बाप हैं तो …आप हैं…!!!

या देशाची जनसंख्या ३३ कोटी नव्हती त्यावेळी बाबासाहेबांनी या भारत देशात १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी हजारो वर्षा पासुन अस्पृश्य, निच मानल्या गेलेल्या मनुष्याला गरीब, दलित, निर्धन, निराधार, गावकुसाबाहेर बेघर असणारा वासुदेव असो की दुर्लक्षित दुर्गम भागात राहणारा आदिवासी असो अश्या गुलामाची अवस्थेत खिचपत पडलेल्या मानवाच्या मनाला संजिवनी देवुन तथागत गौतम बुद्ध यांची ऊर्जा म्हणजे सद्धम्माने प्रज्वलित करून उत्साहानं जगण्याची चेतना निर्माण केली.त्यावेळे पासुन तर आज पर्यंत आंबेडकरी विचार धारेचा मनुष्य या भारत देश्याचे संविधान प्रमाण मानून आणि तथागतांची शिकवणीचा अंगीकार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून आपली जीवनचर्या निव्वळ जगत नसुन उन्नती आणि उत्कर्षाची नवीन नविन शिखरे पादाक्रांत करीत आहे.
कालचा मुका आज बोलू लागला पासुन तर खातो त्या भाकरीवर तुझी सही आहे रे एवढे थोर उपकार हा समाज मानव बाबासाहेबांचे मानू लागला एवढेच नाही तर देवाहून देव माझा भिम आहे अशी हृदयात जागा दिली.त्याही पुढे जावून हा समाज बोलू लागला माझ्या बापाचाही बाप भीमा तुच आहेच.जन्मदात्या बापा पेक्षाही पहिली जागा बाबासाहेबांना दिली.यावरून समजुन येते की एवढा सुईच्या टोकावर मावेल त्या जागेपेक्ष्याही लहान जागे एवढा हा समाज मानव बाबासाहेबांप्रती भावनिक आहे.
…आणि नोंद घेण्या सारखी बाब ही की ज्यावेळी बाबासाहेबांनी या समाजाला बौध्द धर्म दिला त्यावेळी घरातुन मरी आई, खंडोबा, भैरोबा, म्हसोबा,विर पिर सारखे घरातील देव्हारे घराबाहेर फेकुन दिले. एव्हढेच नाही तर रोजी रोटीचे साधन असलेली महारकी देखील फेकुन दिली. हा जातीबाहेर फेकुन दिलेला वर्ग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिशादर्शक मानून आपले मार्गक्रमण करत आहे.
मार्गक्रमणाची दिशा कोणती?…संविधानिक.
मार्गक्रमणाचा रस्ता कोणता?… असा रस्ता ज्या रस्त्याने एक मानव दुसऱ्या मानवाची काळजी घेतो, दया , क्षमा, शांती, बंधुभाव एकात्मता , समानता,करुणेचा असा नैतिकतेचा रस्ता.हातात झेंडा कोणता?…मार्गात अनेक सहप्रवासी असतातच, कोणाच्या हातात कोणताही झेंडा असला तरी मानवतेच्या झेंडा जो अखंड सृष्टीतील जीव जंतूचे रक्षण करतो तोच खरा झेंडा . मार्गदर्शक कोण? डॉ.बाबासाहेब आंबेडकर. प्रवाशी कोण? आपण सर्व जीवनाच्या अस्ताकडे जाणारे. आपण सर्व सहप्रवासी यांचा पण हाच मार्ग आणि हाच खरा प्रवास.
हा प्रवास आहे तथागताच्या पंचशील , अष्टशिल मार्गाकडे नेणारा. ज्यात स्वर्ग नरक यांची व्याख्या नाही का मोक्षाची लालसा नाही.प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारा असा मार्ग ज्याचा उगम कल्याणकारी, मध्यम कल्याणकारी आणि शेवटही कल्याणकारी.त्या मार्गाचे आम्ही वाटसरू. या मार्गाचे मार्गदर्शक परमपूज्य बोधिसत्व विश्ववंदनीय माझा बापही ज्यांना बाप बोलतो आणि मी सुद्धा ज्यांना बापच बोलतो असा बापाचा बाप डॉ. भिमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब हि फॅशनच नाही तर ब्रॅण्ड आहे , आदर्श आहे, दिशादर्शक आहेत आजच्या अबाल वृद्धांचेच नव्हे तर तरुण वर्गाचे आणि लहान मुलांचे देखील. आज जगातील कान्या कोपऱ्यातील प्रत्येक थरातील वर्ग बाबासाहेबांना आदर्श मानून त्यांच्या विचारांनी भारावून जावून मानवतेच्या रक्षणाची शपथ घेत आहे ती कोणत्या स्वर्ग नरकाची लालसा देवुन नव्हे तर बाबासाहेबांचा मार्ग हा तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांच्या दिशेकडे नेणारा आहे म्हणून.
परंतु काही माथेफिरू स्वार्थी लोक ज्यांचा मूळ धर्म विध्वंसक राहिला आहे.हा वर्ग हजारो वर्षा पासुन जगाला परिचित आहे.आयत्या पिठावर नागोबा असलेला चोर वर्ग ज्याचं स्वतचं असं काहीच अस्तित्व नाही.मानवतेच रक्षण जो करतो त्यांचा नरसंहार, कर्दनकाळ नेहमी बनलेला आहे.ज्याला साम दाम दंड भेद वापरुन राजा बनुन राहणे आणि अन्यायाचे राजकारण करणे हा ज्यांचा पिंड आहे ज्यांचे पुढे देश हित कवडीमोल आहे परंतु अधर्म प्रथम आहे असा वर्ग खोटं बोल पण रेटून बोल मार्गाने जाणारा वर्ग म्हणजेच नाण्याची खोटी बाजु असणारा काटा ,हा कसा जगु देणार प्रबोधनकार वर्गाला.
म्हणून या वर्गाने स्वतचं प्रबोधन करून परिवर्तन करून घेवून मनातील द्वेष भावना नष्ट करून सद्गृहस्थ बनुन भेदभाव उच निच सारखे क्लेमिष्ट मनातुन काढून पैसा, सत्ता आली आहे म्हणून जग वंदनीय अश्या महापुरुषांना तुष्य भावनेनं बघणे, त्यांचे विषयी निंदनीय शब्द प्रयोग करून सूर्याकडे वर तोंड करून थुंकायचा मूर्ख पणा करून स्वतची फजिती करून घेवु नये. सत्ता आली म्हणून कोणीही माजून उठू नये.
आपल्यात माणसाची लक्षण आहेत म्हणून आपण माणूस बनुन माणसा सारखं वागायला शिकल पाहिजे हाच आपण सर्वांचा खरा मार्ग आहे. निराधार वर्गा सोबत अमानवीय घटणा पुन्हा घटणार नाही याची दक्षता सत्ताधारी वर्गाने घेतली पाहिजे.
बौध्द धर्माचा अनुयायी अनादिकालापासून शांततेच्या मार्गाने जगत आलेला आहे.या बुद्धाच्या मार्गाने आज असंख्य लोक प्रेरित होऊन या मार्गावर चालत आहे.अल्प संख्यांक असलेला बौध्द समाज्याच्या लोकांना किंवा त्यांच्या आदर्श्याना जाणीव पुर्वक अवहेलना करून समाज्यात कलह निर्माण करून वातावरण दुषित करून सत्तेचा गैरवापर करणे सुरु आहे.
एक जानेवारीला भिमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतो त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्गाला प्रोत्साहन देवुन त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. जास्तीत जास्त संख्येने लोक यावर्षी देखील यावे व त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था आणि रक्षणाची जबाबदारी सरकारने पार पाडवी.
आपल्या भारत देशाचे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.बाबासाहेब हे आपले सगळ्यांचे बाप आहे.बाप हैं तो…आप हैं.सत्ताधारी पक्ष हा कोणत्याही विचारधारेचा असला तरी सनदशीर मार्गाने जाणारा नक्कीच असला पाहिजे. त्याने प्रत्येक धर्माच्या लोकांच्या रक्षणाची जबाबदारी ही घेतलीच पाहिजे.
ॲड. विश्वनाथ बाबुराव तायडे कल्याण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत