मुख्य पान
चोरांचे भाजपत सहर्ष स्वागत !
कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मधे काही लोकांनी खूप चोरी केली.हे जनतेला माहिती होते.आहे.हे सरकारला माहिती आहे.हे पवार ठाकरे राहुल ला माहिती आहे.पण या चोरांची पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना नितांत गरज असते.हे चोर म्हणजे मदारीची माकडे.कोणाचेही पाकिट चोरून मदारीकडे आणून देतात.हे तुम्ही आपण सर्वांना माहीत आहे.नरेंद्र मोदींना माहिती आहे.फडणवीस, महाजन यांना माहिती आहे.म्हणूनच तर भाजपत खेचून घेत आहेत."या , आमच्या पक्षात येऊन चोरी करा.आमचा वाटा आम्हाला द्या.तुमचा वाटा तुम्ही न्या.येथे तुम्हाला कोणीही इडी, बेडी लावणार नाही."
पटेल हे पवारांचा खजिना सांभाळत असत.खान पान मान शान सांभाळत असत.हे मोदींनी हेरले.अरे!असा गुणवान, धनवान माणूस आपल्या पक्षात पाहिजे.म्हणून खेचला, येनकेन प्रकारेण.शिंदे कडे ठाकरेंचा खजिना होता.खान पान मान शान अनेक वर्ष सांभाळून होते.हे मोदींनी हेरले.अरे !असा गुणवान माणूस आपल्या पक्षात पाहिजे.फडणवीस कडे जबाबदारी सोपवली.कोणी म्हणे खोका दिला.कोणी म्हणे खंबा दिला.ते शिंदेंना त्यांच्या तंबूत खेचण्यात यशस्वी झाले.इकडे पाटील पटोलेंची सर्वच तजबीज करीत असत.पटोलेंची तबीयत सुधारली.महाजन फडणवीस यांनी टिपले.अरे!इतका धनवान माणूस आपल्या पक्षात पाहिजे.म्हणून त्यांनी जाळे टाकले.गळ घातला.पाटलांना पळवून नेले.
अजितदादा तर काकांचे गळ्यातील ताईत होते.त्यांच्या जिवावर भारी होते.माझा दादा ,अजितदादा.पण दादांना सुद्धा इडी आणि बेडी दाखवली."डिकरा, आप आपको हमारे हवाले कर दो.कोई माईका लाल आपका बाल बांका नही कर सकता.जो करते है,वो हम है.हमने पकडा तो काका भी कुछ नहीं कर सकते."
अजितदादांनी विचार केला.काकांचे वय झाले.ते आता मला वाचवू शकणार नाहीत.आता आपली सोय आपणच करून घ्या.त्यांनी अंधारातच जम्प मारली.थेट भाजपच्या तंबूतच.त्यांनी काकांच्या दुखाचा ,वेदनांचा विचार केला नाही.ज्यांनी केला तो नातू आता इडी च्या चकरा मारत आहे.म्हणून अजितदादा म्हणतात,"बेटा तू अजून लहान आहेस.मला कळले ते तुला कळायला वेळ लागेल."
शिंदे, अजितदादा, पाटील यांचे सोबत आलेली माणसे भाजप च्या वाशींग मशीन मधे धुवून घेतली म्हणे.नाही हो!जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.हिच माणसे एक दिवस मोदी,शहा, फडणवीस यांचे उपरणे पळवून नेतील.
भाजपचा तंबू असा फुगत फुगत खूप मोठा होईल.आतील चोर एकमेकांना लाथा घालतील.तंबू फाडून बाहेर पडतील.घम़डी बेडकाने बैलाचा आकार घेण्यासाठी,इतका फुगला कि,त्याचा स्फोट झाला.असा धडा इंग्रजीत आहे.
माझ्या जळगाव शहरातील जिल्ह्यातील अनेक चोरांना भाजपने पोटात सामावून घेतले.या! दक्षिणा द्या.निवांत राहा.निश्चिंत राहा.तरीही ज्यांना जन्मजात चोरीची सवय आहे ते चोरी करीतच आहेत.कोणी रस्ता चोरतो.कोणी गटार चोरतो.कोणी डांबर चोरतो.कोणी सिमेंट चोरतो.आख्खे जळगाव बरबाद करून ठेवले.
कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि आता भाजप यांचे, एकच ध्येय.सपाटून काम.अपना विकास.सबका भकास!हिच मोहिम चालू आहे.आपण जनता मात्र यांची वकालत करण्यात अडकलो आहोत.बुद्धी कमी.अक्कल कमी.हिंमत कमी.किंमत कमी.
यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे,आपणच आपले हित जोपासणे.आमचा रस्ता बनला पाहिजे.आमची गटार बनली पाहिजे.आमचे पाणी मिळाले पाहिजे.शाळा , दवाखाना, ओपन स्पेश तर विकून टाकले.जे आहेत ते तरी वाचवले पाहिजे.ही मोहिम हाती घेतली आहे, जागृत नागरिकांनी.महाराष्ट्र जागृत जनमंच ने.
महाराष्ट्र जागृत जनमंच च्या या मोहिमेत अनेक माकडे विरोध करीत आहेत.करणारच!त्यांना तो नैसर्गिक आधिकार आहे.वृत्ती तशी प्रवृत्ती.तरी पण आपण आपली मशागत करीत आहोतच.माकडांना घाबरून शेती सोडून देणार नाहीत.
शिकंदर ग्रीसहून मेसाडिनोया पर्यंत आला.तोपर्यंत त्याचेकडे ग्रीक सैनिक होते.ते थकले होते.भारतापर्यंत येऊन लढाई करायला तयार नव्हते.म्हणून शिकंदरने चोरांना, लुटारूंना,वाटमाऱ्यांना सैन्यात भरती करून घेतले.सौदा केला.लढाईत लुट तुमची,राज्य माझे.ते चोर,लुटारु तयार झाले.भारतावर स्वारी केली.राजा पौरवाला पराजित केले.पण पुढे येण्यास हेच सैनिक तयार झाले नाहीत.त्यांनी खूप लुटमार केली होती.परत जाऊन ठेवून येऊ म्हणाले.म्हणून शिकंदर आणि चोर परत मेसाडिनोया कडे निघाले.त्या चोर, लुटारु सैनिकांनी शिकंदरला रस्त्यावरच लुटून खून केला.
असेच भाजप मधे आलेले चोर करतील.याची नोंद मोदी शहा,फडणवीस यांनी घ्यावी.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत