दिन विशेषदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

विसरता न येणारा इतिहास:- वर्ष १९७१

इतिहासाच्या पानातुन

“जर भारताने पाकिस्तानच्या बाबतीत नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका डोळेझाक करणार नाही,भारताला धडा शिकवला जाईल”
-रिचर्ड निक्सन

“भारत अमेरिकेला मित्र मानतो बॉस नाही भारत स्वतःचे भविष्य स्वतः लिहिण्यास सक्षम आहे परिस्थितीनुसार प्रत्येकाशी कसे वागायचे हे आम्हाला माहिती आहे “

                - इंदिरा गांधी 

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यासोबत बसून नजर न झुकवता व त्यांच्या डोळ्यात पाहत हे शब्द उच्चारले.त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव असलेले हेन्री किसिंजर उपस्थित होते त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे
त्या दिवशी इंदिरा गांधींनी भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषद रद्द करून, त्या तडक व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्याइंदिरा गांधींना त्यांच्या गाडी पर्यंत सोडताना किसिंजर म्हणाले, “पंतप्रधान महोदया, तुम्हाला राष्ट्रपतींसोबत थोडा अधिक संयम बाळगण्याची गरज होती “
त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, “श्री. सचिव, तुमच्या मौल्यवान सूचनेबद्दल धन्यवाद. भारत एक विकसनशील देश असल्याने, आमच्याकडे सरळ पाठीचा कणा आहे आणि सर्व अत्याचारांशी लढण्यासाठी पुरेशी इच्छाशक्ती आणि संसाधने आहेत आम्ही हे सिद्ध करू शकतो की हजारो मैल दूर बसलेली कोणतीही शक्ती कोणत्याही राष्ट्रावर आपली इच्छा लादू शकत नाही आता ते दिवस संपले आहेत”
एअर इंडियाचे बोईंग विमान दिल्लीच्या पालम धावपट्टीवर उतरताच, इंदिरा गांधींनी ताबडतोब विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावले. बंद दाराआड तासभर चाललेल्या चर्चेनंतर, वाजपेयी हे घाईघाईने परत आपल्या निवासस्थानी जाताना दिसले. यानंतर हे माहित झाले की इंदिराजींनी वाजपेयी यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रांमध्ये …भारताचे प्रतिनिधी म्हणुन केली होती.
बीबीसीचे डोनाल्ड पॉल यांनी वाजपेयींना विचारले, “इंदिराजी तुम्हाला त्यांचे कट्टर टीकाकार मानतात. असे असूनही,तुम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना सध्याच्या सरकारच्या भूमिकेचे समर्थन कराल असे तुम्हाला वाटत का?” वाजपेयींनी उत्तर दिले की “गुलाब बाग सजवतो आणि लिली देखील बाग सजवते.पण प्रत्येकजण आपण सर्वात सुंदर आहोत असं समजतो. पण जेव्हा बाग धोक्यात असते तेव्हा प्रत्येकाने तिचे रक्षण केले पाहिजे. मी आज बाग वाचवण्यासाठी आलो आहे. यालाच भारतीय लोकशाही म्हणतात.”
त्याचा परिणाम काय झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अमेरिकेने २७० प्रसिद्ध पॅटन टँक आणि हिंद महासागरात नौदलाची जहाज पाकिस्तानला मदत करण्यासाठी पाठवली. त्यांनी जागतिक माध्यमांना हे दाखवून देण्याचे प्रयत्न केले की हे पॅटन टँक विशेष तंत्रज्ञानाने तयार केले गेले आहेत आणि त्यामुळे ते अतिशय मोठा विनाश घडवु शकतात त्यामध्ये अमेरिकेचा हेतू अगदी स्पष्ट होता आणि जगासाठी एक धोक्याचा इशारा होता की कोणत्याही देशाने भारताला मदत करू नये.अमेरिका इथेच थांबला नाही तर भारताला तेल पुरवठा करणारी एकमेव अमेरिकन कंपनी बर्मा-शेलला भारतातील व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले. अमेरिकेने त्यांना भारतासोबतचा व्यवसाय थांबविण्या थांबविण्याच्या कडक शब्दात सुचना दिल्या इंदिरा गांधींच्या कुशाग्र राजनयिकतेमुळे युक्रेनमधून तेल आयात करण्यास सुरवात झाली, या युद्धात पाकिस्तानचे साधारण ५२ पॅटन रणगाडे नष्ट झाले.तसेच या युद्धात भारतीय सैन्याने एकूण १५,००० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त पाकिस्तानी भूभाग जिंकला… तसेच ९०,००० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांचा युद्धकैदी बनवले .नष्ट झालेले पॅटन रणगाडे राजस्थानच्या वाळवंटात प्रदर्शनासाठी भारतात आणण्यात आले आजही आपण अमेरिकेचा अभिमान असलेल्या २७० पॅटन रणगाड्यांचं भंगार राजस्थानच्या वाळवंटात पाहु शकतो यानंतर, अठरा दिवस चाललेल्या … युद्धाच्या परिणामी, मुजीबुर रहमान यांची पाकिस्तानने लाहोर तुरुंगातून सुटका केली तो १९७१ चा मार्च महिना होता श्रीमती इंदिरा गांधींनी संसदेत बोलताना बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. त्यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते श्री. वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना .. माँ दुर्गा’ असे संबोधत आपल्या भाषणाला सुरवात केली.
या घटनांचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:
🔴 अमेरिकन बर्मा- शेल कंपनीचं राष्र्टीयकरण करून भारताची स्वतःची तेल कंपनी, म्हणजेच इंडियन ऑइल अस्तित्वात आली. त्याच प्रमाणे ब्रिटीश पेट्रोलियम कंपनीच राष्र्टीयकरण करून …कंपनीच राष्र्टीयकरण करून हिंदूस्थान पेट्रोलियम नावाच्या कंपनीची स्थापना केली
🔴 जगाच्या नजरेत भारताने स्वतःला एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून सिद्ध केले.
🔴 भारताने अलिप्त राष्ट्र चळवळीचे (NAM) नेतृत्व केले.
इंदिरांजींचे नेतृत्व निर्विवाद होते. तथापि, लोक या सर्व घटना विसरले आहेत. हा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे….

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!