उद्योगमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

महावितरण चा ग्राहकांना “शॉक !”

मुंबई : उन्हाच्या झळा वाढत असतानाच, आजपासून (एक एप्रिल) राज्यातील ‘महावितरण’च्या सर्व वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, ‘महावितरण’च्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता येणारी वीजबिले ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झटका देणार आहेत.

राज्यातील विजेचे दर देशात सर्वाधिक असतानाच, ‘महावितरण’ने गेल्या वर्षी सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली. त्यानुसार वीजदरात सरासरी २१.६५ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा वीजग्राहकांच्या संघटनांनी केला होता. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षांत (२०२३-२४) वीजबिलात सरासरी ७.२५ टक्के, तर या आर्थिक वर्षांत (२०२४-२५) वीजबिलात ७.५० टक्के अशी एकूण सरासरी १४.७५ टक्के वाढ झाली आहे. स्थिर आकारातही गेल्या वर्षी १० आणि यंदाच्या वर्षी १० अशी २० टक्के वाढ झाल्याचे वीजग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. घरगुतीसह व्यापारी, शेतकरी, उद्योग अशा सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना हा वीजदरवाढीचा झटका बसणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!