महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात :दलित वस्ती भेट-दूत समतेचे:हा उपक्रम राबवावा

इ झेड खोब्रागडे.

समाज कल्याण विभागाच्या संचालक पदी रुजू होताच पहिला उपक्रम सुरू केला,14 ऑक्टोबर 2008 ला. उपक्रमाचे नाव :दलित वस्ती भेट-दूत समतेचे. याबाबतची भूमिका दि 6 ऑक्टोबर 2008 च्या परिपत्रकात मांडली आहे.

एकाच दिवशी 14 ऑक्टोबर 2008 ला तालुक्यातील एक दलित वस्ती निवडून , 300 तालुक्यातील 300 दलित वस्त्यांना भेट देण्याचा कार्यक्रम अंमलात आणला. उद्देश परिपत्रकात स्पष्ट केला आहे. पुढे , प्रत्येक अधिकाऱ्यास एका तालुक्यातील 4 वस्त्या दत्तक दिल्यात, महिन्यातून एकदा या 4 ही वस्त्यांना भेटी देणे व परिपत्रकात दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम करणे. माझे अधिकारात हा उपक्रम 2010,राबविण्यात आला. 17 फेब्रुवारी2010 च्या vision document मध्ये या उपक्रमाचा प्रस्ताव मंत्री परिषदेकडून मान्य करून घेण्यात आला. माझी बदली झाली आणि थांबला. सामाजिक न्याय विभागाने GR काढायला पाहिजे होता. आता, पुन्हा सुरू करता येते. 2015 पासून Barti मार्फत समता दूत प्रकल्प राबविला जातो परंतु उद्देश सफल होत नाही. आम्ही अधिकचे कर्मचारी न नेमता ,आहे त्यात राबविला. दलित वस्तीत अधिकारी यांनी नियमितपणे bheti द्याव्यात, संवाद साधावा, योजना समजावून सांगाव्यात आणि लाभ मिळवून द्यावा हा उद्देश होता.

पुढे जाऊन , महाराष्ट्रातील सर्व समाज कार्य महाविद्यालयाच्या प्रत्येक प्राध्यापकास एक दलित वस्ती दिली होती. योजना सांगण्यासाठी आणि योजना अंमल बाजावणीचे वास्तव समजण्यासाठी. जवळपास 3000 वस्त्यांना भेटी झाल्यात. संवादातून सक्षमीकरण व समृद्धीकडे वाटचाल. संविधानिक दायित्व म्हणून केले. सरकारने 100 दिवसाच्या कार्यक्रमात हा उपक्रम अंतर्भूत करावा. नावाप्रमाणे ,सामाजिक न्यायाचे काम दिसून येईल. हाच तो”प्रशासनात आंबेडकरवाद”.

इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन नागपूर
दि 24 जाने 2025.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!