पद्मश्री पुरस्कृत नामदेव ढसाळ यांस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..


१५ फेब्रुवारी ❀
कवी नामदेव ढसाळ जन्मदिन
जन्म – १५ फेब्रुवारी १९४९ (पुणे)
स्मृती – १५ जानेवारी २०१४ (मुंबई)
दलित पॅंथरचे संस्थापक, कवी नामदेव ढसाळ यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने ते लहाणपणीच वडिलांसोबत मुंबईला आले. सुरवातीच्या काळात ते मुंबईत टॅक्सी चालवत असत. त्यानंतर अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धर्तीवर त्यांनी दलित पँथर या संघटनेची १९७२ मध्ये स्थापना केली. याच काळात उदयाला आलेल्या अनियती कालीकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते.
१९७३ ला त्यांचा पहिला कविता संग्रह ‘गोलपीठा’ प्रसिध्द झाला. यानंतर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक) आणि प्रियदर्शीनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा) हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. अप्रतिम कविता संग्रह, लेखन, साहित्य यामुळे ढसाळ हे मराठी व भारतीय साहित्याला वेगळे वळण देणारे लेखक ठरले. त्यांच्या साहित्यामुळे अनेक दलित चळवळी उभ्या राहिल्या. त्यांच्या साहित्याचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला.
आपल्या साहित्यातुन शोषित व पिडितांच्या समस्या मांडणारे,अनेक अन्याय अत्याच्याराच्या विरोधात प्रकर्षाने आवाज उठवत प्रस्थापितांस खडबडून जागे करत वंचित/उपेक्षितांस न्याय मिळवुन देणारे,प्रत्येकाच्या मनात विद्रोहाविरोधात क्रांतीची मशाल पेटविणारे,पद्मश्री पुरस्कृत नामदेव ढसाळ यांस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत