आर्थिकदिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिवस (RBI)(1 April 1935)

ऋतुजा आहिरे
अहमदनगर

आज आपण रिझर्व्ह बँकेची स्थापना करतो.देश स्वतंत्र झाला नव्हता.तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व्ह बँकेची कल्पना केली होती.आज आपण संघिय क्षेत्राबद्दल बोलतो.,वित्त आयोग , राज्यांची मागणी असते. इतके पैसे कोण देईल, ,कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल.देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते., वित्त आयोगाचा , आणि संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते.आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग ,मग ती आरबीआय असो अशा अनेक संस्था आहेत.

रिझर्व्ह बॅंक ही एक केंद्रीय बॅकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिक नीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते.भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्त्वाचे निर्णय घेते.

रिझर्व्ह बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटिश राजवटीत स्थापना झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारांवर आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरू आहे.

बाबासाहेबांनी प्राॅब्लेम ऑफ रुपी मध्ये केलेलं विवेचन इतक जबरदस्त होतं की ब्रिटिश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायांचं चालवलेल शोषण जगासमोर उघडं पडलं . तत्कालीन काँग्रेसने आंबेडकरांच्या या मांडणीला उचलुन धरत ब्रिटिशांना ताणून धरलं.त्यांचीच परिणिती लंडनहुन एकुण प्रकरण तपासण्यासाठी राॅयल कमिशनच्या स्थापनेत झाली.
१९३५ मध्ये रिझर्व्ह बॅंकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे ,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरू होती. याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली. याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली. आणि मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तऐवज / ग्रंथ मात्र रिझर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते . इतर देशांत अर्थ व्यवस्था ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिझर्व्ह बॅंक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने उभी आहे.

ऋतुजा आहिरे
अहमदनगर
दि.१ .४.२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!