दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपान

राजश्री शाहू महाराजांचा पहिलवान हारला तरी राजाने जिंकलेल्या पहिलवानाची हत्तीवरून मिरवणूक काढली

समाज माध्यमातून साभार

लोक राजा राजश्री शाहू महाराजांनी पैलवानाना आश्रय दिला. आम्ही कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी झाली असं म्हटलं जातं. त्या कोल्हापूरच्या पंढरीत शाहू महाराजांनी अनेक पैलवानांना आश्रय दिला आणि घडविले. परंतु त्या पैलवानानीही कोल्हापूरचे नाव साऱ्या देशात गाजवले.

देशाच्या अनेक कुस्तीच्या फडामध्ये
कोल्हापूर म्हटलं की अनेक पैलवान घाबरत असत. परंतु कोल्हापुरात असा एक पैलवान निर्माण झाला की त्याचं नाव सगळीकडे गाजत होतं.
परंतु त्या पैलवानाचं वैशिष्ट्य असं होतं की तो लोकाश्रय मिळालेला पैलवान होता. लोकांमधून तो वाढला गेला होता राजाश्रया मधील नव्हता. हळूहळू त्याची कीर्ती राजश्री शाहू महाराजांना समजली. त्याचं नाव गोपाळ परीट होतं. राजे म्हणाले हा कोण पैलवान आहे. लोकाश्रयावर वाढलेला. पैलवान कोण आहे हे पाहण्यासाठी राजाने त्याची कुस्ती आपल्या कोल्हापूरच्या पैलवाना बरोबर ठेवली. कोल्हापूरच्या मैदानामध्ये संपूर्ण कोल्हापूर लोटलं होतं ही कुस्ती पाहण्यासाठी.

लोकाश्रयावर वाढलेला गोपाळ परीट आणि राजाश्रयावर वाढलेला गोविंद कसबेकर यांची कुस्ती झाली. दोन वेळा ही कुस्ती बरोबरी सुटली. आणि तिसऱ्या वेळा जेव्हा कुस्ती झाली तेव्हा गोपाळ परीटने गोविंद कसबेकर याला चितपट केले.

राजाने त्याच वेळी एक नवीन घोषणा केली की याच मैदानामध्ये गोपाळ परीट आणि राजाचा पैलवान श्रीपती चव्हाण यांची कुस्ती या दिवशी होईल. कारण श्रीपती चव्हाण हा एक गाजलेला पैलवान होता. वयाने ,ताकदीने, डाव पेचीने मोठा पैलवान होता. गोपाळ परीटाने लोकांच्यासाठी आपण लढू असे राजाला सांगितले.

आणि ठरलेल्या दिवशी गोपाळ परीट आणि श्रीपती चव्हाण यांची कुस्ती चालू झाली. इकडे तिकडे या गोष्टीची चर्चा झाल्यामुळे मैदान अगदी तुडुंब भरले होते. कारण या कुस्तीचा प्रचार जास्त प्रमाणात झाला होता. स्वतः लोक राजे शाहू महाराज देखील येथे उपस्थित होते.
राजाचा पैलवान श्रीपती चव्हाण आणि लोकांचा पैलवान गोपाळ परीट यांच्यात कुस्ती चालू झाली. राजाचा पैलवान विरुद्ध जनतेचा पैलवान अशी कुस्ती असल्यामुळे सर्वांच्या मनात धाकधूक होती. आता काय होणार ? दोन डाव झाले होते परंतु ते बरोबरीने सुटले होते. आणि तिसरा डाव सुरू झाला. आणि गोपाळ परीटाने श्रीपती चव्हाण आला असा एक डाव टाकला की त्याला चितपट केले. मैदानावरती गोपाळ परीट विजय मुद्रेने उभा राहिला होता. परंतु कोल्हापूरची जनता आपला पैलवान जिंकला म्हणून फेटे उडवत होती. परंतु एक माणूस मोठ मोठ्याने विजयाच्या आरोळ्या ठोकत होता. तो माणूस म्हणजे लोकनेता राजश्री शाहू महाराज. जनतेसाठी जनतेच्या आनंदासाठी सामील होणारा जनतेचा राजा म्हणजेच लोकांचा राजा म्हणून ज्यांना लोकराजा म्हटले जाते असे शाहू महाराज. माझ्या राज्यातला लोकाश्रय असलेला एक पैलवान माझ्या पैलवानाला चितपट करतो . त्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. त्याने फक्त त्याला चांदीची गदा देऊन थांबले नाहीत. त्याने अशी घोषणा केली. या गोपाळ परीट ची हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल. आणि हत्तीवरून मिरवणूक निघालेला हा संस्थानाच्या इतिहासातील एकमेव पहिला पैलवान ठरला तो म्हणजे गोपाळ परीट.

राजाच्या पैलवानाला म्हणजे स्वतःच्या पैलवानाला हरवले तरी जनतेच्या पैलवानाचा मोठ्या मनाने स्वागत करणारा असा हा लोक राजा
मोठ्या मनाचा राजा होता. म्हणूनच राजश्री शाहू महाराजांना लोक राजा म्हटले जाते. लोकांच्या भावनांचा लोकांच्या मनाचा लोकांच्या विचाराचा आदर करणारे राजे होते. म्हणून शाहू महाराजांचा आदर्श आजही या देशाला दिशादर्शक आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे.
🙏🙏🙏🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!