” मी पुन्हा येईन “

समाज माध्यमातून साभार
” मी पुन्हा येईन “
म्हणता म्हणता…
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांच्यावर आरोप होते 70 हजार कोटीचा घोटाळा त्यांना सोबत घेऊन आला…
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांच्यावर आरोप होते आदर्श घोटाळा त्यांना सोबत घेऊन आला…
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांच्यावर दाऊद बरोबर हितसंबंधाचे आरोप होते त्यांना सोबत घेऊन आला…
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांच्यावर आरोप होते राशन घोटाळा त्यांना सोबत घेऊन आला…
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांनी जेलची हवा खाल्ली त्यांना सोबत घेऊन आला..
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांच्यावर ED चे आरोप होते ( सरनाईक, जाधव, कदम इ. ) त्यांना सोबत घेऊन आला
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्या सगळ्यांना सोबत घेऊन आला…
तो पुन्हा आला
पण येताना ज्यांच्यावर आरोप होते घराणेशाहीचे ( राणे, विखे, आवाडे,महाडिक ) त्यांना सोबत घेऊन आला..
तो पुन्हा आला…
पण येताना ज्यांना जेलमध्ये टाकतो म्हणून धमकी दिली त्यांनाच सोबत घेऊन आला…
महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पाठवायला तो पुन्हा आला…
महाराष्ट्राची भाकरी खाऊन…अदानीची चाकरी करायला तो पुन्हा आला…!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत