जनतेच्या भावनाशी खेळणे महापाप
लेखक :दत्ता तुमवाड सत्यशोधक समाज नांदेड.
दि. 25.जाने.2024.
फोन: 9420912209.
देव जात धर्म या गोष्टी लोकांच्या भावनांचा विषय आहे. राजकारणाशी सत्तेशी निवडणुका याशि हे जोडणे चुकीचे आहे. यांचा राजकारणासाठी वापर करणे पाप आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुस्लिमांचे जे हत्याकांड घडले त्यावेळी मोदींना अटलबिहारी यांनी खडसावले. ” मोदी जी तुम्ही तुमचा राजधर्म पाळा “.तेंव्हा कुठे ते हत्याकांड थांबले. धर्म पाळणे याचा अर्थ प्रत्येकानी आपापले कर्तव्य निभावणे. राजकीय धर्म राजकारण्यानी पाळावयाचा असतो ,सामाजिक धर्म सामाजिक कार्यकर्त्यांनी
पाळावयाचा असतो ,धार्मिक कर्तव्य धार्मिक कार्यकर्त्यांनी पाळावयाचे असते, आर्थिक धर्म ( कर्तव्य) हा उत्पादक कारखानदार व्यापारी वितरक विक्रेते यांनी पाळावयाचे असते. मानवी जीवनाचे आर्थिक सामाजिक राजकिय धार्मिक सांस्कृतिक अशी पाच अंगे आहेत. यांचा योग्य प्रकारे विकास आणि वापर झाला पाहिजे. या प्रत्येक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी चुकीचे ध्येय आणि उद्दिष्टे आणि चुकीची दिशा ने वाटचाल केली तर देशाचे देशातील जनतेचे वाटोळे होते. देश आणि जिवन उध्वस्त होते. हे एक पाप आहे. समतेचा स्वातंत्र्याचा बंधुभावाचा न्यायाचा विचार आणि कृती म्हणजे पुण्य होय. या विरोधी विचार म्हणजेच विषमतेचे विषारी विचार आणि कृती म्हणजेच पाप होय. देव धर्म जात या संकल्पना बुद्धीशी जोडलेल्या नसून भावनेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे लोक भावनेच्या आहारी जाऊन चांगले व वाईट पण कृती करतात. योग्य अयोग्य पण करतात. सत्य असत्य पण कार्य करतात. कारण मनाला ( भावना) यातील फरक कळत नाही. तो बुद्धिला कळतो. परंतु सामान्य माणसे बुद्धीने चालत नाहीत तर ते भावनेने चालतात. याचा गैरफायदा असामान्य विषमतावादी वर्चस्ववादी स्वार्थी मूठभर लोक घेत असतात. आणि याना सामान्य बहुजन भोळे भाबडे लोक बळी पडतात. विषमतावादी स्वार्थी मूठभर सत्ता संपती प्रतिष्ठा जपण्यासाठी लोकांच्या भावनेशी खेळतात. सामान्य भावनाशील लोक म्हणजे उंदीर आणि स्वार्थी लोक म्हणजे मांजर बोके होत. मांजर उंदराशी खेळून खेळून मारतो,एकदम एका झटक्यात मारत नाही. आधी त्याचेही दोस्ती करतो. खेळतो. मग आटोक्यात आला, त्यास खेळाची सवय लागली ( फुकट खायची सवय) की मग उंदराची शिकार करतो, हा बोक्या. अर्थात एखाद्याचा जीव घेणे म्हणजे पापच . सत्तेतील आजचे राजकारणी हेच पाप करीत आहेत. आर एस एस चे मोहन भागवत, धर्मपिठाचे आदित्य नाथ, सत्तेतील म्होरके मोदी फक्त हे तिघेच सभांना संबोधित करतात. विरोधी पक्षांना बोलूच देत नाहीत. टीका करणार्यांना संसदेत बसू देत नाहीत. हे सारे हुकुमशाही वर्तन आहे. हे असे का करतात? याचे कारण rss ला लोकशाही मान्य नाही.त्याना या देशात हुकुमशाही आणायची आहे. हे धर्मांध आहेत. यांचे ध्येय हिंदुराष्ट्र च्या आडून वैदिक धर्म, वैदिक राष्ट्र म्हणजे मनुस्म्रुती म्हणजेच वर्ण जाती व्यवस्था म्हणजेच विषमतेवर आधारित समाज व्यवस्था या देशात निर्माण करायची आहे. म्हणुनच काही कारण नसताना, काही संबंध नसताना मोहन भागवत याना राममंदिर उदघाटन कार्यक्रमास बोलावले. कारण बीजेपी ही आर एस एस चि राजकिय शाखा आहे. खरे तर सरकारचा याशि काहीच संबंध नाही. हा सत्तेचा गैरफायदा घेणे होय. हिंदू राष्ट्र हे नावाला आहे. हिंदूना मूर्ख बनवणे साठी हिंदूं चा गैरवापर करताहेत हे rss वाले. याना हिंदू राष्ट्र करायचे नसून हिंदूना वापरून त्यांचे मतांचा फायदा घेऊन याना ब्राह्मण राष्ट्र प्रस्थापित करायचे आहे. ज्याचे संविधान हे मनुस्म्रती असणारे आहे. यांची संख्या कमी असल्याने बहुजन हिंदूंची मते मिळवून सत्तेत रहायचे, संविधान बदलायचे असा हा पापी आणि धोके बाज कार्यक्रम भागवत मोदी शहा योगी यांचा आहे. याना पक्के माहीत आहे की हे हिंदू भोळे भाबडे अज्ञान आहेत. भावनाशील आहेत. देव धर्म जात यात आपण याना आधीच अडकवून ठेवले आहे. हे यांचे अस्मितेचे विषय झाले आहेत. याचा आपण वापर करून नक्कीच यशस्वी होऊ शकतो. अशी दुस्ठ भावना या RSS व BJP वाल्यांची आहे. हे ओळखणे हिंदूंचे काम आहे. नाहीतर उंदीर बनुन बोक्याची शिकार व्हावे लागेल . –
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत