दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

गाडगे बाबा

दि. २० / १२ / २०२४

लेख लखन

२० डिसेंबर गाडगे बाबांचा स्मृतिदिन,

अज्ञान , अंधश्रद्धा, रूढी , परंपरा , कर्मकांड अस्पृस्यता तसेच समाजातील सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींवर आपल्या विर्तनातून घणाघाती प्रहार करून गावोगावी फिरून समाजप्रबोधन करणारे थोर क्रांतिकारी संत , महान कर्मयोगी , आदर्श लोकशिक्षक , एक चालत बोलतं विद्यापीठ म्हणजे संत गाडगे बाबा.

अमरावती जिह्यातील शेवगाव येथे २३ फ्रेबुवारी १८७६ रोजी माता सखुबाई आणि पिता झिंगराजी जानोरकर यांच्या पोटी गाडगे बाबा यांचा जन्म झाला. झिंगराजीना दारूच्य व्यसनापायी आपली सर्व संपत्ती , जमीन – जुमला सावकाराकडे गहाण ठेवला . त्यातच त्यांचा अंत झाला . माता सखुबाईला या लहान डेबुला घेऊन माहेर गाठावे लागले. बोतेगाव या ठीकाणी मामा चंद्रभान यांची गुरे राखण्याचे काम डेबुच्या वाटयाला आले , गाणी म्हणत, भजन म्हणत डेबु हे काम करत असताना जीवनाचा खरा अर्थ त्याला गवसला . येथील गरीब जनता शिक्षणाअभावी अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत अडकली आहे . व्यसणापाई संसाराचे वाटोळे होत आहे आणि सावकारी पाशात हा समाज पुरता अडकला आहे हे डेबुजींनी जानले.

सन १८८२ साली गाडगे बाबांचा विवाह धनाजी परीट यांची मुलगी कुंदाताई हिच्याशी झाला . त्यांच्या संसारवेलीवर चार फुले उमलली आलोका , कलावती , मृदगाल आणि गोंविद . पुढे मामांनीही व्यासनापाई आपली शेतीवाडी सावकाराकडे गहाण ठेवली. तरी पण बाबांनी दिवस रात्र मेहनत करून सर्व कर्ज फेडून मामाची शेती सावकाराकडून सोडवली. अत्यंत निटणेटकेपणाने आपल्या संसाराचा गाडा हाकत होते . कधी कधी त्यांना रंजलेला , गांजलेला , व्यसनाच्या आहारी गेलेला सावकारी पाशात अडकलेल बहुजन समाज त्यांना अस्वस्थ करीत होता.

किर्तनातुन ते सांगत मुलांना शिकवा , कर्ज काढून देवाची जत्रा करू नका. कर्मकांडाच्या वाईट चालीरितीच्य वाईट परंपरांच्या मागे लागु नका. गाडगे बाबांना अनेक ठिकाणी किर्तनासाठी बोलावत असत . अनेक महान नेत्यांनी बाबांचे किर्तन एकले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही त्यांचे किर्तन एकले. डॉ. बाबासाहेबांवर गाडगे बाबांचा प्रचंड विश्वास होता. लोकांच्या सोयीसाठी बाबांनी ठिकठीकाणी धर्म शाळा बांधल्या. तसेच शाळा , मुलांसाठी वस्तीगृह , महाविद्यालयांची निर्मिती केली.

अंगावर चिंध्या , फाटकी गोधडी , जेवणासाठी गाडग्याचे खापर असा त्यांचा अवतार पाहुन लोकांनी त्यांची चेष्टा केली प्रसंगी मार ही दिला. समाजाच्या जागृतीसाठी गाडगेबाबांनी शिव्या फुले म्हणुन स्विकारली.

समाजप्रबोधनाचे काम बाबांचे अहोरात्र चालु होते, ह्यातच त्यांना ६ डिंसेबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले ही बातमी कळाली आणि ते फार दुःखी झाले , अन्न पाण्याचा त्याग केला आणि बरोबर १४ दिवसानी म्हणजेच १४ डिसेंबर १९५६ रोजी बाबांनी प्राण त्यागले ,
रस्ते स्वच्छ करता करता गाडगेबाबांनी लोकांचे टकुरे ही स्वच्छ केले ,

अशा ह्या थोर संतास विनम्र अभिवादन .🌹🌹🙏🙏

सौ. सविता कांबळे
कर्जत रायगड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!