प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
जुनोनीत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नाम फलकाचे मोठ्या उत्साहात अनावरण !

जगाला तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे.आपण ते मान कल्याणकारी विचार प्रामाणिकपणे जन-मानसात घेऊन गेले पाहिजे.
- जिल्हाध्यक्ष विजयमाला सु धावारे धाराशिव : दि 16/11/2023 रोजी,धाराशिव शहरालगत असलेल्या मौजे जुनोनी येथे आज सायंकाळी ठीक सहा वाजता सिद्धार्थ तरुण मंडळ आणि मिलिंद बुद्ध विहाराच्या वतीने,भारतीय बौद्ध महासभेच्या नाम फलकाचे अनवरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयमाला धावारे,जि.संघटक विजय अशोक बनसोडे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,ता.संस्कार सचिव आजिनाथ सरवदे प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यानंतर मिलिंद बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी तालुका संस्कार सचिव आजीनाथ सरवदे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,समता सैनिक दलाचे श्याम (भाऊ) सोनवणे, नागटिळक पी.ए यांनी ही आपले प्रासंगिक असे मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलत असताना जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय बनसोडे म्हणाले की,आज केवळ बौद्धच नाही तर प्रत्येक समाजातील तरुण पिढीत नैतिक मूल्याची शिकवण आणि नैतिकसंस्कार नसल्यामुळे तरुण पिढीची वाताहत होत आहे.आपल्या जीवनामध्ये किती ही प्रगती केली तरी त्या प्रगतीचे मोजमाप करण्याचे एकमेव साधन म्हणजे आपल्यावर झालेले किंवा होणारे संस्कार हेच आहे.कारण आपल्याकडे कितीही गडगंज संपत्ती असली तरी ही मार्केटमध्ये कोणत्याही दुकानात संस्कार हे विकत मिळत नाहीत. आपण ते संस्कार विकत घेवु शकत नाहीत.तर ते संस्कार आपल्याला बुद्ध विहारातूनच गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीतूनच घ्यावे लागतात.त्यासाठी आपण बुद्ध विहारात येऊन त्रिशरण पंचशील,अष्टांगिक मार्ग आणि दहा परिमितांची उजळणी केली पाहिजे.हे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सरवदे यांनी केले. तर आभार उपस्थित यांचे आभार सोमनाथ सरवदे यांनी मानले. या नाम फलकाच्या आणि धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमास सोनवणे ए व्ही,शिंगाडे आर.जी,सतीश सरवदे,सोमनाथ सरवदे,रामेश्वर सोनवणे,धनाजी सोनवणे,राजेंद्र सरवदे,एकनाथ जानराव यांच्या सह जुनोनी येथील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपासक उपासिकांना मिलिंद बुद्ध विहाराच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत