मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे संतापल्या

पुन्हा एकदा मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे संतापल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहे.”
“राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातीर तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात ही खेदाची बाब आहे”, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत