आज राजीव गांधींचा स्मृतिदिन..

दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
टीसीएस, विप्रो, इन्फोसिस या कंपन्या राजीव गांधीनी संगणक आणण्यापूर्वी स्थापन झालेल्या आहेत हे उघड आहेच, संगणक त्याआधी सुद्धा भारतात वापरात आलेले असतीलच.प्रश्नच नाही. अगदी टीसीएस-विप्रो-इन्फोसिस च्या संगणक संबंधी कंपन्यांचे कामकाज सुरु होण्यापूर्वी सुद्धा भारतात संगणक आणले असणारच आहेत आणि वापरण्यात आलेले असणारच आहेत.
मठ्ठ आणि मूढ लोकहो,
सरकारी कामकाजाचे संगणकीकरण करणे, जास्तीत जास्त ठिकाणी संगणकांचा वापर करणे त्यामुळे कामाचा वेग आणि अचूकता वाढेल हे कळल्यावर ते समजून घेऊन लागू करणारे आणि त्याप्रमाणे धोरण राबवून संबंधित तज्ञांना त्यांच्या ज्ञानाचा वापर करायला सांगणारे राजीव गांधीच होते.
आणि हो,
★ त्यावेळी संगणकाच्या वापराने बेरोजगारी वाढणार आहे म्हणून घसा खरवडत संसदेवर मोर्चे कोण काढत होत ?
कुठल्या पक्षाचे नेते संगणकाच्या विरोधात, सरकारी कामकाजात संगणकीकरण करण्याच्या विरोधात मोर्चे काढत होते, आंदोलन करत होते ?
दिवस दिवस ट्रंक कॉल लावून बसायची लोक तरीही फोन लागत नसायचे, फोन घरात असण म्हणजे काहीतरी अप्राप्य असण्याचे दिवस होते,
सॅम पित्रोदा ने दूरसंचार क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवले आणि रस्तोरस्ती टेलिफोन बूथ उभे राहिले, दळणवळण संवाद जसजसा वेगवान होत गेला तसे कामकाज सुलभ आणि वेगवान होत गेले.
मग पित्रोदा काय टेलिफोनच्या खांबावर चढून लोकांच्या घरात कनेक्शन जोडायला जायचे का ? त्यांना राजीव गांधीनी कामाची मोकळीक दिली म्हणूनच हे शक्य झाल ना ?
अरे दळभद्री लोकहो , निदान जे काम खरोखर त्यांनी केलेलं आहे त्याच श्रेय त्यांना देण्याची दानत आणि नियत तरी उसनी मागून घ्यायची कुणाकडून तरी.
सरकारी नोकरीत पगार घेऊन, सरकारी कॉलेजात पोरांना शिकवून ,त्या पोरांना आयटी मध्ये पाठवून डॉलरची गंगा बँकेत जमा करणारे रिटायर्ड थेरडे आणि त्यांचे मठ्ठ दिवटे हातात स्मार्टफोन घेऊन ” सत्तर वर्षात काय झालं ? “ म्हणतात तेव्हा त्यांना आपलेच भारतीय म्हणायची सुद्धा लाज वाटते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत