मुख्य पान

मिडियाबद्दल अतिशय तिरस्कार वाढत चाललाय

मिडियाबद्दल अतिशय तिरस्कार वाढत चाललाय. सर्व हिंदी, इंग्लिश, मराठी न्यूज मध्ये न मेलेली पूनम पांडे ब्रेकिंग न्यूज होते. कुणी तिच्याकडे किती गाड्या आहेत? तिची प्रॉपर्टी किती आहे. यावर बातमी दाखवत होते तर काही जण तिचे अतिशय बोल्ट असलेले फोटो दाखवून टीआरपी वाढवत होते.
मिडीयातला धंधा यालाच म्हणता येईल.

महाराष्ट्रात दलित अत्याचाराने थैमान घातले आहे. नांदेड जिल्ह्यात बुद्ध मूर्ती काढली, महिलांना भयभीत केले. अमरावतीत महिलांवर जातीयवादी हल्ला करतात. जामनेर ला बौध्द महिला सरपंच पतीला विष पाजून मारले. माळशिरसला ज्येष्ठ आंबेडकरी नेत्याचे दोन्ही पाय उद्धवस्त केले.

रोहिपिंपळगाव नांदेड ला 6 वर्षाच्या चिमुरडीला गाडीवर बसवून दोन नराधम घेऊन जातात तिला संपवतातात. साला ही न्यूज तर सोडा साधी बातमी सुद्धा झाली नाही. खाली बोटम लाईनला सुद्धा आमच्यावरील हल्ले दाखवले जात नाहीत.

मीडियाच्या या वृत्तीची आता चीड येत आहे. पूनम पांडे महत्वाची आहे पण येथील दलितांच्या हत्या महत्वाच्या नाहीत.

आज पूनम पांडे समोर येते अन् म्हणते मी जिवंत आहे. तिच्या मरण्याचा आणि जिवंत असण्याचा मुद्दा महत्वाचा आहे की, सावकारीमुळे, कर्जामुळे, कमी हमीभावामुळे फाशी घेणारा शेतकरी महत्वाचा आहे?

आपल्या मेंदूच्या अनेक टेस्टिंग सुरू आहेत. एखादी फेक बातमी चालू शकते का? याची ही चाचपणी असावी यात दुमत सुद्धा नाही. मीडियाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोक आता टीव्ही वरील न्यूज बघत नाहीत, यूट्यूब वरील बातमीला खुप महत्व प्राप्त झाले, त्याचं कारणच या इलेक्ट्रॉनिक मीडियाची सुरू असलेली राजकीय सत्तेची गुलामगिरी आहे.

AllindiaPantherSena

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!