कोणत्याही क्षेत्रातील दहा वर्षांचा वरिष्ठ स्तरावरील अनुभव असलेल्या व्यक्ती देखील कुलगुरुपदी नेमले जाऊ शकेल असा बदल विद्यापीठ आयोग करीत आहे. शिक्षण क्षेत्राच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा डाव आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने 2020 नंतरच्या काळात उलट सुलट निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. 10 +2+3 चा पॅटर्न बदलण्यापसून याची सुरुवात झाली . पदवी कमीजास्त वर्षात मिळविणे असलेही अनाकलनीय निर्णय घेतले. आता तर कुलगुरुपदी नेमली जाणारी व्यक्ती शिक्षणक्षेत्रातील असण्याची गरज नाही, असा अजब घाट घालून शिक्षण क्षेत्राच्या स्वायत्ततेवर मोठा घाट घालण्याचा निर्नय यूजीसी घेत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत