दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भिमाबाईचा १२८ वा स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन

बाबासाहेबांच्या आईचा भिमाबाईचा १२८ वा स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन

मध्ये प्रदेश सोडून सुभेदार रामजी सकपाळ साताराला
निघत असताना.मुस्लिम एक कुटुंब आणि त्या वसाहतील सर्व मिलर्टी कुटुंब सकपाळ भिमा बाईला 
वाटी लावत असतांना सर्व बाया बापड्याच्या नयनात अश्रू तराळत होते, मुस्लिम बाई ही मोठं मोठ्याने गहिवरून सांगत होती,भिमाबाई तुमारा ए बच्या कितना खुबसुरत है और तुम कितने अच्छे है,अब तुमारी हमारी कब मुलाखात होगी,ए मुझे बौत आपसोस होता है,ही सारी हकीकत एकमेकांना ममतेने निरोप देत होते, आणि सुभेदार रामजी सकपाळ मध्ये प्रदेश सोडून साताऱ्यात आले, पण 
भिमाबाईला माथेसुळाचे रोगाने पछाडलेले होते, तेव्हा 
हा प्रकार भिवा अजान वयात पाहात होते, पण तेव्हा 
जातीयवादी शिवाशिव खुपच अराजकता माजली होती,मग डॉक्टर अस्पृश्यांच्या घरी येने दुरच मग विलाज कुठला होनार,तरी पण काही आयुर्वेदिक औषधे देऊन तो रोग थांबावयाचे नाव घेत नव्हता, या 
रोगापाई भिमाबाई खुपच व्याकुळ झालेल्या होत्या,
एक दिवस असा आला की, या जगाच्या सुर्यपुत्राला 
अनाथ करून गेला, तेव्हा हा दिवस होता २० डिसेंबर 
१८९६ रात्रीला आई भिमाबाई केव्हाच सोडून गेली हे कळाले नाही, सकाळी उठून मला गोजीत होती तो आज पाठीवरचा हात आज का नाही, हा मनाला विचार पडला होता, तेव्हा भिमाबाईला बसवलेल्यामुळे सारे पाहून रडत होते, तेव्हा माझ्या आईला आज सर्वच आंघोळ घालत आहेत हे का,तिरडीवर घालून 
चौघाने खांद्यावर घेऊन निघले असता, भिवा सर्वांना विचारीत असता, माझ्या आईला कुठे घेऊन जात आहात, हे एकूण साऱ्यांचे मनं गहिवरून येतं होते,
सातारच्या भुमीत भिमाआईला चित्तेवर ठेवले आणि 
आग्नी दिली तेव्हा गाव हळहळत होता हा भिवा आईविना पोरका झाला, ह्या दुःखद क्षणाला आज 
दि,२० डिसेंबर २०२४ रोजी १२८ वर्ष होत आहेत 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!